शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

नवनिर्वाचित सरपंचांनी गाव विकासासाठी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:48 IST

मुलचेरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस समर्पित नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्कार समारंभाचे ...

मुलचेरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस समर्पित नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्कार समारंभाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

यावेळी सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती युधिष्टीर बिश्वास, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऋषिकांत पापडकर, युनूस शेख, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष ममता बिश्वास, राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जास्वंदा गोंगले, शहर अध्यक्ष ज्योती पेळूकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्यकारी अध्यक्ष मनोज बंडावार, पंचायत समिती सभापती सुवर्णा येमुलवार, उपसभापती प्रगती बंडावार हजर हाेते. ग्रामपंचायत निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस समर्पित सदस्य मोठ्या संख्येने निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले. पहिल्यांदाच निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात येत आहे. गुरुवार, २५ फेब्रुवारी रोजी मुलचेरा तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस समर्पित सदस्यांवर विश्वास दाखवून मोठ्या मताधिक्याने निवडून दिले असून, आता सत्ता स्थापन झाल्यावर सरपंच आणि सदस्यांनी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ न देता विकासकामांना गती देऊन ग्रामपंचायतीची प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले. सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनीसुद्धा मनोगत व्यक्त करताना गावविकासासाठी मोठा निधी देण्याची मागणी केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक सर्व नेत्यांचे असेच मोलाचे मार्गदर्शन नेहमी मिळणार, अशी अपेक्षा व्यक्त केली. तालुक्यात १६ ग्रामपंचायती असून, प्रत्यक्ष झालेल्या निवडणुकीत १४ ग्रामपंचायतींपैकी १० ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच विराजमान झाले असल्याचे बांधकाम सभापती युधिष्टीर बिश्वास यांनी प्रास्ताविकातून सांगितले. तालुकाध्यक्ष ममता बिश्वास यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष जास्वंदा गोंगले यांनी आभार मानले.