शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

गैरआदिवासींच्या प्रश्नावर भाजप लोकप्रतिनिधी गप्प

By admin | Updated: August 14, 2015 01:40 IST

निवडून आल्यानंतर जिल्ह्यातील गैरआदिवासींचे प्रश्न आपण सोडवू असे आश्वासन जिल्ह्यातील आमदार व खासदारांनी दिले होते.

उपोषणस्थळाला भेट : उसेंडी यांचा आरोपगडचिरोली : निवडून आल्यानंतर जिल्ह्यातील गैरआदिवासींचे प्रश्न आपण सोडवू असे आश्वासन जिल्ह्यातील आमदार व खासदारांनी दिले होते. मात्र निवडणुकीनंतर या प्रश्नांचा त्यांना विसर पडला असून याबाबत ते चुप्पी साधून असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी केला आहे.गैरआदिवासींच्या समस्या सोडवाव्या, या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या वतीने ९ आॅगस्टपासून स्थानिक इंदिरा गांधी चौकात साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे. या उपोषणस्थळाला डॉ. उसेंडी यांनी गुरूवारी भेट देऊन आंदोलनाला आपला पाठींबा दर्शविला. त्याचबरोबर विद्यमान आमदार व खासदारांच्या धोरणावर टीकासुध्दा केली. आमदार व राज्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मंत्रिमंडळात चर्चेसाठी आणावा. त्याचबरोबर अधिसूचना रद्द करण्यासाठी आदिवासी सल्लागार समितीच्या मार्फतीने राज्यपालांकडे मागणी लावून धरल्यास अधिसूचनेत बदल शक्य असल्याचे सांगितले. आमदार होळी यांचे वक्तव्य लोकभावना भडकावणारे असल्याचीही टीका केली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव हसन गिलानी, पंकज गुड्डेवार, प्रभाकर वासेकर, नरेंद्र भरडकर, टी. डी. सोनटक्के, पंडीत पुडके, अमिता लोणारकर, शंकरराव सालोटकर, पांडुरंग घोटेकर, संतोष आत्राम, डी. डी. सोनटक्के, पी. टी. मसराम, समशेर पठाण, प्रदीप महाजन, दिवाकर मिसार, ढिवरू मसराम, बालू मडावी, संजय घोटेकर, नंदू वाईलकर, सतिश विधाते, महेंद्र ब्राह्मवाडे, रजनिकांत मोटघरे, अमोल भडांगे, नितेश राठोड, प्रतिक बारसिंगे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.(नगर प्रतिनिधी)