शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
4
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
5
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
6
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
7
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
8
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
9
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
10
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
11
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
12
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
13
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
15
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
16
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
17
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
18
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
19
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
20
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव

तेंदूपत्ता मजुरांची संख्या घटली

By admin | Updated: May 27, 2014 23:43 IST

सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देणारा हंगाम असलेल्या तेंदूपत्ता संकलनाला ओळखले जाते. तेंदूपत्ता संकलनासाठी दरवर्षीच्या तुलनेत दिवसेंदिवस परजिल्ह्यातील मजुरांची संख्या

गडचिरोली : सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देणारा हंगाम असलेल्या तेंदूपत्ता संकलनाला ओळखले जाते. तेंदूपत्ता संकलनासाठी दरवर्षीच्या तुलनेत दिवसेंदिवस परजिल्ह्यातील मजुरांची संख्या मोठय़ा प्रमाणात घटत आहे.

गडचिरोली जिल्ह्यात उत्कृष्ठ दर्जाचा तेंदूपत्ता मिळतो. त्यामुळे येथील तेंदूत्त्याला राष्ट्रीय स्तरावर चांगला भाव मिळत असल्याने विविध राज्यातील तेंदूपत्ता कंत्राटदार तेंदूपत्ता संकलनाचे कंत्राट घेतात. यापासून वनविभागालासुध्दा कोट्यवधी रूपयाचा महसूल प्राप्त होतो. तेंदूपत्ता जास्त संकलन होण्यावरच कंत्राटदाराचा नफा अवलंबून असल्याने कंत्राटदार जास्तीत जास्त मजूर आणून तेंदूपत्ता संकलन करण्याचा प्रयत्न करतात. काही वर्षापूर्वी नजीकच्या चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व छत्तीसगड राज्यातील मजूर आणून तेंदूपत्ता संकलन केले जात होते. कंत्राटदाराला कंत्राट मिळाल्याबरोबर दिवाणजीच्या मदतीने मजुरांची यादी बनविली जात होती. एवढेच नाही तर कंत्राटदार स्वत:चे वाहन पाठवून मजुरांना तेंदूपत्ता संकलनाच्या जागी घेऊन जात होता. मजुरांना तेंदूपत्ता संकलन करण्यापूर्वीच काही पैसे आगावू देत होता. उन्हाळ्यात शेतीची कामे राहात नसल्याने ग्रामीण भागातील मजुरही तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात जात होते. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या सावली, ब्रम्हपूरी, गोंडपिपरी या तालुक्यातील बहुसंख्य नागरिक तेंदूपत्ता संकलनासाठी जात असल्याने ही गावे ओसाड पडत होती. एवढेच नाही तर लग्न विधी, बारसे व इतर कार्यक्रमे तेंदूपत्ता संकलनाच्या पूर्वीच आटोपून घेतली जात होती. आता परिस्थिती मात्र पूर्णपणे बदलली आहे. शेतकर्‍यांनी शेतामध्ये विहिर, बोअरवेल खोदले आहे. या साधनांच्या मदतीने भाजीपाल्याची पिके उन्हाळ्यातही घेत आहेत. बर्‍याच भागामध्ये उन्हाळ्यामध्ये रोजगार हमी योजनेची कामे सुरू राहत असल्याने दीडशे ते दोनशे रूपयापर्यंतची मजुरी गावातच मिळत आहे. त्यामुळे तेंदूपत्ता संकलनाला जाण्याची गरज राहिली नाही. ग्रामीण भागामध्ये असलेला तरूण वर्ग उन्हाळ्यामध्ये शहरात जाऊन कारखान्यामध्ये काम करण्याला पसंती देत आहे. शासनाने अन्न सुरक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला महिन्याकाठी ५ किलो राशन उपलब्ध करून देत आहे. या सर्व बाबींमुळे तेंदूपत्ता संकलनाला येण्यास बाहेर जिल्ह्यातील नागरिक तयार होत नाही.

तेंदूपत्ता संकलनादरम्यान तेंदूची झाडे तोडत असल्याचा नक्षल्यांचा आरोप असल्याने कधीकधी नक्षली तेंदूपत्ता संकलनास विरोध करतात. नक्षली कारवायांच्या बातम्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून दुसर्‍या जिल्ह्यातील नागरिक वाचत असल्याने चार पैसे न मिळालेले बरे मात्र जीव गमाविणार नाही, असा विचार नागरिक करीत असल्याने तेंदूपत्ता संकलनाला येण्यास तयार होत नाही.