शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

१५७ कोटी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:08 IST

चालू खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बँकांनी १५७ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये, असे स्पष्ट निर्देश आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याने बँका कर्ज वितरणाच्या कामाला लागल्या आहेत.

ठळक मुद्देखरीप हंगामाचे नियोजन : प्रत्येक बँकेला सक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चालू खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बँकांनी १५७ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये, असे स्पष्ट निर्देश आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याने बँका कर्ज वितरणाच्या कामाला लागल्या आहेत.गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा फारशा उपलब्ध नसल्याने रबी व उन्हाळी हंगामात फारशी शेती केली जात नाही. मात्र खरीप हंगामात पाऊस राहत असल्याने सर्वाधिक उत्पादन खरीप हंगामातच घेतले जाते. यावर्षी जवळपास तीन लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामपूर्व मशागतीला सुरूवात केली आहे. ज्या शेतकºयांनी ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा केला, असे शेतकरी आता नवीन कर्जासाठी बँकांकडे अर्ज करीत आहेत. कर्जासाठी कागदपात्रांची जुळवाजुवळ करण्याचे काम सुरू झाले आहे.चालू खरीप हंगामात १५७ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना ७७ कोटी ६७ लाख, खासगी क्षेत्रातील बँकांना दोन कोटी रुपये व ग्रामीण तसेच जिल्हा सहकारी बँकांना ७७ कोटी ५२ लाख रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले आहे.शेतकरी कर्जाचा भरणा करीत नाही, अशी चुकीची समजूत बँक प्रशासनाची असल्याने बँका शेतकºयांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत होत्या. मात्र प्रत्येक बँकेला कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्यामुळे आता बँकांनी काही प्रमाणात नरमाईचे धोरण अवलंबिले असल्याने शेतकºयांना कर्ज उपलब्ध होत आहे. पीक कर्ज ३१ मार्चपर्यंत भरल्यास त्यावरील व्याज पूर्णपणे माफ केली जाते.शेतकºयाला केवळ कर्जाची रक्कम भरावी लागते. त्यामुळे शेतकरी आता स्वत:हून कर्ज उचलून त्याचा भरणा करीत आहेत.कर्ज वितरण सुरूज्या शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा केला आहे, असे शेतकरी कर्ज घेण्यासाठी पात्र ठरत असल्याने त्या शेतकऱ्यांना कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. एक पाऊस पडल्यानंतर धानाचे पºहे टाकले जातात. त्यामुळे पाऊस पडण्यापूर्वीच बियाणे, खते यांची तजवीज करून ठेवावी लागते. जमीन सुध्दा नांगरून ठेवावी लागते. यासाठी पैशाची गरज भासते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जाचे अर्ज करण्यास बँकांकडे धाव घेतली आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज