शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
5
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
6
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
7
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
8
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
9
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
10
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
11
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
12
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
13
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
14
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
16
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
17
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
18
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
19
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
20
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?

अबब..... ६८ कि.मी.चे अंतर कापण्यासाठी ११२ कि.मी.चा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 12:20 IST

जिल्हा निर्मितीला ३९ वर्षे होऊनही ६८ किमीच्या अंतरासाठी आष्टी-आल्लापल्ली मार्गे एट्टापल्ली ११२ कि.मी.चा प्रवास करावा लागत आहे. वाहनधारकांना अंदाजे ४४ कि.मी. जादाचा प्रवास करण्याची पाळी आली आहे.

ठळक मुद्देखासदारांना निवेदन : दिना नदीवर देवदानजीक पुलाची निर्मिती करण्याची मागणी

गडचिरोली : चामोर्शी - एट्टापल्ली व्हाया घोट, देवदा या मार्गावर अडसर असलेल्या देवदा जवळील दिना नदीवर अजूनही पूल झाला नाही. जिल्हा निर्मितीला ३९ वर्षे होऊनही ६८ किमीच्या अंतरासाठी आष्टी-आल्लापल्ली मार्गे एट्टापल्ली ११२ कि.मी.चा प्रवास करावा लागत आहे. वाहनधारकांना अंदाजे ४४ कि.मी. जादाचा प्रवास करण्याची पाळी आली आहे.

नागरिकांची अडचण लक्षात घेऊन दिना नदीवर देवदा नजीक पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य भाजप शिक्षक आघाडीचे सदस्य विजय कोमरवार यांनी खासदार अशोक नेते यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील काही भाग अद्यापही रस्ते विकासात मागे असल्याचे चित्र आहे.

त्यातीलच चामोर्शी व्हाया घोट, एट्टापल्ली हा ६८ कि.मी.चा मार्ग असून, या मार्गावर घोट, निकतवाडा, नवेगाव, पोतेपल्ली, माडे आमगाव, पुसंगुड्डा, रेगडी, देवदा, बोलेपल्ली, चंदनवेल्ली, गेदा, जीवनगट्टा, एट्टापल्ली अशी जवळपास १२ गावे येतात. आल्लापल्ली - आष्टी मार्गाचे अंतर अधिक असल्याने वाहनधारक या जवळच्या मार्गाचा अवलंब करतात; मात्र पावसाळ्यात या नदीवरील घोट बाजूचा घाट दुरुस्त नसल्यामुळे जीव मुठीत धरून वाहन हळूहळू काढावे लागते.

हिवाळा व उन्हाळ्यात हा मार्ग वाहनधारकांना परवडण्यासारखा असल्याने वाहनधारक या मार्गाचा अवलंब करतात. नाल्यावर पाणी असल्यास वाहतूक बंद असते. पाणी नसल्यास त्या मार्गाने दुचाकी, चारचाकी व मालवाहतूक वाहने मोठ्या प्रमाणात याच मार्गाचा उपयोग करतात. तसेच एट्टापल्लीकडून गडचिरोलीकडे जाणारे वाहनधारक जवळचा मार्ग म्हणून घोट-पोटेगाव मार्गाने जातात. देवदा नजीक पुलाची निर्मिती करून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी खा. नेते यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रसाद नड्डा व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही पाठविण्यात आली आहे.

हा मार्ग साेयीस्कर

दिना नदी लहान असल्याने पुलावर येणारा खर्च कमी येऊ शकतो. या मार्गावरून चामोर्शी किंवा गडचिरोली येण्यासाठी ४४ कि.मी.चा अधिक प्रवास करून मानसिक व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. जिल्हा पोलीस विभागाच्या पोलीस पथकांना नेहमीच एटापल्ली, भामरागड , अहेरीकडे पेट्रोलिंगसाठी जावे लागते त्यादृष्टीने त्यांना अत्यंत जवळचा रस्ता ठरू शकतो. अनेक शासकीय कामासाठी जिल्हास्थळी येण्यासाठी कमी अंतराचा प्रवास करण्यासाठी वाहतुकीसाठी देवदा नाल्यावर पुलाचे बांधकाम हाेणे आवश्यक आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक