शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

१५७ कोटी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:08 IST

चालू खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बँकांनी १५७ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये, असे स्पष्ट निर्देश आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याने बँका कर्ज वितरणाच्या कामाला लागल्या आहेत.

ठळक मुद्देखरीप हंगामाचे नियोजन : प्रत्येक बँकेला सक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चालू खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बँकांनी १५७ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये, असे स्पष्ट निर्देश आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याने बँका कर्ज वितरणाच्या कामाला लागल्या आहेत.गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा फारशा उपलब्ध नसल्याने रबी व उन्हाळी हंगामात फारशी शेती केली जात नाही. मात्र खरीप हंगामात पाऊस राहत असल्याने सर्वाधिक उत्पादन खरीप हंगामातच घेतले जाते. यावर्षी जवळपास तीन लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामपूर्व मशागतीला सुरूवात केली आहे. ज्या शेतकºयांनी ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा केला, असे शेतकरी आता नवीन कर्जासाठी बँकांकडे अर्ज करीत आहेत. कर्जासाठी कागदपात्रांची जुळवाजुवळ करण्याचे काम सुरू झाले आहे.चालू खरीप हंगामात १५७ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना ७७ कोटी ६७ लाख, खासगी क्षेत्रातील बँकांना दोन कोटी रुपये व ग्रामीण तसेच जिल्हा सहकारी बँकांना ७७ कोटी ५२ लाख रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले आहे.शेतकरी कर्जाचा भरणा करीत नाही, अशी चुकीची समजूत बँक प्रशासनाची असल्याने बँका शेतकºयांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत होत्या. मात्र प्रत्येक बँकेला कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्यामुळे आता बँकांनी काही प्रमाणात नरमाईचे धोरण अवलंबिले असल्याने शेतकºयांना कर्ज उपलब्ध होत आहे. पीक कर्ज ३१ मार्चपर्यंत भरल्यास त्यावरील व्याज पूर्णपणे माफ केली जाते.शेतकºयाला केवळ कर्जाची रक्कम भरावी लागते. त्यामुळे शेतकरी आता स्वत:हून कर्ज उचलून त्याचा भरणा करीत आहेत.कर्ज वितरण सुरूज्या शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा केला आहे, असे शेतकरी कर्ज घेण्यासाठी पात्र ठरत असल्याने त्या शेतकऱ्यांना कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. एक पाऊस पडल्यानंतर धानाचे पºहे टाकले जातात. त्यामुळे पाऊस पडण्यापूर्वीच बियाणे, खते यांची तजवीज करून ठेवावी लागते. जमीन सुध्दा नांगरून ठेवावी लागते. यासाठी पैशाची गरज भासते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जाचे अर्ज करण्यास बँकांकडे धाव घेतली आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज