शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
5
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
6
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
7
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
8
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
9
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
10
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
11
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
12
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
13
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
14
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
15
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
16
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
17
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
18
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
20
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?

गडचिरोलीत विकासाला संधी

By admin | Updated: December 13, 2015 01:29 IST

गडचिरोली जिल्हा हा नैसर्गिक संपदा आणि खनिजांनी समृद्ध आहे. येथे नवीन उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. अनेक पर्यटनस्थळ तर जागतिक दर्जाची होऊ शकतात.

राजे अंबरीश आत्राम : पर्यटन क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरजनागपूर : गडचिरोली जिल्हा हा नैसर्गिक संपदा आणि खनिजांनी समृद्ध आहे. येथे नवीन उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. अनेक पर्यटनस्थळ तर जागतिक दर्जाची होऊ शकतात. नक्षलवादाची समस्यादेखील बरीच कमी झाली असून गडचिरोली जिल्ह्याबाबत नकारात्मक भाव दूर करण्याची गरज असल्याचे मत आदिवासी विकास राज्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अंबरीश आत्राम यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’ कार्यालयाला त्यांनी शुक्रवारी सदिच्छा भेट दिली व संपादकीय सहकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे, गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी उपस्थित होते.एक काळ होता जेव्हा गडचिरोली जिल्ह्याच्या समस्येबाबत कुठेही चर्चा होत नव्हती. परंतु केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे नवी दिल्लीत जिल्ह्याच्या विकासाबाबत सकारात्मक चर्चा झाली, असे ते म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद बराच कमी झाला आहे. येथे येणाऱ्या लोकांनी त्याची भीती बाळगायची गरज नाही. गडचिरोलीमध्ये निधी नव्हे तर अधिकाऱ्यांची कमतरता जाणवते. नक्षलवादाची समस्या विकासातून दूर होऊ शकते, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले. गडचिरोली जिल्हा अजूनदेखील मागास आहे. त्यामुळे येथे मोठ्या कंपन्या आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. वनउत्पादनांनादेखील प्रोत्साहन देण्यासाठी चर्चा झाली आहे. गडचिरोलीमध्ये अनेक दुर्लक्षित पर्यटनस्थळे आहेत. यांचा प्रसार करण्यात येणार आहे, असेदेखील त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील बेरोजगारी दूर करण्यावर तसेच रेल्वे व रस्त्यांच्या विकासावर विशेष भर देण्याची गरज आहे, असे मत कृष्णा गजबे यांनी व्यक्त केले तर जिल्ह्याच्या विकासासाठी विकास योजना तयार व्हावी व योग्य नियोजनातून विकासकार्यांची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा देवराव होळी यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)