शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

टीईटी नसलेल्या 500 वर शिक्षकांच्या नाेकऱ्या धाेक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 05:00 IST

टीईटी उत्तीर्ण नसलेले शिक्षक प्रामुख्याने अंशत: अनुदानित असलेल्या शाळांमध्ये आढळून येतात. यातील काही शिक्षक फेब्रुवारी २०१३ नंतर रुजू झाले असल्याने त्यांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण हाेणे आवश्यक करण्यात आले आहे. टीईटी उत्तीर्ण हाेण्यासाठी ३१ मार्च २०१९ पर्यंत शेवटची संधी देण्यात आली हाेती. मात्र यातील जवळपास ४० शिक्षक ही परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत. 

ठळक मुद्देआरटीईनुसार पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : पहिली ते आठवी वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या सर्वच माध्यमाच्या शिक्षकांना टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षा उत्तीर्ण हाेणे सक्तीचे केले आहे. मात्र जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा तसेच अंशत: अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेले अनेक शिक्षक टीईटी परीक्षा उत्तीर्ण नाहीत. अशा शिक्षकांच्या नाेकऱ्या आता धाेक्यात येण्याची शक्यता आहे. खासगी शिक्षण संस्थांना कायम विनाअनुदानित तत्त्वावर शाळांना मान्यता देण्याचे धाेरण राज्य शासनाने २००२ पासून अंमलात आणले. गडचिराेली जिल्ह्यात कायम विनाअनुदानित तत्त्वावरील ७२ शाळा हाेत्या. त्यापैकी ८ शाळा बंद करण्यात आल्या. ६० शाळांना २० ते ४० टक्केपर्यंत अंशत: अनुदान दिले जात आहे. ४ शाळांचे पुन:प्रस्ताव अनुदानासाठी पाठविण्यात आले आहेत. टीईटी उत्तीर्ण नसलेले शिक्षक प्रामुख्याने अंशत: अनुदानित असलेल्या शाळांमध्ये आढळून येतात. यातील काही शिक्षक फेब्रुवारी २०१३ नंतर रुजू झाले असल्याने त्यांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण हाेणे आवश्यक करण्यात आले आहे. टीईटी उत्तीर्ण हाेण्यासाठी ३१ मार्च २०१९ पर्यंत शेवटची संधी देण्यात आली हाेती. मात्र यातील जवळपास ४० शिक्षक ही परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत. टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्यांना सेवेत कायम ठेवण्याबाबतच्या याचिका औरंगाबाद खंडपीठात करण्यात आल्या आहेत. मात्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्याने या शिक्षकांच्या नाेकऱ्या धाेक्यात आल्या आहेत. 

इंग्रजी शाळांनाही टीईटी उत्तीर्ण शिक्षक सक्तीचे

खासगी संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा शासनाकडून परवानगी घेतात. त्यामुळे या शाळांना शासनाचे सर्वच नियम पाळणे आवश्यक आहे. राज्य बाेर्डाचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शाळांमधील शिक्षक टीईटी असणे आवश्यक आहे; तसेच सीबीएससी बाेर्डाचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शिक्षकांना सीटीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मात्र शिक्षण विभाग याकडे लक्ष देत नसल्याने या शाळांमधील ९९ टक्के शिक्षक टीईटी व सीईटी उत्तीर्ण झाले नसल्याचे दिसून येतात. या शाळांनाही टीईटी व सीटीईटी उत्तीर्ण असलेले शिक्षक नेमण्याची सक्ती करण्याची गरज आहे. 

जिल्हा परिषदेचे शिक्षक भाग्यशाली- जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांची नियुक्ती २०१३ पूर्वीची आहे. २०१९ मध्ये जवळपास ५० शिक्षकांची भरती करण्यात आली हाेती. हे सर्वच शिक्षक टीईटी उत्तीर्ण आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या शिक्षकांना या निकालाने काहीच फरक पडला नाही. - टीईटी परीक्षा सर्वसाधारण कठिण राहते. मात्र अंशत: अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेले शिक्षक ४० ते ५० वर्षाच्या दरम्यानचे आहेत. त्यामुळे त्यांना अभ्यास करण्याची सवय राहिली नाही. त्यामुळे टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे अनेकांना कठिण जात आहे. त्यामुळेच ते सुट देण्याची मागणी करीत आहेत. 

शिक्षणाधिकारी म्हणतात, चारच शिक्षकजिल्ह्यात टीईटी उत्तीर्ण नसलेले चारच शिक्षक आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी निकम यांनी दिली आहे. मात्र ‘लाेकमत’ने काही मुख्याध्यापकांना फाेन करून विचारले असता, टीईटी उत्तीर्ण नसलेले ४० पेक्षा अधिक शिक्षक असल्याची शक्यता वर्तविली आहे. 

आयुष्याच्या शेवटी नाेकरी मिळाली;तीही जाण्याचा धाेका; शिक्षक पडले चिंतेतकाही शिक्षक २०१३ पूर्वीच शाळांमध्ये शिकवायला लागले. मात्र त्यांच्या पदाला मान्यता २०१३ नंतर घेण्यात आली. त्यामुळे हे शिक्षक टीईटीच्या चक्रव्यूहात सापडले आहेत. या शाळांमध्ये कार्यरत असलेले काही शिक्षक ४५ ते ५० वर्षांचे आहेत. नाेकरीच्या शेवटच्या टप्प्यात वेतन सुरू झाले; मात्र टीईटी नसल्याने आता नाेकरी जाण्याचा धाेका आहे.  नाेकरी गेल्यास संसार कसा करावा, असा प्रश्न शिक्षकांसमाेर निर्माण झाला आहे. 

 

टॅग्स :Teacherशिक्षक