शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

शहरी भागातील आणखी काही नेते पोलिसांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 15:54 IST

शहरी भागात माओवादी विचार पेरून केवळ सरकारच नाही तर लोकशाही व्यवस्थेला उलथवून लावण्याचा डाव आखण्याचा आरोप असलेले राज्यातील आणखी काही नेते पोलिसांच्या रडारवर आहेत.

ठळक मुद्देनक्षल समर्थनाचा आरोपसाईबाबाप्रमाणेच त्यांचीही कार्यपद्धती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरी भागात माओवादी विचार पेरून केवळ सरकारच नाही तर लोकशाही व्यवस्थेला उलथवून लावण्याचा डाव आखण्याचा आरोप असलेले राज्यातील आणखी काही नेते पोलिसांच्या रडारवर आहेत. नक्षल समर्थनाच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या प्रा.साईबाबाप्रमाणेच त्यांचीही कार्यपद्धती असून पुढील काळात त्यांनाही अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईत वरवरा राव याच्यासह एकूण पाच जणांना नक्षल समर्थनाच्या आरोपाखाली स्थानबद्ध केले आहे. त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. नागरी क्षेत्रात राहून विद्यार्थी, बेरोजगार युवक, महिला, शेतकरी, कामगार, सांस्कृतिक संघटनांमार्फत सरकारविरूद्ध माओवादाचे ‘स्लो पॉयझन’ ते देतात. त्यासंबंधीचे भक्कम पुरावेसुद्धा असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. सामाजिक अशांतता निर्माण करून सरकारविरूद्ध आवाज उठवणे आणि बंदूक हातात घेऊनच आपले हक्क मिळतील, हे त्यांच्यावर बिंबवण्याचा प्रयत्न विविध माध्यमातून केला जात आहे. जे लोक यातून प्रभावित होतात त्यांना हेरून संघटनेत सक्रिय करणे, अशी नागरी क्षेत्रात वावरणाऱ्या नक्षल समर्थकांची कार्यपद्धती आहे.हैदराबाद येथे ज्या वरवरा राव याला स्थानबद्ध करण्यात आले तो नक्षलींसाठी नागरी क्षेत्रात काम करणाऱ्या रिव्हॅल्युशनरी डेमोक्रॅटिक फ्रंटचा (आरडीएफ) अध्यक्ष आहे. प्रा.साईबाबा हा याच संघटनेचा सचिव म्हणून काम पहात होता. नक्षलींसाठी नागरी क्षेत्रात काम करणाऱ्या दोन वेगवेगळ्या संघटनांना एकत्रित करून २००४ मध्ये आरडीएफची स्थापना करण्यात आली. नक्षल चळवळीसाठी ‘थिंक टँक’ म्हणून काम करण्यासोबतच चळवळीसाठी पैसा गोळा करण्याचे कामही ही संघटना करत असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

१०० गावांत सरकार स्थापण्याचा उद्देशगेल्या वर्षभरात गडचिरोली पोलिसांनी आक्रमकपणे कारवाई केलेल्या छत्तीसगडमधील अबुझमाड, भामरागड भागातील १०० गावांत ‘आपले सरकार’ स्थापन्याचा संकल्प नक्षलींनी २००३ मध्ये केला होता. नागरिकांना आपल्या प्रभावाखाली आणून आपली हुकूमत गाजविण्याचा नक्षलींचा उद्देश काही प्रमाणात यशस्वीही झाला. मात्र अलिकडे पोलिसांनी आक्रमक कारवाईसोबतच नागरी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पोलीस व लोकशाही व्यवस्थेबद्दल विश्वास निर्माण केल्याने नक्षलवाद्यांचे मनसुबे यशस्वी झाले नाहीत.

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादी