शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

अतिवृष्टीने दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 02:12 IST

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्याचे पर्जन्यमान जास्त असल्याने जिल्हावासीयांना पाऊस नवीन नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्याचे पर्जन्यमान जास्त असल्याने जिल्हावासीयांना पाऊस नवीन नाही. मात्र गेल्या दोन दिवसात वरुणराजाने चांगलेच डोळे वटारल्याने सर्वांची दाणादाण झाली. भामरागड आणि चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. यासोबत इतरही तालुक्यांमध्ये रस्त्यांसोबत नुकत्याच रोवणी केलेल्या धानाचे पऱ्हे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. आधीच कर्जमाफीला आणि बँकांकडून कर्जवाटप करण्यास झालेल्या विलंबामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना आता या नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. चामोर्शी : मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चामोर्शी तालुक्यात तब्बल एका रात्री ५१९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या पावसामुळे चामोर्शी - आष्टी मुख्य मार्ग बंद झाला आहे. तसेच तालुक्यातील सोनापूर येथील मामा तलावाची पाळ अविृष्टीमुळे फुटली. यामुळे चार ते पाच घरे पाण्यात वाहून गेली. तसेच २०० घरे व शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. तलाव फुटल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे या नागरिकांचे स्थलांतर चामोर्शी शहरात करण्यात आले आहे. चामोर्शी शहरातील शारदा राईस मिलजवळील तलावाची पाळ फुटल्याने चामोर्शी शहर पूर्णत: जलमय झाले आहे. अनेक घरात तलावाचे पाणी शिरले. गडचिरोली मार्गावरील शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय परिसरात तीन ते चार फुट पाणी शिरल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही. चामोर्शी माल येथील लिलाबाई शालिकराम ढवळे यांचे घर पावसामुळे पडले. येथीलच जानबा टेंभुर्णे यांच्या घराची मातीची भिंतही पडली. करपडा येथील देविदास धारणे यांचे घरही पावसामुळे रात्रीच्या सुमारास पडले. नुकसानग्रस्त घरांचा तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडून मौका पंचनामा करण्यात आला. मुसळधार पाऊस व अतिवृष्टीमुळे कुरखेडा तालुक्यातील पलसगड भागातील गरगळा येथून वाहणाऱ्या सती नदीला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास पूर आला. गरगळा येथील शेतकरी मधुकर राजीराम पुराम यांच्या मालकीचा बैल पुरात वाहून गेला. त्यामुळे पुराम यांचे २० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. पावसाने संपूर्ण जिल्हा जलमय झाला असून जीवन प्रभावित झाले आहे.