शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
2
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
3
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
4
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
5
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
6
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
7
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
8
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
9
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
10
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
11
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
12
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
13
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
15
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
16
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
17
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
18
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
19
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
20
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."

ओबीसींचे आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 06:00 IST

भाजपच्या वतीने चामोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात हा मेळावा घेण्यात आला. मात्र यावेळी राज्य शासनाने ओबीसी समाजाची दिशाभूल केल्याच्या आरोपावरून ओबीसी महासंघाच्या काही युवा पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवत नारेबाजी केली.

ठळक मुद्देओबीसी मेळाव्यात गजर । समाजाची दिशाभूल केल्याच्या आरोपावरून दाखविले काळे झेंडे

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही खासदार अशोक नेते यांनी येथे आयोजित ओबीसी बांधवांच्या मेळाव्यात उद्घाटक म्हणून बोलताना दिली. भाजपच्या वतीने चामोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात हा मेळावा घेण्यात आला. मात्र यावेळी राज्य शासनाने ओबीसी समाजाची दिशाभूल केल्याच्या आरोपावरून ओबीसी महासंघाच्या काही युवा पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवत नारेबाजी केली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. देवराव होळी तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, चामोर्शीच्या नगराध्यक्ष प्रज्ञा उराडे, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, महामंत्री मधुकर भांडेकर, जि.प. सदस्य रमेश बारसागडे, विद्या आभारे, रवींद्र ओल्लालवार, अनिल कुनघाडकर, रमेश भुरसे, बंगाली आघाडीचे सुरेश शहा, अविनाश ठाकरे, गौरी पेशेट्टीवार, विनोद गौरकार, पं.स. सदस्य वंदना गौरकार, उपसभापती विनोद दशमुखे, नरेश अल्सावार, प्रशांत एगलोपवार, मिनल पालारपवार, साईनाथ बुरांडे, विनोद पेशेट्टीवार, माणिक कोहळे, रेवनाथ कुसराम, आनंद पिदुरकर, कविता किरमे, मांतेश श्रीरामे आदी उपस्थित होते.यावेळी डॉ.होळी यांनी ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी आपण राज्यपालांकडे पत्रव्यवहार केला. विधानसभेत प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे प्रश्न वेधल्याचे सांगितले. परंतू सरकारने ओबीसींची दिशाभूल केल्याच्या आरोपावरून सदर मेळाव्यात ओबीसी युवा महासंघ व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून नारेबाजी करत निषेध व्यक्त केला. ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रूचित वांढरे, राहूल भांडेकर, पंकज खोबे, मनोज पोरटे, रमेश कोठारे व बहुसंख्य कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली.अन्याय कायमजिल्ह्यात गेल्या पाच वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून ओबीसी आरक्षण १९ टक्क्यावरून ६ टक्क्यांवर आणण्यात आले. गेल्या निवडणुकीतही हा विषय ऐरणीवर आला होता. परंतु पाच वर्षात यावर निर्णय झाला नाही. नुकत्याच गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी अन्याय दूर करण्याचे आश्वासन दिले होते. पण अंमलबाजवणी झाली नाही.

 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणAshok Neteअशोक नेते