शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

रेल्वेचे ओव्हर हेड ब्रेकर तुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2016 00:55 IST

देसाईगंज रेल्वेस्टेशनचे निर्माणाधिन कामे युध्दपातळीवर सुरू असून या कामांनी वेग घेतला आहे.

वाहनाची जबर धडक : रेल्वे वाहतूक पोलीस नेमण्याची गरजदेसाईगंज : देसाईगंज रेल्वेस्टेशनचे निर्माणाधिन कामे युध्दपातळीवर सुरू असून या कामांनी वेग घेतला आहे. दरम्यान रेल्वेचे विद्युतीकरण होत असल्याने रेल्वे विभागाने लावलेले दोन्ही बाजुचे ओव्हर हेड ब्रेकर एक महिन्याच्या फरकाने ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या धडकेमुळे पूर्णत: तुटले आहेत. त्यामुळे येथे रेल्वे वाहतूक पोलीस नेमण्याची गरज निर्माण झाली आहे.देसाईगंज रेल्वेस्टेशन हे देसाईगंज शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने या शहराची दोन भागात विभागणी झाली आहे. नॅरोगेज, ब्राडगेजमध्ये १९९३ ला रूपांतरीत झाले. तेव्हापासून बल्लारशहा ते गोंदिया या रेल्वे मार्गावर डिझेल इंजिनच्या माध्यमातून रेल्वे वाहतूक सुरू आहे. गोंदिया ते चंद्रपूर या डिझेल इंजिन मार्गावर आता रेल्वे विभागातर्फे रेल्वेचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर होत असून त्यासाठी रेल्वे विद्युत खांब गोंदिया-चंद्रपूरपर्यंत उभारण्यात येणार असून विद्युत तार जोडणीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. यासाठी भूयारी व साध्या मार्गाच्या रेल्वेपटरी ओलांडून जाणाऱ्या वाहनांसाठी ओव्हर हाईट ब्रेकर लावण्यात आले आहेत. सदर ओव्हर लाईट ब्रेकर रेल्वेच्या नियमानुसार व ज्या उंचीवरून हायव्होल्टेज वायर रेल्वे इंजिनच्या निकषानुसार बसविण्यात आले आहेत. या संबंधाने वडसा रेल्वेच्या मुख्य फाटकावर एक महिन्याच्या आदी पूर्व दिशेच्या बाजुला ओव्हर हाईट ब्रेकर लावण्यात आले. परंतु २४ तासातच एका ट्रान्सपोर्ट वाहतूक ट्रकने ओव्हर हाईटच्या मध्यभागी ब्रेकरला धडक दिल्याने सदर ब्रेकर पूर्णत: वाकला. तसेच पश्चिम दिशेच्या बाजुला १५ दिवसांपूर्वी लावण्यात आलेले ओव्हर हाईट ब्रेकर सोमवारच्या रात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वाकलेल्या अवस्थेत आहे. अशा प्रकारे रेल्वे विभागाने लावलेले दोन्ही ब्रेकर पूर्णत: निकामी झाले आहेत. रेल्वे फाटकाच्या पूर्व, पश्चिम दिशेला दर्शनी भागातच रेल्वे विभागाने सदर ब्रेकर लावावेत, जोपर्यंत भूयारी मार्ग सुरू होत नाही, तो पर्यंत सदर ब्रेकर लावू नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)जीवितहानीची शक्यता बळावलीसदर लावलेले दोन्ही हाईट ब्रेकर एकदम रेल्वे फाटकाच्या जवळ असल्याने ट्रक चालकाला उंचीचा अंदाज येत नाही. त्यामुळे ट्रक पूर्णपणे पश्चिमेकडील ब्रेकरच्या जवळ गेल्यावर उंची जास्त असल्याने ब्रेकरमधून ट्रक जाऊ शकत नाही. परिणामी फाटकाजवळच वाहतुकीची कोंडी निर्माण होते. जोराने धक्का लागल्यास शेकडो टन वजनाचा ब्रेकर खाली आल्यास जीवितहानीची शक्यता अधिक असते.