शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

नक्षलवाद्यांना विरोध करून विकासाच्या प्रवाहात या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2017 00:59 IST

मागील काही वर्षांपासून नक्षलवाद्यांनी दुर्गम भागातील अशिक्षित लोकांचा व झुडपी जंगलाचा आधार घेऊन

अरविंद सोवनी यांचे आवाहन : नक्षल्यांच्या बालेकिल्ल्यात छल्लेवाडा येथे भूमकाल संघटनेची धिक्कार सभारेपनपल्ली : मागील काही वर्षांपासून नक्षलवाद्यांनी दुर्गम भागातील अशिक्षित लोकांचा व झुडपी जंगलाचा आधार घेऊन आदिवासी नागरिकांचे मोठे नुकसान केले आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायामुळे दुर्गम भागाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे नागरिकांनी नक्षलवाद्यांना विरोध करून विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन भूमकाल संघटनेचे पदाधिकारी अरविंद सोवनी यांनी केले. नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कमलापूरवरून चार किमी अंतरावरील छल्लेवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भूमकाल संघटनेतर्फे धिक्कार सभा शनिवारी घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर भूमकाल संघटनेचे अ‍ॅड. गोडाने, नागपूर विभागाचे बौध्द धम्म प्रचारक संघप्रीय गौतम , अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे, प्रा. डॉ. श्रीकांत भोवते, प्रशांत विधे, रेपनपल्लीचे पोलीस निरिक्षक विठ्ठल दुरपडे, पोलीस उपनिरिक्षक ढोबले आदी मान्यवर उपस्थित होते. बौध्द धम्म प्रचारक संघप्रिय गौतम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर नागरीकांनी मार्गक्रमण करावे, असे सांगितले. डॉ. श्रीकांत भोवते म्हणाले, डॉ. आंबेडकर यांच्या विचारावर आम्ही चालतो, असे नक्षलवादी सांगतात. जर नक्षलवादी डॉ. आंबेडकर यांच्या विचारावर चालले असते तर गतवर्षी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी आमदार दीपक आत्राम यांच्या अंगरक्षकाची हत्या नक्षलवाद्यांनी केली नसती. नक्षलवादी आंबेडकरांच्या विचारावर चालत असतील तर ते बंदुकीचा आश्रय का घेतात, असा सवाल भोवते यांनी यावेळी उपस्थित केला. गावातील लोक नक्षलवाद्यांना अन्न, पाणी, निवारा आदी वस्तू देत असतात. मात्र नक्षलवादी लोकांना मदत करण्याऐवजी त्यांची हत्या करीत असतात. नक्षलवाद ही समस्या केवळ गडचिरोली जिल्ह्यात नसून भारतातील १३ राज्यात कायम आहे. नक्षलवादी लोकांना मदत करण्यासाठी काम करीत नसून लोकांना सरकारकडून मिळणाऱ्या सोयीसुविधापासून वंचित ठेवण्याचे काम करतात. छल्लेवाडा गावातील पाच दलित व्यक्तींची नक्षलवाद्यांनी हत्या केली, असे त्यांनी सांगितले. यावेळी सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सदर धिक्कार सभेला छल्लेवाडा परिसरातील गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)भविष्य अंधारात न ठेवण्याची केली सूचनाछल्लेवाडा या अतिदुर्गम भागात आजही पक्के रस्ते नाही. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा नाही. कच्चा रस्ता आहे पण त्यावर पूल नाही. याशिवाय अनेक समस्या कायम आहे. शासन व प्रशासन दुर्गम गावात सोयीसुविधा देऊन गावाचा विकास करण्याचा प्रयत्न करीत असते. मात्र विकासकामाला नक्षलवादी विरोध करीत असल्याने विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे नक्षलवाद्यांना आधार देऊन आपले भविष्य अंधारात ठेवू नका. नक्षलवाद्यांना हाकलून लावून समाजाच्या मुख्य प्रवाहात या, अशी सूचना भूमकाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना केली.