शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

पुरामुळे अधिकारी भामरागडात अडकले

By admin | Updated: September 20, 2015 02:00 IST

१६ सप्टेंबरच्या रात्रीपासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला होता.

चालक वाहकांनाही प्रचंड मनस्ताप : राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्याही थांबल्याभामरागड : १६ सप्टेंबरच्या रात्रीपासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला होता. पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती या नद्यांना पूर आल्याने आलापल्ली-भामरागड मार्गावरची वाहतूक जवळजवळ दोन ते अडीच दिवस बंद होती. या कालावधीत नागपूर येथील विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे उपायुक्त श्रीकांत धर्माळे व गडचिरोलीचे जिल्हा नियोजन अधिकारी धनंजय सुटे दोन दिवस भामरागडातच पुरामुळे अडकून पडले. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या पाच ते सहा बसगाड्याही दोन ते अडीच दिवस अडकून पडल्या होत्या. १६ सप्टेंबर रोजी उपायुक्त धर्माळे व नियोजन अधिकारी सुटे हे आलापल्ली निसर्ग पर्यटन विकासाच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. भामरागड येथेही त्यांना काम असल्याने दोन्ही अधिकारी भामरागड कडे जाण्यास निघाले. मात्र ताडगाव येथील नाल्याला पाणी होते. सदर पाणी काही वेळात ओसरल्यानंतर ते सायंकाळी भामरागडला पोहोचले. मात्र रात्री झालेल्या मुसळधार पावसाने पर्लकोटा नदीला पूर आला. त्यामुळे भामरागडलगतच्या पुलावर पाणी चढून आलापल्ली-भामरागड मार्ग बंद झाला. सतत संततधार पाऊस राहिल्याने १७ व १८ सप्टेंबरलाही पूर ओसरला नाही. १८ सप्टेंबरच्या रात्री उशीरा या पुराचे पाणी ओसरल्यावर हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी आलापल्लीकडे रवाना झाले. याच काळात राज्य परिवहन महामंडळाच्या लाहेरी, भामरागड, कोठीकडे गेलेल्या सात ते आठ बसगाड्याही अडकून पडल्या होत्या. जसजसे पुराचे पाणी ओसरण्यास सुरूवात झाली. तसे या बसगाड्यांनी भामरागड गाठले व १८ सप्टेंबरच्या रात्री उशीरा या बसगाड्या अहेरीकडे रवाना झाल्या. तब्बल अडीच ते तीन दिवस पुरामुळे एसटीवाहनचालकांनाही मनस्ताप सहन करावा लागला. भामरागड जवळचा ठेंगण्या पुलावर वारंवार पाणी येत असल्याने हा मार्ग बंद होतो.