शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

केवळ १५ टक्केच पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 23:39 IST

पीककर्ज वाटपाच्या कामाला अजुनही गती प्राप्त झाली नसून ३१ मे पर्यंत बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ १५ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. शेतीमध्ये आधुनिक यंत्र व तंत्रांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

ठळक मुद्दे२०२ कोटींचे उद्दिष्ट : ८ हजार २७९ शेतकऱ्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पीककर्ज वाटपाच्या कामाला अजुनही गती प्राप्त झाली नसून ३१ मे पर्यंत बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ १५ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.शेतीमध्ये आधुनिक यंत्र व तंत्रांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे शेतीचा खर्चसुद्धा वाढत चालला आहे. हा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे राहत नाही. परिणामी शेतकऱ्याला गावातील सावकार किंवा बचत गट यांच्याकडून कर्ज घ्यावे लागते. सावकार किंवा बचत गट यांचे व्याजदर अत्यंत महाग असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येतो. खासगी कर्ज वेळेवर मिळतही नाही. त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामे वेळेवर होत नसल्याने त्याचा परिणाम शेती उत्पादनावर होतो.या सर्व संकटातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी शासनाने सर्व राष्ट्रीयीयीकृत बँका, सहकारी बँका व ग्रामीण बँकाना शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले जाते. २०१८ च्या खरीप हंगामात जिल्हाभरातील शेतकाऱ्यांना २०२ कोटी ९१ लाख रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मे अखेरपर्यंत केवळ ८ हजार २७९ शेतकऱ्यांना ३० कोटी ८९ लाख रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या कर्ज वाटपाचे प्रमाण अतीशय कमी आहे. याला गती देणे आवश्यक झाले आहे. जून महिन्यात शेतकऱ्यांकडून कर्जाची मागणी वाढण्याची शक्यता आहे.जून महिन्यात कर्ज वाटपाला मिळेल गतीगडचिरोली जिल्ह्यात धानाचे उत्पादन घेतले जाते. धानाच्या रोवणीला सर्वाधिक खर्च येतो. धानाच्या रोवणीची कामे जुलै महिन्याच्या सुरूवातीला सुरूवात होतात. कर्ज घेतलेले पैसे खर्च होण्याची शक्यता असल्याने शेतकरी जुन किंवा जुलै महिन्यातच कर्ज घेणे पसंत करीत असल्याने येत्या आठ दिवसांत कर्ज वाटपाला गती येईल अशी शक्तता व्यक्त केली जात आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवरकर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आघाडी घेतली आहे. या बँकेला एकूण ५६ कोटी रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. ३१ मे पर्यंत ७ हजार ९३ शेतकऱ्यांना २४ कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. बँक आॅफ इंडियाने १ कोटी ६३ लाख, बँक आॅफ महाराष्ट्रने १ कोटी ३५ लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडिया ४ लाख, आयडीबीआय बँक २४ लाख, एसबीआय १ कोटी ४३ लाख, युनियन बँक २३ लाख, एक्सिस बँक ३ लाख, विदर्भ कोकण ग्रामीण बँक २ कोटी २३ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. राष्ट्रीयकृत बँकांना दरवर्षी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात येत असले तरी या उद्दिष्टाच्या ५० टक्केही कर्ज वाटप या बँकांकडून केले जात नसल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे.

टॅग्स :bankबँक