शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

पर्लकोटाच्या पुराने भामरागड शहर पाण्यात

By admin | Updated: July 10, 2016 16:59 IST

भामरागड या तालुकास्थळावरील शहरात पाणी शिरले असून ३०० पेक्षा अधिक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत 

भामरागड, दि. १० - पर्लकोटा नदीजवळ वसलेल्या भामरागड या तालुकास्थळावरील शहरात पाणी शिरले असून ३०० पेक्षा अधिक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. शहरातील घरांमध्ये पाच फुटापेक्षाही अधिक पाणी साचले आहे. जीवनोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 
 
भामरागड तालुक्यात मागील २४ तासात अतिवृष्टी झाली असून या तालुक्यात सुमारे ३०० मिमी पाऊस पडल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागाने केली आहे. दुसºया दिवशीही गडचिरोली जिल्ह्यातील दीडशेवर अधिक गावांचा संपर्क तुटलेलाच आहे. 
 
भामरागड हा घनदाट जंगलाने व्यापलेला तालुका आहे. या तालुक्यामधून इंद्रावती, पर्लकोटा, पामुलगौतम या तीन मुख्य नद्या आहेत. या तिन्ही नद्यांनी भामरागड शहराला वेढले आहे. भामरागड हे शहर पर्लकोटा नदीजवळ वसले आहे. पर्लकोटा नदीने शनिवारीच धोक्याची पातळी ओलांडली होती. शनिवारी दिवसभर पर्लकोटा नदी पुलावरून दोन फूट पाणी वाहत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. 
 
मात्र शनिवारच्या रात्री भामरागड तालुक्यात अतिवृष्टी झाली. सुमारे ३०० मिमी पाऊस पडला. परिणामी पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढली व शनिवारी रात्रीच्या सुमारास भामरागड शहरामध्ये पाणी शिरले. या शहरातील विश्वेश्वराव चौकात पाच फुटापेक्षा अधिक पाणी साचले आहे. 
 
पर्लकोटा नदी पुलावरूनही पाच फूट पाणी वाहत आहे. वीज, फोन आदी सुविधा बंद असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने आपत्ती व्यवस्थापन विभाग आधीच सज्ज झाला होता. शहरातील नागरिकांना आधीच सुरक्षितस्थळी हलविण्याने मोठा धोका टळला आहे. भामरागड तालुक्यात अजुनही अतिवृष्टी सुरूच असल्याने पूर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता प्रशासनातील अधिका-यांनी व्यक्त केली आहे.