शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

पुरामुळे अधिकारी भामरागडात अडकले

By admin | Updated: September 20, 2015 02:00 IST

१६ सप्टेंबरच्या रात्रीपासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला होता.

चालक वाहकांनाही प्रचंड मनस्ताप : राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्याही थांबल्याभामरागड : १६ सप्टेंबरच्या रात्रीपासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला होता. पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती या नद्यांना पूर आल्याने आलापल्ली-भामरागड मार्गावरची वाहतूक जवळजवळ दोन ते अडीच दिवस बंद होती. या कालावधीत नागपूर येथील विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे उपायुक्त श्रीकांत धर्माळे व गडचिरोलीचे जिल्हा नियोजन अधिकारी धनंजय सुटे दोन दिवस भामरागडातच पुरामुळे अडकून पडले. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या पाच ते सहा बसगाड्याही दोन ते अडीच दिवस अडकून पडल्या होत्या. १६ सप्टेंबर रोजी उपायुक्त धर्माळे व नियोजन अधिकारी सुटे हे आलापल्ली निसर्ग पर्यटन विकासाच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. भामरागड येथेही त्यांना काम असल्याने दोन्ही अधिकारी भामरागड कडे जाण्यास निघाले. मात्र ताडगाव येथील नाल्याला पाणी होते. सदर पाणी काही वेळात ओसरल्यानंतर ते सायंकाळी भामरागडला पोहोचले. मात्र रात्री झालेल्या मुसळधार पावसाने पर्लकोटा नदीला पूर आला. त्यामुळे भामरागडलगतच्या पुलावर पाणी चढून आलापल्ली-भामरागड मार्ग बंद झाला. सतत संततधार पाऊस राहिल्याने १७ व १८ सप्टेंबरलाही पूर ओसरला नाही. १८ सप्टेंबरच्या रात्री उशीरा या पुराचे पाणी ओसरल्यावर हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी आलापल्लीकडे रवाना झाले. याच काळात राज्य परिवहन महामंडळाच्या लाहेरी, भामरागड, कोठीकडे गेलेल्या सात ते आठ बसगाड्याही अडकून पडल्या होत्या. जसजसे पुराचे पाणी ओसरण्यास सुरूवात झाली. तसे या बसगाड्यांनी भामरागड गाठले व १८ सप्टेंबरच्या रात्री उशीरा या बसगाड्या अहेरीकडे रवाना झाल्या. तब्बल अडीच ते तीन दिवस पुरामुळे एसटीवाहनचालकांनाही मनस्ताप सहन करावा लागला. भामरागड जवळचा ठेंगण्या पुलावर वारंवार पाणी येत असल्याने हा मार्ग बंद होतो.