शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शहरी भागातील आणखी काही नेते पोलिसांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 15:54 IST

शहरी भागात माओवादी विचार पेरून केवळ सरकारच नाही तर लोकशाही व्यवस्थेला उलथवून लावण्याचा डाव आखण्याचा आरोप असलेले राज्यातील आणखी काही नेते पोलिसांच्या रडारवर आहेत.

ठळक मुद्देनक्षल समर्थनाचा आरोपसाईबाबाप्रमाणेच त्यांचीही कार्यपद्धती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरी भागात माओवादी विचार पेरून केवळ सरकारच नाही तर लोकशाही व्यवस्थेला उलथवून लावण्याचा डाव आखण्याचा आरोप असलेले राज्यातील आणखी काही नेते पोलिसांच्या रडारवर आहेत. नक्षल समर्थनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या प्रा.साईबाबाप्रमाणेच त्यांचीही कार्यपद्धती असून पुढील काळात त्यांनाही अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईत वरवरा राव याच्यासह एकूण पाच जणांना नक्षल समर्थनाच्या आरोपाखाली स्थानबद्ध केले आहे. त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. नागरी क्षेत्रात राहून विद्यार्थी, बेरोजगार युवक, महिला, शेतकरी, कामगार, सांस्कृतिक संघटनांमार्फत सरकारविरूद्ध माओवादाचे ‘स्लो पॉयझन’ ते देतात. त्यासंबंधीचे भक्कम पुरावेसुद्धा असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. सामाजिक अशांतता निर्माण करून सरकारविरूद्ध आवाज उठवणे आणि बंदूक हातात घेऊनच आपले हक्क मिळतील, हे त्यांच्यावर बिंबवण्याचा प्रयत्न विविध माध्यमातून केला जात आहे. जे लोक यातून प्रभावित होतात त्यांना हेरून संघटनेत सक्रिय करणे, अशी नागरी क्षेत्रात वावरणाऱ्या नक्षल समर्थकांची कार्यपद्धती आहे.हैदराबाद येथे ज्या वरवरा राव याला स्थानबद्ध करण्यात आले तो नक्षलींसाठी नागरी क्षेत्रात काम करणाऱ्या रिव्हॅल्युशनरी डेमोक्रॅटिक फ्रंटचा (आरडीएफ) अध्यक्ष आहे. प्रा.साईबाबा हा याच संघटनेचा सचिव म्हणून काम पहात होता. नक्षलींसाठी नागरी क्षेत्रात काम करणाऱ्या दोन वेगवेगळ्या संघटनांना एकत्रित करून २००४ मध्ये आरडीएफची स्थापना करण्यात आली. नक्षल चळवळीसाठी ‘थिंक टँक’ म्हणून काम करण्यासोबतच चळवळीसाठी पैसा गोळा करण्याचे कामही ही संघटना करत असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

१०० गावांत सरकार स्थापण्याचा उद्देशगेल्या वर्षभरात गडचिरोली पोलिसांनी आक्रमकपणे कारवाई केलेल्या छत्तीसगडमधील अबुझमाड, भामरागड भागातील १०० गावांत ‘आपले सरकार’ स्थापन्याचा संकल्प नक्षलींनी २००३ मध्ये केला होता. नागरिकांना आपल्या प्रभावाखाली आणून आपली हुकूमत गाजविण्याचा नक्षलींचा उद्देश काही प्रमाणात यशस्वीही झाला. मात्र अलिकडे पोलिसांनी आक्रमक कारवाईसोबतच नागरी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पोलीस व लोकशाही व्यवस्थेबद्दल विश्वास निर्माण केल्याने नक्षलवाद्यांचे मनसुबे यशस्वी झाले नाहीत.

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादी