शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

केवळ ५० टक्के धानाची भरडाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:03 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सन २०१७-१८ या खरीप हंगामात गडचिरोली व अहेरी या दोन्ही कार्यालयामार्फत ६० वर केंद्रांवरून एकूण ५ लाख ६ हजार ६८३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.

ठळक मुद्देअडीच लाख क्विंटल धान केंद्रांवरच पडूनदीड लाख क्विंटल तांदूळ पुरवठा विभागाकडे जमा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत सन २०१७-१८ या खरीप हंगामात गडचिरोली व अहेरी या दोन्ही कार्यालयामार्फत ६० वर केंद्रांवरून एकूण ५ लाख ६ हजार ६८३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी २ लाख ४३ हजार ७७८ क्विंटल इतक्या धानाची भरडाई झाली असून या भरडाईची टक्केवारी ५० टक्क्यावर पोहोचली आहे. भरडाईसाठी केंद्रांवरून धानाची उचल करण्यास दिरंगाई होत असल्याने अद्यापही तब्बल २ लाख ५९ हजार ९०४ क्विंटल धान केंद्रावर पडून आहे.५ लाख ६ हजार ६८३ क्विंटल धानापैकी २ लाख ४६ हजार ७७८ क्विंटल धान भरडाईसाठी महामंडळाच्या वतीने मिलर्सना देण्यात आले. आतापर्यंत २ लाख ४६ हजार ७७८ क्विंटल धानाची भरडाई झाली आहे. धानाची भरडाई झाल्यानंतर ६७ टक्क्याप्रमाणे तांदूळ येत असतो. त्यानुसार भरडाई झालेल्या एकूण धानामधून १ लाख ६२ हजार ३४१ क्विंटल इतका कच्चा तांदूळ निघाला. यापैकी १ लाख ५१ हजार ६२८ क्विंटल कच्चा तांदूळ जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे जमा आहे, अशी माहिती आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. मिलर्सकडे अद्यापही १३ हजार ७१३ क्विंटल तांदूळ शिल्लक आहे.गतवर्षीच्या खरीप हंगामात आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने ३ लाख ६३ हजार ६५७ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. तर अहेरी कार्यालयांतर्गत असलेल्या केंद्रांवरून १ लाख ३८ हजार २६ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था व महामंडळाकडे पुरेशी गोदाम व्यवस्था नाही. सध्या उन्हाळा सुरू असूनही वातावरणात बदल घडून अवकाळी पाऊस बरसत आहे. काही दिवसांपूर्वी अहेरी उपविभागात तसेच जिल्ह्याच्या इतर विभागात वादळी पाऊस बरसला. अशाच प्रकारचा पाऊस येत्या काही दिवसात झाल्यास केंद्रांवर असलेल्या धानाची नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.खरीप हंगामात आविका संस्थांच्या केंद्रांवर धान विक्री केलेल्या संबंधित शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार बोनस देण्याची तरतूद आहे. ५ ते ४९ क्विंटल धान खरेदी धान विक्री केलेल्या शेतकºयांना प्रती क्विंटल २०० रूपये बोनस आदिवासी विकास महामंडळाकडून दिला जातो.रबी हंगामाच्या उन्हाळी धानासाठी १४ केंद्रेकुरखेडा, कोरची, आरमोरी या तीन तालुक्यात रबी हंगामात उन्हाळी धानपीक शेतकरी घेतात. आता उन्हाळी धान पिकाची मळणी सुरू असल्याने महामंडळाने या तीन तालुक्यात १४ धान खरेदी केंद्रे सुरू केले आहे. यामध्ये कुरखेडा तालुक्यातील आंधळी, कढोली, कुरखेडा, घाटी, सोनसरी, गेवर्धा, वडेगाव, देऊळगाव, गोठणगाव, कोरची तालुक्यातील बेतकाठी, रामगड, गॅरापत्ती, येंगलखेडा व आरमोरी तालुक्यातील अंगारा, देलनवाडी केंद्राचा समावेश आहे.