शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

ना सॅनिटायझर, ना चेहऱ्यावर मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 05:00 IST

सार्वजनिक व्यवहार सुरू करताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानदारांपासून बँकांपर्यंत सर्वांसाठी सूचनावली जाहीर केली आहे. त्यात सॅनिटायझर ठेवणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आदी नियम अत्यावश्यक आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी त्या सूचनांचे काटेकोर पालन न केल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हाही दाखल होऊ शकतो, अशा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देबँकांच्या एटीएममधील बेजबाबदारपणा : नागरिकही बिनधास्त, तक्रार करण्यासाठी कुणालाच वेळ नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा ७५० पेक्षा वर गेला आहे. मात्र कोरोनाच्या या वाढत्या आकड्यासोबत नागरिकांमधील बिनधास्तपणा आणि बँकांसारख्या जबाबदार घटकांचा बेजबाबदारपणाही वाढत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत स्पष्टपणे दिसून आले. दिवसभरात शेकडो लोकांचा संपर्क येऊन बटनांना थेट स्पर्श होणाºया बँकांच्या एटीएममध्ये साधे सॅनिटायझर ठेवण्याचे सौजन्यही बहुतांश बँकांनी दाखविलेले नाही.विशेष म्हणजे याबाबत आजपर्यंत कोणीही बँकांकडे तक्रार केलेली नाही. उलट स्वत:च विनामास्क येऊन एटीएममधील व्यवहार करून बिनधास्त पुढच्या कामाला लागणाऱ्यांचे प्रमाण अर्ध्यापेक्षा जास्त होते. त्यामुळे हे बिनधास्त नागरिक कोरोनाचे वाहक तर होणार नाही ना, अशी शंका निर्माण होत आहे. सार्वजनिक व्यवहार सुरू करताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानदारांपासून बँकांपर्यंत सर्वांसाठी सूचनावली जाहीर केली आहे. त्यात सॅनिटायझर ठेवणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आदी नियम अत्यावश्यक आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी त्या सूचनांचे काटेकोर पालन न केल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हाही दाखल होऊ शकतो, अशा इशारा देण्यात आला आहे. मात्र कोणावर कारवाईच होत नसल्यामुळे सामान्य नागरिकांसोबत आता बँकांसारखे जबाबदार घटकही बिनधास्त झाले आहेत.कळते पण वळत नाही अशी सर्वांची स्थितीसर्वाधिक व्यवहार होणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएममध्ये कोणीही सुरक्षा रक्षक नव्हता आणि सॅनिटायझरचीही व्यवस्था नव्हती. काही लोक नाकातोंडावर मास्क किंवा रूमाल लावून येत होते, पण जास्तीत जास्त लोक याबाबतीत बिनधास्त होते. कोरोनाच्या स्थितीचा त्यांच्यावर कोणताही परिणाम दिसून येत नव्हता. हीच स्थिती बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि युनियन बँक यांच्या एटीएममध्ये दिसून आली. काही नागरिकांना या बिनधास्त वागण्याबद्दल हटकले असता किती वेळा सॅनिटायझर लावणार? असा प्रश्नार्थक सूर व्यक्त करत त्यांनी एटीएममध्ये सॅनिटायझर नसल्याबद्दल कोणतीही हरकत घेण्यास नकार दिला. बहुतांश लोकांनी मात्र सॅनिटायझर असायला हवे असे सांगत ते असते तर वापर केला असता. पण नाही म्हणून कोणाकडे तक्रार करणार नाही, तेवढा वेळ कोणाला आहे? असे म्हणून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.जिल्हा बँक आणि अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम सुसज्जगडचिरोली शहरात कार्यरत असणाऱ्या विविध बँकांमध्ये लोकमत चमुने प्रत्यक्ष पाहणी केली असता केवळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि अ‍ॅक्सिस बँक या दोनच बँकांच्या एटीएम मध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचे दिसून आले. जिल्हा बँकेच्या एटीएमबाहेर सुरक्षा रक्षक आणि आतमध्ये सॅनिटायझरची बाटलीही होती. पण मोजकेच लोक त्याचा वापर करत होते. अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये व्यवहार आटोपल्यानंतर सुरक्षा रक्षक आपल्या हाताने सॅनिटायझर देत होता.स्टेट बँकेच्या प्रत्येक एटीएममध्ये आधी तीन सुरक्षा रक्षकांची आळीपाळीने २४ तास ड्युटी रहायची. पण वरिष्ठ स्तरावरूनच सुरक्षा रक्षकांची सेवा बंद करण्यात आली. आम्हाला आमच्या स्तरावर एटीएम मध्ये, बँकेत सॅनिटायझर ठेवण्याचा अधिकार आहे. त्याबाबत योग्य ती खबरदारी घेऊ पण नागरिकांनीही आपली जबाबदारी निट सांभाळली पाहीजे.- एस.एफ.येसनसुरे,शाखा व्यवस्थापक, एसबीआय गडचिरोली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या