शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 01:20 IST

शासनाच्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ६५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील जवळपास एक लाख शेतकºयांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा गडचिरोलीत शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासनाच्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ६५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील जवळपास एक लाख शेतकºयांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने सुरु केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा शुभारंभ रविवारी २४ फेब्रुवारी रोजी उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. त्या अनुषंगाने गडचिरोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सदर योजनेबाबत कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी आ.डॉ. देवराव होळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, विशालकुमार मेश्राम, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, जिल्हा सूचना व प्रसारण अधिकारी शिवशंकर टेंभुर्णे, जमीन शाखेचे तहसिलदार ठाकरे उपस्थित होते.याप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या शेतकरी सन्मान योजनेसंदर्भात विस्तृत माहिती दिली. आतापर्यंत ६५ हजार शेतकºयांची नोंदणी झालेली आहे. आपल्या जिल्ह्यात एक लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेतील, असे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. तेव्हा तलाठी कार्यालयात, ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन आपली यादी व दिलेली माहिती बरोबर आहे की, नाही याची खातरजमा करावी. रविवारी प्रथम टप्प्यात दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. चार महिन्यानंतर दोन हजार आणि पुढील तिसरा हप्ता चार महिन्यानंतर जमा होईल, असे जिल्हाधिकारी सिंह म्हणाले. शेतकरी बांधवानी आपला तसेच आपल्या शेजारी असलेल्या शेतकऱ्यांना सुध्दा तातडीने या सन्मान योजनेकरीता माहिती सादर करण्यासाठी सतर्कता बाळगावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे या योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थाटात शुभारंभ झाला. यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी, केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग, शिवप्रकाश शुक्ला, सुर्यप्रताप साही, महेंद्रनाथ पांडे यांची प्रमुख उपथिती होती. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दाखविण्यात आले. एनआयसीचे शिवशंकर टेंभुर्णे आणि त्यांची चमु यासाठी कार्यरत होती.यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या योजनेच्या लाभार्थ्यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी