शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
2
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
3
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
4
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
6
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
7
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
8
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
9
गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
10
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
11
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
12
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
13
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
14
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
15
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
16
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
17
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
18
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
19
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
20
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात

गडचिरोलीत विकासाला संधी

By admin | Updated: December 13, 2015 01:29 IST

गडचिरोली जिल्हा हा नैसर्गिक संपदा आणि खनिजांनी समृद्ध आहे. येथे नवीन उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. अनेक पर्यटनस्थळ तर जागतिक दर्जाची होऊ शकतात.

राजे अंबरीश आत्राम : पर्यटन क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरजनागपूर : गडचिरोली जिल्हा हा नैसर्गिक संपदा आणि खनिजांनी समृद्ध आहे. येथे नवीन उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. अनेक पर्यटनस्थळ तर जागतिक दर्जाची होऊ शकतात. नक्षलवादाची समस्यादेखील बरीच कमी झाली असून गडचिरोली जिल्ह्याबाबत नकारात्मक भाव दूर करण्याची गरज असल्याचे मत आदिवासी विकास राज्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अंबरीश आत्राम यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’ कार्यालयाला त्यांनी शुक्रवारी सदिच्छा भेट दिली व संपादकीय सहकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे, गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी उपस्थित होते.एक काळ होता जेव्हा गडचिरोली जिल्ह्याच्या समस्येबाबत कुठेही चर्चा होत नव्हती. परंतु केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे नवी दिल्लीत जिल्ह्याच्या विकासाबाबत सकारात्मक चर्चा झाली, असे ते म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद बराच कमी झाला आहे. येथे येणाऱ्या लोकांनी त्याची भीती बाळगायची गरज नाही. गडचिरोलीमध्ये निधी नव्हे तर अधिकाऱ्यांची कमतरता जाणवते. नक्षलवादाची समस्या विकासातून दूर होऊ शकते, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले. गडचिरोली जिल्हा अजूनदेखील मागास आहे. त्यामुळे येथे मोठ्या कंपन्या आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. वनउत्पादनांनादेखील प्रोत्साहन देण्यासाठी चर्चा झाली आहे. गडचिरोलीमध्ये अनेक दुर्लक्षित पर्यटनस्थळे आहेत. यांचा प्रसार करण्यात येणार आहे, असेदेखील त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील बेरोजगारी दूर करण्यावर तसेच रेल्वे व रस्त्यांच्या विकासावर विशेष भर देण्याची गरज आहे, असे मत कृष्णा गजबे यांनी व्यक्त केले तर जिल्ह्याच्या विकासासाठी विकास योजना तयार व्हावी व योग्य नियोजनातून विकासकार्यांची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा देवराव होळी यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)