शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

शाळा निर्लेखनाचे केवळ ३४ प्रस्ताव

By admin | Updated: November 17, 2014 22:53 IST

जिल्ह्यात ४०० पेक्षा अधिक शाळा जीर्णावस्थेत असून कधीही कोसळून मोठा धोका होण्याची शक्यता आहे. मात्र सदर इमारती निर्लेखीत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे केवळ ३४ प्रस्ताव

गडचिरोली : जिल्ह्यात ४०० पेक्षा अधिक शाळा जीर्णावस्थेत असून कधीही कोसळून मोठा धोका होण्याची शक्यता आहे. मात्र सदर इमारती निर्लेखीत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे केवळ ३४ प्रस्ताव यावर्षी प्राप्त झाले असून त्यापैकी सुमारे २५ प्रस्तावांमध्ये त्रूटी असल्याने सदर प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. केवळ ९ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश शाळा राज्यनिर्मितीच्या सुरूवातीच्या कालावधीत बांधण्यात आल्या. सदर इमारती कौलारू आहेत. यापैकी बहुतांश इमारतींचे फाटे कुजले आहेत. त्याचबरोबर भिंतीला झडप लागून भिंतीवरील सिमेंट उखडून गेले आहे. पायाही कमजोर झाला आहे. त्यामुळे सदर इमारत कधीही कोसळण्याचा धोका निर्माण झाला असल्याने सदर इमारती निर्लेखीत करण्याविषयी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्रस्ताव मागितले आहेत. जिल्ह्यात जवळपास ४०० पेक्षा अधिक शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. मात्र केवळ ३४ शाळांनी निर्लेखीत करण्याविषयी प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविले आहेत. त्यातही सुमारे २५ प्रस्तावांमध्ये विविध प्रकारच्या त्रूटी आढळून आल्या आहेत. तर काही प्रस्तावांना अपूर्ण दाखले जोडण्यात आले आहेत. त्यामुळे सदर प्रस्ताव नामंजूर करण्यात आले असून केवळ ९ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. शाळांच्या इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे पैसा उपलब्ध आहे. मात्र जुनी इमारत पाडल्याशिवाय त्या ठिकाणी नवीन इमारत उभी करणे शक्य नाही. मात्र निर्लेखीत करण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने प्रस्तावच सादर केले जात नाही. (नगर प्रतिनिधी)