शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

उघड्यावरील ३५ लाखांचे धान पावसाने सडले

By admin | Updated: September 20, 2015 01:57 IST

एकीकडे राज्यातील शेतकरी दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे आत्महत्या करीत आहे. तर दुसरीकडे आदिवासी विकास महामंडळांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या उघड्यावरील धान्याची उचल करण्यात आली नाही.

वेळेवर उचल न झाल्याचा परिणाम : आदिवासी विकास महामंडळाला एटापल्लीत फटकाएटापल्ली : एकीकडे राज्यातील शेतकरी दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे आत्महत्या करीत आहे. तर दुसरीकडे आदिवासी विकास महामंडळांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या उघड्यावरील धान्याची उचल करण्यात आली नाही. यामुळे २०१४-१५ या वर्षात खरेदी केलेले ३५ लाख रूपयांच्या किमतीचे तब्बल सहा हजार धानाचे पोते पावसात भिजून सडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामुळे आदिवासी विकास महामंडळाला लाखो रूपयांचे नुकसान सहन करावे लागले. आदिवासी विकास महामंडळ नाशिक यांच्या अधिनस्त असलेल्या उपप्रादेशिक कार्यालय अहेरी यांच्या नियंत्रणात आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत २०१४-१५ या वर्षात एकूण १५ हजार ६७७ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. खरेदी केंद्रावरून या धानाची पावसाळ्यापूर्वी वेळेवर उचल करण्यात आली नाही. त्यामुळे धानाचे तब्बल सहा हजार पोते पावसात भिजल्याने ३५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. २०१४-१५ या हंगामात अहेरीच्या उप्रपादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या केंद्रांवरून एकूण १५ हजार ६७७ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. ३९ हजार १९३ पोते धान भरून उघड्यावर ठेवण्यात आले. ३ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत केवळ १७ हजार पोत्यांची उचल करण्यात आली. खरेदी करण्यात आलेल्या धानापैकी २१ हजार ९०८ पोते धान अद्यापही उघड्यावरच आहे. एटापल्ली तालुक्यात चालू वर्षाच्या हंगामात जारावंडी, घोटसूर, कोटमी, कसनसूर, हालेवारा, एटापल्ली, गट्टा आदी केंद्रांवरून धान खरेदी करण्यात आली. धान साठविण्याची कोणतीही पक्की सुविधा नाही. त्यामुळे दरवर्षी हा प्रश्न उद्भवतो. (तालुका प्रतिनिधी)२०११-१२ वर्षातीलही धान भिजलेएटापल्ली तालुक्यात २०११-१२ या वर्षातील हंगामात उपप्रादेशिक कार्यालय अहेरी अंतर्गत १० केंद्रांवरून १० कोटी रूपयांची धान खरेदी करण्यात आली होती. सदर धान केंद्राच्या परिसरात उघड्यावर ठेवण्यात आले होते. या धानाची उचल तब्बल तीन वर्षांनी म्हणजे २०१४ मध्ये करण्यात आली. तीन वर्ष उघड्यावरील धान पावसामुळे भिजल्यामुळे आदिवासी विकास महामंडळाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. शासनाच्या उदासीन धोरणामुळे खरेदी केलेल्या धानाची केंद्रावरून उचल करण्यात येत नाही. उलट उघड्यावरील धान सुरक्षित ठेवण्यासाठी व देखभाल करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाचे दरवर्षी लाखो रूपये खर्च होतात, हे येथे उल्लेखनिय.खरेदी केलेले धान उचल करण्याकरिता उपप्रादेशिक कार्यालयामार्फत वारंवार पत्र व्यवहार केला जातो. मात्र शासनाच्या जाचक अटीमुळे धानाची उचल करण्यात अडचणी येतात. वेळेवर धान उचल न होण्याचे कारण शासनाच्या जाचक अटी याच आहेत. - राहुल पाटील, व्यवस्थापक, उपप्रादेशिक कार्यालय अहेरी