शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
4
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या 'फतेह-२'चे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
5
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
6
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
7
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
8
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
9
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
10
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
11
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
12
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
13
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
14
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
15
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
16
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
17
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
18
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
19
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
20
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...

आरक्षण मुद्यावर ओबीसी आक्रमक

By admin | Updated: December 8, 2014 22:33 IST

जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी, राज्यपालांची पेसा कायद्याची अधिसूचना रद्द करावी,

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय कडकडीत बंद; शासनाविरोधात नारेबाजीगडचिरोली : जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी, राज्यपालांची पेसा कायद्याची अधिसूचना रद्द करावी, नॉनक्रिमीलेयरची मर्यादा ६ लाखापर्यंत वाढवावी, आदीसह विविध मागण्यांसाठी सोमवारी ओबीसींच्या विविध संघटनांच्या वतीने गडचिरोलीसह आरमोरी, चामोर्शी, अहेरी आदी तालुक्यातील शाळा, महाविद्यालये बंद आंदोलन करण्यात आले़ सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण ६ टक्क्यांवर आणले आहे़ शिवाय अनुसूचित क्षेत्रात वर्ग ३ व ४ ची नोकर•भरती करताना पूर्णपणे आदिवासी उमेदवारांनाच प्राधान्य दिले आहे़ तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात नॉन क्रिमीलेयरची उत्पन्न मर्यादा साडेचार लाखांवरून ६ लाख करावी तसेच ओबीसींची थकीत असलेली ११०० कोटी रुपयांची शिष्यवृत्ती देण्यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती़ परंतु पुढे काहीच झाले नाही़ त्याअनुषंगाने ओबीसी नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्याचा घाट राज्य शासनाने घातल्याचा आरोप ओबीसी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. याच्या निषेधार्थ ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी कर्मचारी असोसिएशन, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, सुशिक्षीत बेरोजगार संघटना व अन्य गैरआदिवासी संघटनेच्यावतीने आज सोमवारी गडचिरोली जिल्ह्यात शाळा, महाविद्यालय बंद आंदोलन करण्यात आले़ आज सकाळी ओबीसी कर्मचारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रा़ शेषराव येलेकर, ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष अरुण मुनघाटे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दादाजी चापले यांच्यासह प्रशांत वाघरे, रमेश भुरसे, प्रभाकर वासेकर, दादा चुधरी, गणेश वसू, प्रवीण म्हशाखेत्री, रत्नदीप म्हशाखेत्री, भास्कर बुरे, संतोष बोलुवार आदींनी गडचिरोली येथील शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन ती बंद करायला लावली़ आज सकाळी खासगी शाळा, महाविद्यालये सुरू होती़ परंतु आंदोलनकर्त्यांनी धडक दिल्यानंतर सकाळच्या शाळेला सुटी देण्यात आली़ त्यानंतर दुपारच्या सत्रातील शाळा बंद ठेवण्यात आल्या़त्यानंतर विविध ओबीसी संघटनांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी यांचेकडे मागण्यांचे निवेदन सादर केले. सदर निवेदनाची प्रती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, महसूलमंत्री, शिक्षणमंत्री, ग्रामविकास मंत्री व सामाजिक न्याय मंत्र्यांकडे पाठविण्यात आली आहे. आंदोलनात लोकनेते नामदेव गडपल्लीवार यांच्यासह शेकडो ओबीसी बांधव सहभागी झाले होते.