शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

२० गावे सांभाळतो एक वीज कर्मचारी

By admin | Updated: November 27, 2015 01:47 IST

तालुक्याच्या दुर्गम भागात अद्यापही वीज पोहोचली नाही. अशा भागात नागरिक अंधारातच जगत आहेत.

पाच वर्ष उलटले : वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्षअहेरी : तालुक्याच्या दुर्गम भागात अद्यापही वीज पोहोचली नाही. अशा भागात नागरिक अंधारातच जगत आहेत. मात्र ज्या गावांमध्ये वीज पोहोचली अशा गावांमध्ये परिसरात वीज कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. हीच स्थिती कमलापूर, छल्लेवाडा, राजाराम वीज उपकेंद्रातील २० गावांवर आली आहे. या भागात वीज देखभाल दुरूस्तीचे काम एक वीज कर्मचारी मागील पाच वर्षांपासून करीत आहे. मात्र येथे कर्मचारी नियुक्त करण्याकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. राजाराम परिसरात नेहमीच विद्युत पुरवठा खंडित होत असतो. परिणामी नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. या भागातील वीज पुरवठा खंडित झाल्यास तक्रारीनंतर वीज पुरवठा सुरळीत करताना अडचणींचा सामना करावा लागतो. येथे आसुटकर नामक केवळ एकच कर्मचारी असल्याने तो सर्व गावातील वीज पुरवठ्याकडे एकावेळेस लक्ष घालू शकत नाही. त्यामुळे परिसरातील गावातील अनेक नागरिकांना एक ते दोन दिवस विद्युत पुरवठा सुरळीत होण्याची प्रतीक्षा करावी लागते. काही दिवसांपूर्वी गुड्डीगुडम व छल्लेवाडा येथे तीन वीज कर्मचारी कार्यरत होते. मात्र दोन कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण झाले. तेव्हापासून केवळ एकच वीज कर्मचारी २० गावांचा कार्यभार पाहत आहे. याचा फटका नागरिकांना बसत आहे. परिसरात अनेकदा कमी दाबाचा वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे विजेवर चालणारी अनेक उपकरणे निष्क्रीय ठरतात. रात्रीच्या वेळी मंद प्रकाशात अनेक कामे होऊ शकत नाही. या भागातील छोट्या पाड्यांमध्ये अद्यापही वीज पोहोचली नाही. त्यामुळे या भागातील नागरिक अद्यापही अंधारातच जीवन जगत असल्याचे विदारक वास्तव दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)