शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

अबब..... ६८ कि.मी.चे अंतर कापण्यासाठी ११२ कि.मी.चा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 12:20 IST

जिल्हा निर्मितीला ३९ वर्षे होऊनही ६८ किमीच्या अंतरासाठी आष्टी-आल्लापल्ली मार्गे एट्टापल्ली ११२ कि.मी.चा प्रवास करावा लागत आहे. वाहनधारकांना अंदाजे ४४ कि.मी. जादाचा प्रवास करण्याची पाळी आली आहे.

ठळक मुद्देखासदारांना निवेदन : दिना नदीवर देवदानजीक पुलाची निर्मिती करण्याची मागणी

गडचिरोली : चामोर्शी - एट्टापल्ली व्हाया घोट, देवदा या मार्गावर अडसर असलेल्या देवदा जवळील दिना नदीवर अजूनही पूल झाला नाही. जिल्हा निर्मितीला ३९ वर्षे होऊनही ६८ किमीच्या अंतरासाठी आष्टी-आल्लापल्ली मार्गे एट्टापल्ली ११२ कि.मी.चा प्रवास करावा लागत आहे. वाहनधारकांना अंदाजे ४४ कि.मी. जादाचा प्रवास करण्याची पाळी आली आहे.

नागरिकांची अडचण लक्षात घेऊन दिना नदीवर देवदा नजीक पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य भाजप शिक्षक आघाडीचे सदस्य विजय कोमरवार यांनी खासदार अशोक नेते यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील काही भाग अद्यापही रस्ते विकासात मागे असल्याचे चित्र आहे.

त्यातीलच चामोर्शी व्हाया घोट, एट्टापल्ली हा ६८ कि.मी.चा मार्ग असून, या मार्गावर घोट, निकतवाडा, नवेगाव, पोतेपल्ली, माडे आमगाव, पुसंगुड्डा, रेगडी, देवदा, बोलेपल्ली, चंदनवेल्ली, गेदा, जीवनगट्टा, एट्टापल्ली अशी जवळपास १२ गावे येतात. आल्लापल्ली - आष्टी मार्गाचे अंतर अधिक असल्याने वाहनधारक या जवळच्या मार्गाचा अवलंब करतात; मात्र पावसाळ्यात या नदीवरील घोट बाजूचा घाट दुरुस्त नसल्यामुळे जीव मुठीत धरून वाहन हळूहळू काढावे लागते.

हिवाळा व उन्हाळ्यात हा मार्ग वाहनधारकांना परवडण्यासारखा असल्याने वाहनधारक या मार्गाचा अवलंब करतात. नाल्यावर पाणी असल्यास वाहतूक बंद असते. पाणी नसल्यास त्या मार्गाने दुचाकी, चारचाकी व मालवाहतूक वाहने मोठ्या प्रमाणात याच मार्गाचा उपयोग करतात. तसेच एट्टापल्लीकडून गडचिरोलीकडे जाणारे वाहनधारक जवळचा मार्ग म्हणून घोट-पोटेगाव मार्गाने जातात. देवदा नजीक पुलाची निर्मिती करून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी खा. नेते यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रसाद नड्डा व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही पाठविण्यात आली आहे.

हा मार्ग साेयीस्कर

दिना नदी लहान असल्याने पुलावर येणारा खर्च कमी येऊ शकतो. या मार्गावरून चामोर्शी किंवा गडचिरोली येण्यासाठी ४४ कि.मी.चा अधिक प्रवास करून मानसिक व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. जिल्हा पोलीस विभागाच्या पोलीस पथकांना नेहमीच एटापल्ली, भामरागड , अहेरीकडे पेट्रोलिंगसाठी जावे लागते त्यादृष्टीने त्यांना अत्यंत जवळचा रस्ता ठरू शकतो. अनेक शासकीय कामासाठी जिल्हास्थळी येण्यासाठी कमी अंतराचा प्रवास करण्यासाठी वाहतुकीसाठी देवदा नाल्यावर पुलाचे बांधकाम हाेणे आवश्यक आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक