शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

केवळ १५ टक्केच पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 23:39 IST

पीककर्ज वाटपाच्या कामाला अजुनही गती प्राप्त झाली नसून ३१ मे पर्यंत बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ १५ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. शेतीमध्ये आधुनिक यंत्र व तंत्रांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

ठळक मुद्दे२०२ कोटींचे उद्दिष्ट : ८ हजार २७९ शेतकऱ्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पीककर्ज वाटपाच्या कामाला अजुनही गती प्राप्त झाली नसून ३१ मे पर्यंत बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ १५ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.शेतीमध्ये आधुनिक यंत्र व तंत्रांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे शेतीचा खर्चसुद्धा वाढत चालला आहे. हा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे राहत नाही. परिणामी शेतकऱ्याला गावातील सावकार किंवा बचत गट यांच्याकडून कर्ज घ्यावे लागते. सावकार किंवा बचत गट यांचे व्याजदर अत्यंत महाग असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येतो. खासगी कर्ज वेळेवर मिळतही नाही. त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामे वेळेवर होत नसल्याने त्याचा परिणाम शेती उत्पादनावर होतो.या सर्व संकटातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी शासनाने सर्व राष्ट्रीयीयीकृत बँका, सहकारी बँका व ग्रामीण बँकाना शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले जाते. २०१८ च्या खरीप हंगामात जिल्हाभरातील शेतकाऱ्यांना २०२ कोटी ९१ लाख रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मे अखेरपर्यंत केवळ ८ हजार २७९ शेतकऱ्यांना ३० कोटी ८९ लाख रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या कर्ज वाटपाचे प्रमाण अतीशय कमी आहे. याला गती देणे आवश्यक झाले आहे. जून महिन्यात शेतकऱ्यांकडून कर्जाची मागणी वाढण्याची शक्यता आहे.जून महिन्यात कर्ज वाटपाला मिळेल गतीगडचिरोली जिल्ह्यात धानाचे उत्पादन घेतले जाते. धानाच्या रोवणीला सर्वाधिक खर्च येतो. धानाच्या रोवणीची कामे जुलै महिन्याच्या सुरूवातीला सुरूवात होतात. कर्ज घेतलेले पैसे खर्च होण्याची शक्यता असल्याने शेतकरी जुन किंवा जुलै महिन्यातच कर्ज घेणे पसंत करीत असल्याने येत्या आठ दिवसांत कर्ज वाटपाला गती येईल अशी शक्तता व्यक्त केली जात आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवरकर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आघाडी घेतली आहे. या बँकेला एकूण ५६ कोटी रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. ३१ मे पर्यंत ७ हजार ९३ शेतकऱ्यांना २४ कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. बँक आॅफ इंडियाने १ कोटी ६३ लाख, बँक आॅफ महाराष्ट्रने १ कोटी ३५ लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडिया ४ लाख, आयडीबीआय बँक २४ लाख, एसबीआय १ कोटी ४३ लाख, युनियन बँक २३ लाख, एक्सिस बँक ३ लाख, विदर्भ कोकण ग्रामीण बँक २ कोटी २३ लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. राष्ट्रीयकृत बँकांना दरवर्षी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात येत असले तरी या उद्दिष्टाच्या ५० टक्केही कर्ज वाटप या बँकांकडून केले जात नसल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे.

टॅग्स :bankबँक