शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

पर्यटनाने रोजगाराच्या संधी

By admin | Updated: August 11, 2014 23:56 IST

गडचिरोली जिल्हा हा निसर्गाच्या विविध उधळणीने नटलेला आहे. या ठिकाणी शेकडो पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांचा विकास केल्यास बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

रमेश बोरकर - मालेवाडागडचिरोली जिल्हा हा निसर्गाच्या विविध उधळणीने नटलेला आहे. या ठिकाणी शेकडो पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांचा विकास केल्यास बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. मात्र शासनाचे दुर्लक्ष व नक्षल्यांची दहशत यामुळे गडचिरोली जिल्ह्यात पर्यटन स्थळाचा विकास अजूनपर्यंत झालेला नाही.पर्यटन स्थळ म्हणून विदर्भाची काशी म्हणून ओळखले जाणारे मार्कंडेश्वर देवालय, चपराळा येथील त्रिवेणी संगम, अभयारण्य, रेगडी येथील कन्नमवार जलाशय, आलापल्ली येथील ग्लोरी आॅफ फॉरेस्ट, आलापल्ली येथे रानम्हशींसाठी राखीव असलेले अभयारण्य, कमलापूर येथील हत्तीकॅम्प, गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेले कालेश्वर मंदिर, लाकडाचे विश्रामगृह, बांडिया व पामूलगौतम नदीचा संगम, सोमनूरच्या त्रिवेणी संगम, इंद्रावती, प्राणहिता व गोदावरी येथील गरम पाण्याचे झरे, लख्खामंडा येथील प्राचीण लाक्षागृह, नैसर्गिक खुले रंगमंच, लोक बिरादरी प्रकल्प, भामरागड अभयारण्य, माडिया आदिवासी संस्कृती, सुरजागड येथील लोहखनिज व सुरजागडचा किल्ला, आमगाव येथील प्राचीन मंदिर, डोंगरगाव, अरततोंडी येथील शिवमंदिरे, खोब्रामेंढा, टिपागड येथील भूईपोट किल्ले, वैरागड येथील प्राचीन मंदिर, गोरजाईचा डोह, किल्ल्याचे प्रवेशद्वार, धानोरा, डोंगरगाव सोनसरी पहाडावरील चिचपाणी झरा अशी शेकडो पर्यटन स्थळे आहेत. महत्वाचे म्हणजे यातील बहुतांश पर्यटन स्थळे दुर्गम व घनदाट जंगलात आहेत. त्यामुळे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देतांना बऱ्याच अडचणींचा सामना पर्यटकांना करावा लागतो. यातील काही स्थळांपर्यत अजूनही पक्के रस्ते नाहीत. त्यामुळे कित्येक किलोमीटर जागा पायी जावे लागते. मागील अनेक वर्षांपासून या स्थळांची डागडूजी करण्यात आली नाही. त्यामुळे ही स्थळे जीर्णावस्थेपर्यंत पोहोचली आहेत. अप्रतीम, ऐतिहासीक व स्थळे असले तरी याकडे पर्यटकांचे दुर्लक्ष होण्यामागे नक्षल्यांची दहशत हे सुध्दा महत्वाचे कारण आहे. या स्थळांचा विकास झाला असता तर आजपर्यंत मोठ्या प्रमाणात पर्यटनाला चालना मिळाली असती. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला असता. पर्यटकांना घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी चहा, अल्पोपहार उपलब्ध करून देणे, पर्यटकांची अडचण दूर करणे, त्यांना रस्ते, थांबे, पर्यटनस्थळांविषयीची माहिती देणे आदींच्या माध्यमातून रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते. रोजगार पुरविण्यासाठी सध्या वनविभाग पुढाकार घेत आहे. पर्यटनस्थळांचा विकास केल्यास रोजगारात भर पडण्यास मदत होईल.