शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
2
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
3
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
4
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
5
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
6
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
7
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
8
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
9
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
10
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
11
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
12
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
13
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
14
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!
15
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
16
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
17
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
18
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
19
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी

पर्लकोटाच्या पुराने भामरागड शहर पाण्यात

By admin | Updated: July 10, 2016 16:59 IST

भामरागड या तालुकास्थळावरील शहरात पाणी शिरले असून ३०० पेक्षा अधिक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत 

भामरागड, दि. १० - पर्लकोटा नदीजवळ वसलेल्या भामरागड या तालुकास्थळावरील शहरात पाणी शिरले असून ३०० पेक्षा अधिक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. शहरातील घरांमध्ये पाच फुटापेक्षाही अधिक पाणी साचले आहे. जीवनोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 
 
भामरागड तालुक्यात मागील २४ तासात अतिवृष्टी झाली असून या तालुक्यात सुमारे ३०० मिमी पाऊस पडल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन विभागाने केली आहे. दुसºया दिवशीही गडचिरोली जिल्ह्यातील दीडशेवर अधिक गावांचा संपर्क तुटलेलाच आहे. 
 
भामरागड हा घनदाट जंगलाने व्यापलेला तालुका आहे. या तालुक्यामधून इंद्रावती, पर्लकोटा, पामुलगौतम या तीन मुख्य नद्या आहेत. या तिन्ही नद्यांनी भामरागड शहराला वेढले आहे. भामरागड हे शहर पर्लकोटा नदीजवळ वसले आहे. पर्लकोटा नदीने शनिवारीच धोक्याची पातळी ओलांडली होती. शनिवारी दिवसभर पर्लकोटा नदी पुलावरून दोन फूट पाणी वाहत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. 
 
मात्र शनिवारच्या रात्री भामरागड तालुक्यात अतिवृष्टी झाली. सुमारे ३०० मिमी पाऊस पडला. परिणामी पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढली व शनिवारी रात्रीच्या सुमारास भामरागड शहरामध्ये पाणी शिरले. या शहरातील विश्वेश्वराव चौकात पाच फुटापेक्षा अधिक पाणी साचले आहे. 
 
पर्लकोटा नदी पुलावरूनही पाच फूट पाणी वाहत आहे. वीज, फोन आदी सुविधा बंद असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने आपत्ती व्यवस्थापन विभाग आधीच सज्ज झाला होता. शहरातील नागरिकांना आधीच सुरक्षितस्थळी हलविण्याने मोठा धोका टळला आहे. भामरागड तालुक्यात अजुनही अतिवृष्टी सुरूच असल्याने पूर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता प्रशासनातील अधिका-यांनी व्यक्त केली आहे.