शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

अंबेझरावासीयांनी गाव सोडण्यास दर्शविला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:15 IST

अहेरी तालुक्यातील अंबेझरा हे गाव अभयारण्यांतर्गत येत असल्याने या गावातील नागरिकांनी दुसरीकडे स्थलांतरीत व्हावे, ...

ठळक मुद्देअभयारण्यात गावाचा समावेश : राजकीय पदाधिकाºयांनी घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी तालुक्यातील अंबेझरा हे गाव अभयारण्यांतर्गत येत असल्याने या गावातील नागरिकांनी दुसरीकडे स्थलांतरीत व्हावे, यासाठी वन विभागाने रेटा चालविला आहे. मात्र गावातील नागरिकांनी गाव सोडून जाण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.अंबेझरा हे गाव लखामेंढा पाहडीनंतर ६ किमी अंतरावर आहे. या गावाला येरमनारचे सरपंच बालाजी गावडे, कमलापूरचे माजी सरपंच सांबय्या करपेत, कमलापूरचे उपसरपंच शंकर आत्राम, संतोष मडावी यांनी शनिवारी गावकºयांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. अंबेझरा गाव अभयारण्याच्या क्षेत्रात येत असल्याने सदर गाव सोडून जावे, असा ससेमिरा वन विभागाच्या कर्मचाºयांनी लावला आहे.अंबेझरा गावाला पेसा कायद्यांतर्गत तसेच वनाधिकार कायद्यानुसार जमीन मिळाली आहे. अनेकांकडे वडिलोपार्जित जमीन आहे. सदर जमीन सुपीक असल्याने शेतीतील उत्पन्नाच्या भरवशावर येथील नागरिक जीवन जगत आहेत. अशा परिस्थितीत गाव सोडून जाणे शक्य नाही. वन विभागाने कोणतेही कारवाई केले तरी आपण गाव सोडणार नाही, असा निर्धार गावातील नागरिकांनी केला आहे. पेसा कायद्यांतर्गत गावासभोवतालच्या जल, जमीन व जंगलावर स्थानिक नागरिकांचा अधिकार आहे. सदर अधिकार राज्यघटनेने बहाल केला आहे. त्यामुळे वन विभाग तर सोडाच सरकार सुध्दा गावातून हटवू शकणार नाही, असा सल्ला बालाजी गावडे यांनी दिला आहे.