शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदी पात्रात केवळ पाच टक्के जलसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 01:15 IST

यंदाच्या खरीप हंगामात झालेला अत्यल्प पाऊस व दिवसेंदिवस उष्णतामान वाढत असल्याने वैनगंगा नदी पात्रात केवळ पाच टक्के जलसाठा शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे.

सर्वत्र अपुरा पाणी पुरवठा : पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त; मे महिन्यात जलसंकट आणखी तीव्र होणारदेसाईगंज : यंदाच्या खरीप हंगामात झालेला अत्यल्प पाऊस व दिवसेंदिवस उष्णतामान वाढत असल्याने वैनगंगा नदी पात्रात केवळ पाच टक्के जलसाठा शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे. परिणामी देसाईगंज शहरासह संपूर्ण तालुक्यात नळाद्वारे अपुरा पाणी पुरवठा होत आहे. देसाईगंज शहराची लोकसंख्या जवळपास ४० हजार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात एका व्यक्तीला ७० लिटर पाण्याची गरज असते. यानुसार देसाईगंज शहरातील ४० हजार लोकसंख्येला दररोज २ कोटी ८ लाख लिटर पाणी पुरवठा करणे अत्यावश्यक आहे. मात्र पाणी टंचाईमुळे सद्य:स्थितीत प्रती दिवस एका व्यक्तीला केवळ १० ते २० लिटर पाणी मिळत आहे. पालिकेच्या वतीने शहरवासीयांना दररोज केवळ आठ लाख लिटर पाणी नळाद्वारे दिले जात आहे. परिणामी पाण्यासाठी नागरिक त्रस्त झाले आहेत. पालिकेच्या वतीने जल प्राधिकरण नळ योजनेत एकूण १७ लाख ५० लिटर पाणी क्षमतेची टाकी बांधण्यात आली आहे. या टाकीच्या माध्यमातून दिवसातून केवळ एकदाच नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा केला जाऊ शकतो. मात्र दिवसातून दोनवेळा पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेला अडचणी येत आहेत. नळ कुटुंबधारकांकडे पाण्याची साठवणूक करण्याची व्यवस्था नसल्याने दिवसातून एकदा होणारे पाण्याची पूर्णत: साठवणूक होऊ शकत नाही. त्यामुळे पालिकेने दिवसातून दोनदा पाणी पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)