शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

केवळ २० टक्के जनतेचा सरकारी विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:22 IST

देशातील जनतेला विमा संरक्षण प्राप्त व्हावे, यासाठी केंद्र शासनाने सुरक्षा विमा योजना व जीवनज्योती योजना सुरू केल्या आहेत. सुरूवातीच्या कालावधीत या योजनांची चांगली प्रचार प्रसिध्दी झाल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या योजनांतर्गत विमा काढला.

ठळक मुद्देदोन लाख नागरिकांचा विमा : योजनांचा प्रसार-प्रचार थांबला

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशातील जनतेला विमा संरक्षण प्राप्त व्हावे, यासाठी केंद्र शासनाने सुरक्षा विमा योजना व जीवनज्योती योजना सुरू केल्या आहेत. सुरूवातीच्या कालावधीत या योजनांची चांगली प्रचार प्रसिध्दी झाल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या योजनांतर्गत विमा काढला. त्यानंतर मात्र प्रशासनाने प्रचार प्रसिध्दी थांबविल्याने विमा काढणे बंद झाले आहे. पाच वर्षांचा कालावधी उलटूनही केवळ २० टक्के जनतेचा विमा काढण्यात आला आहे.प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व जीवनज्योती योजना या विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुचविलेल्या विशेष योजना आहेत. योजनांची सुरूवात २०१५ मध्ये करण्यात आली. सुरूवातीच्या कालावधीत या योजनांची मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिध्दी करण्यात आली. अत्यंत कमी प्रिमीअममध्ये या दोन्ही योजनांचा लाभ घेता येत असल्याने अनेक नागरिकांनी विमा काढला. त्यानंतर मात्र केंद्र शासन, राज्य शासन व प्रशासनाने सुध्दा या योजनांच्या प्रचार प्रसिध्दीकडे दुर्लक्ष केले. परिणामी विमा काढणाऱ्यांची संख्या पाहिजे, त्या प्रमाणात वाढू शकली नाही. योजना सुरू होऊन चार वर्षांचा कालावधी उलटत चालला तरी केवळ २० टक्के जनतेनेच विमा काढला आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाखांपेक्षा अधिक आहे. किमान ९ लाख लोकसंख्येचा विमा उतरविणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत केवळ १ लाख ३९ हजार ६७४ नागरिकांनी विमा काढला आहे. तर जीवन ज्योती योजनेंतर्गत ६२ हजार ९७२ नागरिकांचा विमा निघाला आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत वर्षाचे केवळ १२ रुपये प्रती वर्ष भरावे लागतात. तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत वार्षिक केवळ ३३० रुपये भरावे लागतात.विशेष म्हणजे, या योजनांतर्गत बँकेमध्ये जाऊन पैसे भरावे लागत नाही. संबंधित व्यक्तीच्या बचतखात्यातून विम्याची रक्कम काढली जाते.वार्षिक १२ व ३३० रुपयांमध्ये मिळते विमा संरक्षणगरीबातील गरीब व्यक्तीचा विमा काढला जावा, या उद्देशानेच केंद्र शासनाने प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेंतर्गत वर्षाचे केवळ ३३० रुपये बँक खात्यातून कपात केले जातात. तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत केवळ १२ रुपये कपात होतात. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत १८ ते ७० वर्षापर्यंतच्या व्यक्तीचा विमा काढला जातो. अपघात होऊन मृत्यू झाल्यास संबंधिताच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची मदत दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ आधार कार्ड व संबंधित व्यक्तीचे बचत खाते असणे आवश्यक आहे. ३१ मे च्या पूर्वी संबंधित व्यक्तीच्या खात्यातून पैसे कपात केले जातात. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेंतर्गत १८ ते ५० व्यक्तींचा विमा काढला जातो. विमा कालावधीत संबंधित व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाला तरी त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांचा विमा दिला जातो.प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा सुरक्षा योजना या दोन्ही योजनांतर्गत अत्यंत कमी पैशात सर्वसामान्य व्यक्तीचा विमा काढला जातो. एकदा विमा काढल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या बचत खात्यातून विम्याची रक्कम कपात केली जाते. त्यामुळे वेळोवेळी बँकेत जाण्याचीही गरज पडत नाही. जास्तीत जास्त नागरिकांचा विमा उतरविला जावा, असे निर्देश जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वच कर्मचारी व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.- सतीश आयलवार, सीईओ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गडचिरोलीसरकारच्या दुर्लक्षानंतर प्रशासन सुस्तसुरूवातीचा एक वर्ष केंद्र शासनाने प्रत्येक बँक व विभागांना टार्गेट देण्यात आले होते. त्यामुळे विमा काढण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत होत्या. एक वर्षाच्या कालावधीनंतर मात्र केंद्र शासनाने या योजनांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रशासनाने सुध्दा पाठ फिरविली. अत्यंत कमी हप्त्यात या योजनांचा लाभ घेता येतो. त्यामुळे योजनाधारकांची संख्या वाढली असती. मात्र प्रचार प्रसिध्दीअभावी या योजना आता अनेकांच्या विस्मरणात गेल्या आहेत. त्यामुळे योजनांचा विस्तार थांबला आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजना