शहरं
Join us  
Trending Stories
1
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
2
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
3
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
4
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
5
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
6
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
7
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
8
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
9
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
10
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
11
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
12
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
13
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
14
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
15
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
16
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
17
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
18
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
19
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
20
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपत्ता मजुरांची संख्या घटली

By admin | Updated: May 27, 2014 23:43 IST

सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देणारा हंगाम असलेल्या तेंदूपत्ता संकलनाला ओळखले जाते. तेंदूपत्ता संकलनासाठी दरवर्षीच्या तुलनेत दिवसेंदिवस परजिल्ह्यातील मजुरांची संख्या

गडचिरोली : सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देणारा हंगाम असलेल्या तेंदूपत्ता संकलनाला ओळखले जाते. तेंदूपत्ता संकलनासाठी दरवर्षीच्या तुलनेत दिवसेंदिवस परजिल्ह्यातील मजुरांची संख्या मोठय़ा प्रमाणात घटत आहे.

गडचिरोली जिल्ह्यात उत्कृष्ठ दर्जाचा तेंदूपत्ता मिळतो. त्यामुळे येथील तेंदूत्त्याला राष्ट्रीय स्तरावर चांगला भाव मिळत असल्याने विविध राज्यातील तेंदूपत्ता कंत्राटदार तेंदूपत्ता संकलनाचे कंत्राट घेतात. यापासून वनविभागालासुध्दा कोट्यवधी रूपयाचा महसूल प्राप्त होतो. तेंदूपत्ता जास्त संकलन होण्यावरच कंत्राटदाराचा नफा अवलंबून असल्याने कंत्राटदार जास्तीत जास्त मजूर आणून तेंदूपत्ता संकलन करण्याचा प्रयत्न करतात. काही वर्षापूर्वी नजीकच्या चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व छत्तीसगड राज्यातील मजूर आणून तेंदूपत्ता संकलन केले जात होते. कंत्राटदाराला कंत्राट मिळाल्याबरोबर दिवाणजीच्या मदतीने मजुरांची यादी बनविली जात होती. एवढेच नाही तर कंत्राटदार स्वत:चे वाहन पाठवून मजुरांना तेंदूपत्ता संकलनाच्या जागी घेऊन जात होता. मजुरांना तेंदूपत्ता संकलन करण्यापूर्वीच काही पैसे आगावू देत होता. उन्हाळ्यात शेतीची कामे राहात नसल्याने ग्रामीण भागातील मजुरही तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात जात होते. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या सावली, ब्रम्हपूरी, गोंडपिपरी या तालुक्यातील बहुसंख्य नागरिक तेंदूपत्ता संकलनासाठी जात असल्याने ही गावे ओसाड पडत होती. एवढेच नाही तर लग्न विधी, बारसे व इतर कार्यक्रमे तेंदूपत्ता संकलनाच्या पूर्वीच आटोपून घेतली जात होती. आता परिस्थिती मात्र पूर्णपणे बदलली आहे. शेतकर्‍यांनी शेतामध्ये विहिर, बोअरवेल खोदले आहे. या साधनांच्या मदतीने भाजीपाल्याची पिके उन्हाळ्यातही घेत आहेत. बर्‍याच भागामध्ये उन्हाळ्यामध्ये रोजगार हमी योजनेची कामे सुरू राहत असल्याने दीडशे ते दोनशे रूपयापर्यंतची मजुरी गावातच मिळत आहे. त्यामुळे तेंदूपत्ता संकलनाला जाण्याची गरज राहिली नाही. ग्रामीण भागामध्ये असलेला तरूण वर्ग उन्हाळ्यामध्ये शहरात जाऊन कारखान्यामध्ये काम करण्याला पसंती देत आहे. शासनाने अन्न सुरक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला महिन्याकाठी ५ किलो राशन उपलब्ध करून देत आहे. या सर्व बाबींमुळे तेंदूपत्ता संकलनाला येण्यास बाहेर जिल्ह्यातील नागरिक तयार होत नाही.

तेंदूपत्ता संकलनादरम्यान तेंदूची झाडे तोडत असल्याचा नक्षल्यांचा आरोप असल्याने कधीकधी नक्षली तेंदूपत्ता संकलनास विरोध करतात. नक्षली कारवायांच्या बातम्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून दुसर्‍या जिल्ह्यातील नागरिक वाचत असल्याने चार पैसे न मिळालेले बरे मात्र जीव गमाविणार नाही, असा विचार नागरिक करीत असल्याने तेंदूपत्ता संकलनाला येण्यास तयार होत नाही.