शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

ना सॅनिटायझर, ना चेहऱ्यावर मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 05:00 IST

सार्वजनिक व्यवहार सुरू करताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानदारांपासून बँकांपर्यंत सर्वांसाठी सूचनावली जाहीर केली आहे. त्यात सॅनिटायझर ठेवणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आदी नियम अत्यावश्यक आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी त्या सूचनांचे काटेकोर पालन न केल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हाही दाखल होऊ शकतो, अशा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देबँकांच्या एटीएममधील बेजबाबदारपणा : नागरिकही बिनधास्त, तक्रार करण्यासाठी कुणालाच वेळ नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा ७५० पेक्षा वर गेला आहे. मात्र कोरोनाच्या या वाढत्या आकड्यासोबत नागरिकांमधील बिनधास्तपणा आणि बँकांसारख्या जबाबदार घटकांचा बेजबाबदारपणाही वाढत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत स्पष्टपणे दिसून आले. दिवसभरात शेकडो लोकांचा संपर्क येऊन बटनांना थेट स्पर्श होणाºया बँकांच्या एटीएममध्ये साधे सॅनिटायझर ठेवण्याचे सौजन्यही बहुतांश बँकांनी दाखविलेले नाही.विशेष म्हणजे याबाबत आजपर्यंत कोणीही बँकांकडे तक्रार केलेली नाही. उलट स्वत:च विनामास्क येऊन एटीएममधील व्यवहार करून बिनधास्त पुढच्या कामाला लागणाऱ्यांचे प्रमाण अर्ध्यापेक्षा जास्त होते. त्यामुळे हे बिनधास्त नागरिक कोरोनाचे वाहक तर होणार नाही ना, अशी शंका निर्माण होत आहे. सार्वजनिक व्यवहार सुरू करताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानदारांपासून बँकांपर्यंत सर्वांसाठी सूचनावली जाहीर केली आहे. त्यात सॅनिटायझर ठेवणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आदी नियम अत्यावश्यक आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी त्या सूचनांचे काटेकोर पालन न केल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हाही दाखल होऊ शकतो, अशा इशारा देण्यात आला आहे. मात्र कोणावर कारवाईच होत नसल्यामुळे सामान्य नागरिकांसोबत आता बँकांसारखे जबाबदार घटकही बिनधास्त झाले आहेत.कळते पण वळत नाही अशी सर्वांची स्थितीसर्वाधिक व्यवहार होणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएममध्ये कोणीही सुरक्षा रक्षक नव्हता आणि सॅनिटायझरचीही व्यवस्था नव्हती. काही लोक नाकातोंडावर मास्क किंवा रूमाल लावून येत होते, पण जास्तीत जास्त लोक याबाबतीत बिनधास्त होते. कोरोनाच्या स्थितीचा त्यांच्यावर कोणताही परिणाम दिसून येत नव्हता. हीच स्थिती बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि युनियन बँक यांच्या एटीएममध्ये दिसून आली. काही नागरिकांना या बिनधास्त वागण्याबद्दल हटकले असता किती वेळा सॅनिटायझर लावणार? असा प्रश्नार्थक सूर व्यक्त करत त्यांनी एटीएममध्ये सॅनिटायझर नसल्याबद्दल कोणतीही हरकत घेण्यास नकार दिला. बहुतांश लोकांनी मात्र सॅनिटायझर असायला हवे असे सांगत ते असते तर वापर केला असता. पण नाही म्हणून कोणाकडे तक्रार करणार नाही, तेवढा वेळ कोणाला आहे? असे म्हणून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.जिल्हा बँक आणि अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम सुसज्जगडचिरोली शहरात कार्यरत असणाऱ्या विविध बँकांमध्ये लोकमत चमुने प्रत्यक्ष पाहणी केली असता केवळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि अ‍ॅक्सिस बँक या दोनच बँकांच्या एटीएम मध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचे दिसून आले. जिल्हा बँकेच्या एटीएमबाहेर सुरक्षा रक्षक आणि आतमध्ये सॅनिटायझरची बाटलीही होती. पण मोजकेच लोक त्याचा वापर करत होते. अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये व्यवहार आटोपल्यानंतर सुरक्षा रक्षक आपल्या हाताने सॅनिटायझर देत होता.स्टेट बँकेच्या प्रत्येक एटीएममध्ये आधी तीन सुरक्षा रक्षकांची आळीपाळीने २४ तास ड्युटी रहायची. पण वरिष्ठ स्तरावरूनच सुरक्षा रक्षकांची सेवा बंद करण्यात आली. आम्हाला आमच्या स्तरावर एटीएम मध्ये, बँकेत सॅनिटायझर ठेवण्याचा अधिकार आहे. त्याबाबत योग्य ती खबरदारी घेऊ पण नागरिकांनीही आपली जबाबदारी निट सांभाळली पाहीजे.- एस.एफ.येसनसुरे,शाखा व्यवस्थापक, एसबीआय गडचिरोली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या