शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

अहेरीच्या विद्याभारतीत विद्यार्थ्यांच्या संख्येत गोंधळच

By admin | Updated: April 9, 2015 01:31 IST

अहेरीसारख्या दुर्गम तालुक्यात गुरूकूल बहुउद्देशिय शिक्षण संस्थेने वर्धा जिल्ह्यातून येऊन येथे विद्याभारती कॉलेज आॅफ एडव्हाँस स्टडीज सुरू केले आहे.

अहेरी : अहेरीसारख्या दुर्गम तालुक्यात गुरूकूल बहुउद्देशिय शिक्षण संस्थेने वर्धा जिल्ह्यातून येऊन येथे विद्याभारती कॉलेज आॅफ एडव्हाँस स्टडीज सुरू केले आहे. या महाविद्यालयाच्या पटसंख्येवर दाखविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी कित्येकांनी परीक्षेसाठी अर्जच भरलेले नाही, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मात्र या महाविद्यालयाने सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीसाठी तब्बल ९१ विद्यार्थ्यांची नोंद केली आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर या महाविद्यालयाविषयीही शंकेची पाल चुकचुकली आहे. अहेरी हा गडचिरोली जिल्ह्याचा दुर्गम तालुका आहे. या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी विद्याभारती कॉलेज आॅफ एडव्हाँस स्टडीज, अहेरी महाविद्यालय एका लहानशा जागेत चालविले जात आहे. येथे १९२ विद्यार्थी संख्या असल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात १५ ते २० विद्यार्थी महाविद्यालयात नियमितपणे येतात, असे दिसून येते. कला शाखेच्या प्रथम वर्षाला ११ विद्यार्थी, द्वितीय वर्षाला ३७ विद्यार्थी तर तृतीय वर्षाला तीन विद्यार्थी असल्याची माहिती देण्यात आली. तर वाणिज्य शाखेमध्ये फक्त प्रथम वर्षच असून येथे ४० विद्यार्थी असल्याचे सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची ही संख्या पाहू जाता कागदोपत्री बराच अभ्यासक्रम येथे पार पाडला जात असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. ग्रंथपाल (बि.लिब) अभ्यासक्रमाला १३ विद्यार्थ्यांचा प्रवेश दाखविण्यात आला आहे. मात्र परीक्षेचा अर्ज नऊ विद्यार्थ्यांनी भरला व आठ विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक परीक्षेला उपस्थिती लावली, अशी माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली. १९२ विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या या महाविद्यालयात नऊ शिक्षक आहेत. त्यापैकी दोघांनी नुकतेच महाविद्यालय सोडले. आता सातच शिक्षक उरलेले आहे. या महाविद्यालयात एक शिक्षकेत्तर कर्मचारी असून स्वच्छतेच्या कामासाठी रोजंदारीवर एक महिला काम करते. प्रत्येक शिक्षकाला पाच हजार रूपये पगारावर ठरविण्यात आले आहे. मात्र मागील पाच महिन्यांपासून पगार मिळाले नसल्याची माहिती पुढे आली आहे. कुठल्याही सुविधा नसलेल्या या महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश कोणत्या उद्देशाने घेतले, हे मात्र गुलदस्त्यातच आहे. या महाविद्यालयात अनुसूचित जातीचे ९७, अनुसूचित जमातीचे ५२, एनटी प्रवर्गाचे १४, एसबीसी १, ओबीसी १८, ओपन १० प्रवर्गाचे विद्यार्थी असल्याची माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली. एकूणच दुर्गम भागात असलेल्या या महाविद्यालयातील विद्यार्थी संख्येविषयी सध्यातरी गोंधळाची परिस्थिती कायम आहे.