शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
3
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
4
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
5
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
6
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
7
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
8
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
9
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
10
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
11
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
12
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
13
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
15
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
16
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
17
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
18
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
19
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
20
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...

ओबीसी आरक्षण भीक नसून हक्क आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 22:51 IST

१९३१ ला झालेल्या जनगणनेनुसार ओबीसींना ५२ टक्के आरक्षण मिळाले. तेव्हापासून जनगणना झालेली नाही.

ठळक मुद्देआष्टीत समाज प्रबोधन कार्यक्रम : अमोल मिटकरी यांचे प्रतिपादन; सरकारवर घणाघाती टिका

आॅनलाईन लोकमतआष्टी : १९३१ ला झालेल्या जनगणनेनुसार ओबीसींना ५२ टक्के आरक्षण मिळाले. तेव्हापासून जनगणना झालेली नाही. उच्च वर्णीयांनी सतत ओबीसींवर अन्याय केला आहे. आपले हक्क माहित करून घेण्यासाठी भारतीय संविधान वाचणे गरजेचे आहे. ओबीसींच्या हक्कांसाठी संघर्ष करण्यास तयार व्हावे लागेल. ओबीसींचे आरक्षण ही भीक नसून तो हक्क आहे, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अमोल मीटकरी यांनी केले.ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने आष्टी येथे संविधान दिन व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन समारोह तथा ओबीसी समाज प्रबोधनाचा कार्यक्रम रंगमंचावर सोमवारी सायंकाळी पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्टÑीय ओबीसी महासंघाचे संघटक प्रा. शेषराव येलेकर होते. प्रमुख वक्ते म्हणून सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट चंद्रपूरचे अध्यक्ष बळीराज धोटे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ओबीसी युवा महासंघाचे अध्यक्ष रूचित वांढरे, पोलीस उपनिरीक्षक नितेश गोणे, प्रा. दिनकर हिरादेवे, प्रा. नारायण बोरकुटे, संजय पंदिलवार आदी उपस्थित होते.डॉ. आंबेडकर, म. फुले, शाहू महाराज व तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. पुढे बोलताना अमोल मीटकरी म्हणाले, आमचे लोकप्रतिनिधी हे जातीचे असले पाहिजे, ओबीसींच्या प्रश्नांवर त्यांनी बोलले पाहिजे, धार्मिक शोषणातून ओबीसींना मुक्त केले पाहिजे, राजकीय घराणेशाही नष्ट होणे आवश्यक असून ओबीसींचा नेता प्रत्येक ठिकाणी असायला पाहिजे, देश वाचविण्यासाठी ओबीसींना राजकीय पर्याय उभा करायला पाहिजे, असे मीटकरी यावेळी म्हणाले. ‘लढतो तो मावळा आणि निवडून येतो तो कावळा’, अशी टिका त्यांनी राज्य सरकारवर केली.बळीराज धोटे यांनी ओबीसींच्या हक्कासाठी ओबीसींतील सर्व पोट जातींनी एकत्र आले पाहिजे, असे सांगितले. याप्रसंगी प्रा. शेषराव येलेकर यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. नारायण बोरकुटे, संचालन प्रा. रवींद्र इंगोले यांनी केले तर आभार प्रा. नारायण सालुरकर यांनी मानले. कार्यक्रमाला आष्टी परिसरातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.