शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
3
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
4
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
5
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
6
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
7
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
8
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
9
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
10
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
11
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
12
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
13
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
14
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
15
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
16
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
17
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
18
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
19
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
20
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
Daily Top 2Weekly Top 5

-तर पुढील वर्षी वाढणार ४५०० हेक्टर सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 22:28 IST

राज्य शासनाच्या धडक सिंचन विहिरींच्या कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यासाठी ४५०० सिंचन विहिरी मंजूर आहेत. त्यापैकी १८५२ विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित २६४८ विहिरींचे काम या महिन्यात सुरू होणार आहे.

ठळक मुद्दे१८५२ विहिरी पूर्ण : चालू महिन्यात सुरू होणार २६४८ विहिरींचे काम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य शासनाच्या धडक सिंचन विहिरींच्या कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यासाठी ४५०० सिंचन विहिरी मंजूर आहेत. त्यापैकी १८५२ विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित २६४८ विहिरींचे काम या महिन्यात सुरू होणार आहे. येत्या उन्हाळ्यापर्यंत या विहिरी बांधून पूर्ण झाल्यास जिल्ह्यात पुढील वर्षी ४५०० हेक्टर अतिरिक्त सिंचनाची सोय होणार आहे.पूर्व विदर्भात सिंचन क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने ११ हजार ६१४ सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यातील सर्वाधिक ४५०० विहिरी गडचिरोली जिल्ह्यासाठी मंजूर झाल्या आहेत. नोव्हेंबर अखेरपर्यंत १८१५ विहिरी बांधून झाल्या आहेत. प्रतिविहीर १ हेक्टर याप्रमाणे सिंचन सुविधा निर्माण होते. त्यादृष्टीने जिल्ह्यासाठी मंजूर ४५०० विहिरी पूर्ण झाल्यानंतर तेवढे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.जिल्ह्यात बहुतांश भूभागावर जंगल असल्याने केवळ दिना प्रकल्प वगळता कोणताही मोठा सिंचन प्रकल्प नाही. परिणामी सिंचनासाठी शेतात विहिरी किंवा बोअरवेल खोदणे हाच पर्याय आहे. त्यामुळेच पूर्व विदर्भात सर्वाधिक सिंचन विहिरी गडचिरोली जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आल्या आहेत.एका विहिरीसाठी शासनाकडून २ लाख ५० हजार रुपयांची रक्कम दिली जाते. परंतू विहिरींचे बांधकाम स्वत: शेतकºयांनाच करायचे आहे. जसजसे बांधकाम होईल तसतसे त्यांना टप्प्याटप्प्याने अनुदानाची रक्कम दिली जाते. मात्र जिल्ह्यात विहिरींचे खोदकाम तातडीने करण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. मशिनरीसुद्धा मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे विहिरींच्या कामास थोडा विलंब होत असला तरी हे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न यंत्रणेकडून सुरू आहे. सिंचन विहिरींची मागणी जिल्ह्यात वाढली आहे.आणखी ३५०० विहिरींचा प्रस्ताव‘मागेल त्याला विहीर’ अशी घोषणा करीत हा सिंचन विहिरींचा कार्यक्रम जाहीर केल्याने जिल्हाभरातून ८२३२ अर्ज आले होते. त्यातून ६९४८ जण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ४२०२ शेतकºयांच्या अर्जांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. विहिरी खोदण्यासाठी इच्छुकांची संख्या बघता जिल्ह्यासाठी आणखी ३५०० विहिरी मंजूर करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असल्याची माहिती लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता ए.जी.रामटेके यांनी दिली.