शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

कृषी विभागाचे धान बियाणे निघाले बोगस

By admin | Updated: October 29, 2015 02:04 IST

तालुका कृषी कार्यालय गडचिरोलीच्या वतीने महाबिज कंपनीच्या सांबा-मसुरी जातीचे संकरीत धान बियाणे तालुक्यातील येवली...

शेतकऱ्यांची फसवणूक : नुकसानभरपाई न दिल्यास आंदोलन छेडणारगडचिरोली : तालुका कृषी कार्यालय गडचिरोलीच्या वतीने महाबिज कंपनीच्या सांबा-मसुरी जातीचे संकरीत धान बियाणे तालुक्यातील येवली व गोविंदपूर येथील शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी अनुदान योजनेंतर्गत पुरविण्यात आले. मात्र १५० दिवसांचा कालावधी उलटूनही शेतकऱ्यांच्या धानपिकाला फुटवे आले नाहीत. कृषी विभागाचे बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. यासंदर्भात येवली येथील सेवा सहकारी संस्थेचे सभापती चोखाजी भांडेकर, येवलीच्या सरपंच गीता सोमनकर, उपसरपंच सुरेखा भांडेकर, काशिनाथ लटारे, लोमेश कोहळे आदींसह गोविंदपुरातील अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. नुकसानभरपाई न दिल्यास कृषी विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यासंदर्भात सहकारी संस्थेचे सभापती चोखाजी भांडेकर व येवलीच्या सरपंच गीता सोमनकर यांनी म्हटले आहे की, तालुका कृषी विभागाच्या वतीने महाबिज कंपनीचे सांबा-मसुरी जातीचे संकरीत धान बियाणे येवली व गोविंदपूर येथील शेतकऱ्यांना अनुदानावर पुरविण्यात आले. बियाणे पुरविताना सदर बियाणे १२५ ते १३० दिवसांच्या मुदतीचे असून या वाणातून भरघोस उत्पादन येते असे कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र १४० ते १५० दिवसांचा कालावधी उलटूनही धानपिकाला फुटवे आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महाबिज कंपनीच्या सांबा-मसुरी या वाणाची मुळातच उगवण क्षमता फारच कमी आहे. अनेकदा पाणीपुरवठा करूनही धानाचे लोंब भरले नाही. उलट धानपिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पीक नष्ट झाले आहे. येवली व गोंविदपूर गावातील शेतकऱ्यांनी कर्ज काढून महाबिज धानबियाण्यांची लागवड आपल्या शेतात केली. यासाठी शेतकऱ्यांना रोवणी व मजुरीचा खर्च उचलावा लागला. मात्र आता बियाणे भरत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळ, रोग व बोगस बियाण्यांमुळे शेतकरी प्रचंड चिंताग्रस्त झाले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)