शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

आॅनलाईन अर्जाची अट रद्द

By admin | Updated: April 2, 2015 01:49 IST

ग्राम पंचायत निवडणुकीसाठी फक्त आॅनलाईन अर्ज करण्यासाठीची अट निवडणूक आयोगाने मागे घेतल्यामुळे दुर्गम व अतिदुर्गम भागातील अनेक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

गडचिरोली : ग्राम पंचायत निवडणुकीसाठी फक्त आॅनलाईन अर्ज करण्यासाठीची अट निवडणूक आयोगाने मागे घेतल्यामुळे दुर्गम व अतिदुर्गम भागातील अनेक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.संगणक नाही, संगणक आहे, पण वीज नाही, सायबर कॅफेवर निवडणुकीचा अर्ज भरायला शंभर रुपये शुल्क नाही, अशा अनेक अडचणींमुळे संगणक साक्षर नसलेल्या अनेकांना निवडणुकीच्या हक्कापासून मागील वर्षी वंचित राहावे लागले होते. मात्र २४ व ३० एप्रिल रोजी होणाऱ्या ग्राम पंचायत निवडणुकीसाठी संगणक साक्षरतेची छुपी अडचण निवडणूक आयोगाने रद्द केल्याने खऱ्या अर्थाने ग्राम पंचायत निवडणुका रंगणार आहेत. निवडणूक आयोगाने जिल्ह्यासह राज्यातील ग्राम पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीत केला. एप्रिल ते जुलै २०१५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ४२३ ग्राम पंचायतीमध्ये सार्वत्रिक व पोटनिवडणुका होणार होत्या, मात्र आता निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील तीन ग्राम पंचायतीच्या निवडणुका रद्द केल्या आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात माहे एप्रिल ते जुलै या महिन्यादरम्यान मुदत संपणाऱ्या ४२० ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणूक आयोगाने सुरुवातीला ग्राम पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतेवेळी ग्राम पंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना केवळ आॅनलाईन पध्दतीनेच अर्ज भरता येईल, अशी अधिसूचना निवडणूक आयोगाने काढली होती. या अटीमुळे अनेक अशिक्षित आणि अल्पशिक्षित उमेदवारांची डोकेदुखी वाढली होती. ग्रामीण भागात संगणक उपलब्ध नसल्याने आता निर्धारित वेळेत अर्ज कसा दाखल करावयाचा, असा प्रश्न निर्माण झाला होता. निवडणूक आयोगाने आॅनलाईन अर्ज भरण्याची जाचक अट रद्द करावी, अशी मागणी होत होती. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारीया यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन ग्राम पंचायत निवडणुकीची आॅनलाईन अर्जाची अट रद्द करण्यात येत असल्याचे जिल्ह्याच्या निवडणूक विभागाला सांगितले आहे. आता जिल्ह्यातील ३३७ ग्रा. पं. च्या सार्वत्रिक व ८३ ग्रा. पं. च्या पोटनिवडणुका अशा एकूण ४२० ग्रा. पं. च्या निवडणुका होणार आहेत. या निर्णयामुळे ग्राम पंचायतीची निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)