शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

ओबीसींचे आरक्षण ६ टक्क्यांवरून १७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:46 IST

गडचिराेली समाजाची जिल्ह्यात एकूण लाेकसंख्या ५० टक्क्यांच्या जवळपास आहे. मात्र सन १९९५-९६ मध्ये युती सरकारच्या काळात ओबीसी समाजाचे आरक्षण ...

गडचिराेली समाजाची जिल्ह्यात एकूण लाेकसंख्या ५० टक्क्यांच्या जवळपास आहे. मात्र सन १९९५-९६ मध्ये युती सरकारच्या काळात ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करून ते १९ टक्क्यांवरून ११ टक्क्यांवर आणले. तर २००२-०३ मध्ये आघाडी सरकारने ११ टक्के असलेले ओबीसींचे आरक्षण पुन्हा कमी करून ६ टक्क्यांवर आणून ठेवले. एकूणच गडचिरोली जिल्ह्यातून ओबीसी समाजाला नाहीच्या बरोबर आरक्षण ठेवत या समाजाला विकासापासून कोसोदूर सारण्याचा प्रयत्न राज्य सरकारनी केला. या समाजातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, बेरोजगार आदींना शासकीय योजनांपासून ते सरकारी नोकरीपर्यंत मुकावे लागले. त्यामुळे संतप्त झालेल्या ओबीसी बांधवांनी १९ टक्के आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीला घेऊन मोर्चे, आंदोलने, रास्तारोको, घेराव आदी आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. मात्र, तरीही शासनाने ओबीसींच्या आरक्षणाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे ओबीसींना सोयी सवलतीपासून दूर सारावे लागले.

ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका घेतली. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सातत्याने मंत्रिमंडळात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रेटून धरला. बुधवारी १५ सप्टेंबर रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या १७ टक्के आरक्षणाला मंजुरी मिळवून दिली.