शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

पुराने वाहून गेलेला रस्ता ‘जैैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:00 IST

चामोर्शी तालुक्यातील घोट नजीकच्या शांतीनगर-मछली मार्गावरील अनेक रपट्यालगतचा रस्ता मागील पावसाळ्यात पुराने वाहून गेला. येथे गिट्टी उखडलेली आहे. परिणामी नागरिकांना आवागमन करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देदुरुस्तीकडे दुर्लक्ष : शांतीनगर-मछली मार्गाची दुरवस्था; वाहनधारकांना अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : चामोर्शी तालुक्यातील घोट नजीकच्या शांतीनगर-मछली मार्गावरील अनेक रपट्यालगतचा रस्ता मागील पावसाळ्यात पुराने वाहून गेला. येथे गिट्टी उखडलेली आहे. परिणामी नागरिकांना आवागमन करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.शांतीनगर ते मछली मार्ग अडीच ते तीन किमी अंतराचा आहे. या मार्गावर असलेल्या अनेक नाल्यांवरील तसेच रपट्यावरील रस्ता मागील पावसाळ्यात पुरामुळे वाहून गेला. तसेच खडीकरण झालेल्या भागातीलही गिट्टी पूर्णत: उखडली. पावसाळा संपून जवळपास चार महिन्यांचा कालावधी उलटला. परंतु रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. विशेष म्हणजे, सदर मार्गाच्या डागडुजीसाठी अनेकदा संबंधित विभागाकडे करण्यात आली. परंतु दुर्लक्षच झाले. या मार्गावरून वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी संबंधित विभागाकडे केली आहे.पुलाच्या दोन्ही बाजूला पडले खड्डेशांतीनगर ते मछली मार्ग चापलवाडा-मकेपल्ली मार्गाला जोडतो. त्यामुळे मछलीवासीयांसाठी सदर मार्ग कमी अंतराचा आहे. याच मार्गाने मछली व परिसरातील नागरिक ये-जा करीत असतात. येथून वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. परंतु मागील पावसाळ्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने रपट्यालगचा रस्ता पूर्णता वाहून गेला. ठिकठिकाणी खड्डे पडले. शिवाय पुलाच्या दोन्ही बाजूला मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना येथून आवागमन करणे कठिण झाले आहे. अनेक नागरिकांच्या वाहनांचे टायर उखडलेल्या गिट्टीमुळे पंक्चर होत आहेत. शिवाय या परिसरात दुरूस्तीच्या दुकानांचा अभाव असल्याने नागरिकांना पायपीट करावी लागते. त्यामुळे प्रचंड त्रास होतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सदर मार्गाची दुरूस्ती करून या मार्गाचे डांबरीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :floodपूरroad transportरस्ते वाहतूक