शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने अनेक रस्ते गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 01:23 IST

मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागड, एटापल्ली तालुक्यात दुर्गम भागातील अनेक रस्ते व पुलालगतचा भाग वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : भामरागड, एटापल्ली तालुक्यातील परिस्थितीएटापल्ली : मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागड, एटापल्ली तालुक्यात दुर्गम भागातील अनेक रस्ते व पुलालगतचा भाग वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे या भागातील वाहतुकीवरही परिणाम झाला असून या रस्त्यांच्या दुरूस्ती कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भामरागड-आरेवाडा मार्गावर असलेल्या पुलाजवळचा रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला आहे. तसेच एटापल्ली-गट्टा मार्गावरील बांडे नदीवर आलदंडी पुलाजवळचा रस्ताही खचला आहे. मागील आठ दिवसांपूर्वी ही घटना घडली. मात्र अजूनही सार्वजनिक बांधकाम खात्याने याची दुरूस्ती केलेली नाही. एटापल्ली-गट्टा मार्गाला जोडण्यासाठी २००० ते २००६ या कालावधीत सीमा सडक संघटनेच्या माध्यमातून आलदंडी नदीवरील पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. या कामाला माओवाद्यांचा प्रचंड विरोध असताना बीआरओचे तत्कालीन अभियंता गणेशन यांच्या पुढाकारातून हा रस्ता बांधण्यात आला. तेव्हापासून या रस्त्याची डागडुजीही करण्यात आलेली नव्हती. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस झाला. या पावसात एटापल्ली-गट्टा मार्गावरील या पुलाचा काही भाग व रस्ता खचून गेला आहे. त्यामुळे वाहतूक प्रभावित झाली आहे. हा रस्ता त्वरित दुरूस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)