शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

७० हजार क्विंटलवर धान खरेदी पोहोचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 21:26 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सन २०१८-१९ या रबी हंगामात जिल्ह्यात उन्हाळी धानाची खरेदी केली जात आहे. महामंडळाच्या वतीने आतापर्यंत रबी हंगामात एकूण ६९ हजार ५०३ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. गेल्या दोन दिवसात ही खरेदी ७० हजार क्विंटलच्या वर पोहोचली आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालय व अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने रबी हंगामातील धान खरेदीसाठी ४० वर केंद्र सुरू करण्यात आले आहे. ज्या भागात उन्हाळी धानपिकाचे उत्पादन घेतले जाते, अशा भागात नजीकच्या केंद्रावर विक्रीसाठी धानाची आवक शेतकऱ्यांकडून होत आहे.

ठळक मुद्देजिल्हाभरात ३२ केंद्रांवर आवक : उन्हाळी धानासाठी महामंडळाची सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सन २०१८-१९ या रबी हंगामात जिल्ह्यात उन्हाळी धानाची खरेदी केली जात आहे. महामंडळाच्या वतीने आतापर्यंत रबी हंगामात एकूण ६९ हजार ५०३ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. गेल्या दोन दिवसात ही खरेदी ७० हजार क्विंटलच्या वर पोहोचली आहे.आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालय व अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने रबी हंगामातील धान खरेदीसाठी ४० वर केंद्र सुरू करण्यात आले आहे. ज्या भागात उन्हाळी धानपिकाचे उत्पादन घेतले जाते, अशा भागात नजीकच्या केंद्रावर विक्रीसाठी धानाची आवक शेतकऱ्यांकडून होत आहे.गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत धानोरा, कुरखेडा, चामोर्शी, कोरची, देसाईगंज, आरमोरी या तालुक्यात रबी हंगामासाठी केंद्र सुरू करण्यात आले आहे. गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत आतापर्यंत एकूण १७ केंद्रांवर धानाची आवक झाली आहे. या केंद्रांवरून ४१ हजार ६७३ क्विंटल इतकी धानाची खरेदी करण्यात आली आहे. अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत सिरोंचा, अहेरी व इतर तालुक्यात मिळून जवळपास १५ केंद्रांवरून आतापर्यंत २७ हजार ८३० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने खरीप व रबी अशा दोन्ही हंगामात आविका संस्थेच्या सहकार्याने धानाची खरेदी केली जाते. रबी हंगामात शेतकऱ्यांची केंद्रांअभावी ससेहोलपट होऊ नये यासाठी महामंडळाच्या वतीने धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत रबी हंगामात महामंडळाकडून धानाची खरेदी करण्यात येणार आहे. त्यानंतर रबी हंगाम संपतो. सिंचन सुविधेमुळे उन्हाळी धानाचे उत्पादन वाढले आहे.धान भरडाईचे काम ५० टक्क्यांवरआदिवासी विकास महामंडळाच्या वतीने गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात ७ लाख २७ हजार ८९८ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी ५ लाख ५९ हजार ७५९ क्विंटल धान भरडाईसाठी राईस मिलर्सकडे देण्यात आले. यापैकी ७३.८२ टक्के काम धान भरडाईचे झाले आहे. भरडाईनंतरचा तांदूळ जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडे जमा करण्यात आला आहे. याशिवाय अहेरी उपप्रादेशिक कार्यालयामार्फत खरीप हंगामात २ लाख ८२ हजार ४५७ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. या भागात भरडाईचे काम मंद गतीने सुरू आहे.