शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
3
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
4
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
5
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
6
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
7
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
8
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
9
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
10
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
11
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
12
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
13
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
14
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
15
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
16
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
17
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
18
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
19
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
20
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!

चार वसतिगृहांसाठी एकच गृहपाल

By admin | Updated: September 24, 2014 23:29 IST

आदिवासी विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन आदिवासी विकास विभागाने वसतिगृह विस्तारीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमांतर्गत पोटेगाव मार्गावर २ नवीन वसतिगृहांच्या प्रशस्त

आचारसंहितेचा फटका : गृहपालाच्या एका पदाची नियुक्ती रखडलीगडचिरोली : आदिवासी विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन आदिवासी विकास विभागाने वसतिगृह विस्तारीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमांतर्गत पोटेगाव मार्गावर २ नवीन वसतिगृहांच्या प्रशस्त इमारती उभारण्यात आल्या. आता या ठिकाणी जुने व नवीन मिळून चार वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. मात्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. सद्यस्थितीत एकच गृहपाल या चारही वसतिगृहाचा कारभार सांभाळत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत एका गृहपालाची नियुक्ती रखडली असल्याची माहिती आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आदिवासी विकास विभागाने राज्यभरात अनेक शासकीय आश्रमशाळा व वसतिगृह सुरू केले आहे. या वसतिगृहाच्या माध्यमातून नवोपक्रम हाती घेतले आहे. मात्र अनेक शासकीय आश्रमशाळा तसेच वसतिगृहांमध्ये पुरेसे कर्मचारी नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहिजे त्या प्रमाणात उंचावत नसल्याचे वास्तवही पुढे आले आहे. आदिवासी विद्यार्थी व नागरिकांच्या उत्थानासाठी राज्य शासनाकडून आदिवासी विकास विभागाला दरवर्षी कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त होतो. मात्र आदिवासी विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने दुर्गम भागातील आदिवासी अद्यापही विकासापासून वंचित असल्याचे दिसून येते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत पोटेगाव मार्गावरील मुलांच्या क्रमांक १ व क्रमांक २ च्या वसतिगृहात ७५ प्रमाणे १५० विद्यार्थी निवासी राहत होते. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी दोन नवीन वसतिगृहाच्या इमारती याच ठिकाणी उभारण्यात आल्या. दोन नव्या वसतिगृहात १०० प्रमाणे एकूण २०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. सद्यस्थितीत चारही वसतिगृहाची मिळून एकूण ३५० विद्यार्थी निवासी राहून शहरातील विविध महाविद्यालयातील शिक्षण घेत आहेत. चार वसतिगृह असले तरी दोनच वसतिगृहाचे कर्मचारी कार्यरत आहेत. विस्तारीत वसतिगृहांमध्ये आदिवासी विकास विभागाच्यावतीने नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. नियुक्ती संदर्भात वरिष्ठ स्तरावरून कोणत्याही प्रकारचे नियोजन तुर्तास नसल्याची माहिती मिळाली आहे.सप्टेंबर २०१३ पासून नवे दोन वसतिगृह सुरू करण्यात आले. प्रवेश प्रक्रिया राबवून या नव्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. मात्र वाढीव वसतिगृहांसाठी वर्षभराचा कालावधी लोटूनही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे दोन वसतिगृहात कार्यरत असलेल्या जुन्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)