शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने मिराज, जेएफ-१७ सह ५ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली; ऑपरेशन सिंदूरबाबत खुलासा
2
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
3
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
4
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
5
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
6
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
7
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
8
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
9
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
10
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
12
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
13
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
14
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
15
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
16
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
17
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
18
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
19
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
20
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा

अहेरीच्या विद्याभारतीत विद्यार्थ्यांच्या संख्येत गोंधळच

By admin | Updated: April 9, 2015 01:31 IST

अहेरीसारख्या दुर्गम तालुक्यात गुरूकूल बहुउद्देशिय शिक्षण संस्थेने वर्धा जिल्ह्यातून येऊन येथे विद्याभारती कॉलेज आॅफ एडव्हाँस स्टडीज सुरू केले आहे.

अहेरी : अहेरीसारख्या दुर्गम तालुक्यात गुरूकूल बहुउद्देशिय शिक्षण संस्थेने वर्धा जिल्ह्यातून येऊन येथे विद्याभारती कॉलेज आॅफ एडव्हाँस स्टडीज सुरू केले आहे. या महाविद्यालयाच्या पटसंख्येवर दाखविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी कित्येकांनी परीक्षेसाठी अर्जच भरलेले नाही, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मात्र या महाविद्यालयाने सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीसाठी तब्बल ९१ विद्यार्थ्यांची नोंद केली आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर या महाविद्यालयाविषयीही शंकेची पाल चुकचुकली आहे. अहेरी हा गडचिरोली जिल्ह्याचा दुर्गम तालुका आहे. या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी विद्याभारती कॉलेज आॅफ एडव्हाँस स्टडीज, अहेरी महाविद्यालय एका लहानशा जागेत चालविले जात आहे. येथे १९२ विद्यार्थी संख्या असल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात १५ ते २० विद्यार्थी महाविद्यालयात नियमितपणे येतात, असे दिसून येते. कला शाखेच्या प्रथम वर्षाला ११ विद्यार्थी, द्वितीय वर्षाला ३७ विद्यार्थी तर तृतीय वर्षाला तीन विद्यार्थी असल्याची माहिती देण्यात आली. तर वाणिज्य शाखेमध्ये फक्त प्रथम वर्षच असून येथे ४० विद्यार्थी असल्याचे सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची ही संख्या पाहू जाता कागदोपत्री बराच अभ्यासक्रम येथे पार पाडला जात असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. ग्रंथपाल (बि.लिब) अभ्यासक्रमाला १३ विद्यार्थ्यांचा प्रवेश दाखविण्यात आला आहे. मात्र परीक्षेचा अर्ज नऊ विद्यार्थ्यांनी भरला व आठ विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक परीक्षेला उपस्थिती लावली, अशी माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली. १९२ विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या या महाविद्यालयात नऊ शिक्षक आहेत. त्यापैकी दोघांनी नुकतेच महाविद्यालय सोडले. आता सातच शिक्षक उरलेले आहे. या महाविद्यालयात एक शिक्षकेत्तर कर्मचारी असून स्वच्छतेच्या कामासाठी रोजंदारीवर एक महिला काम करते. प्रत्येक शिक्षकाला पाच हजार रूपये पगारावर ठरविण्यात आले आहे. मात्र मागील पाच महिन्यांपासून पगार मिळाले नसल्याची माहिती पुढे आली आहे. कुठल्याही सुविधा नसलेल्या या महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश कोणत्या उद्देशाने घेतले, हे मात्र गुलदस्त्यातच आहे. या महाविद्यालयात अनुसूचित जातीचे ९७, अनुसूचित जमातीचे ५२, एनटी प्रवर्गाचे १४, एसबीसी १, ओबीसी १८, ओपन १० प्रवर्गाचे विद्यार्थी असल्याची माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली. एकूणच दुर्गम भागात असलेल्या या महाविद्यालयातील विद्यार्थी संख्येविषयी सध्यातरी गोंधळाची परिस्थिती कायम आहे.