शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

नवनिर्वाचित सरपंचांनी गाव विकासासाठी पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:48 IST

मुलचेरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस समर्पित नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्कार समारंभाचे ...

मुलचेरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस समर्पित नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्कार समारंभाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

यावेळी सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती युधिष्टीर बिश्वास, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऋषिकांत पापडकर, युनूस शेख, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष ममता बिश्वास, राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जास्वंदा गोंगले, शहर अध्यक्ष ज्योती पेळूकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्यकारी अध्यक्ष मनोज बंडावार, पंचायत समिती सभापती सुवर्णा येमुलवार, उपसभापती प्रगती बंडावार हजर हाेते. ग्रामपंचायत निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस समर्पित सदस्य मोठ्या संख्येने निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले. पहिल्यांदाच निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात येत आहे. गुरुवार, २५ फेब्रुवारी रोजी मुलचेरा तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस समर्पित सदस्यांवर विश्वास दाखवून मोठ्या मताधिक्याने निवडून दिले असून, आता सत्ता स्थापन झाल्यावर सरपंच आणि सदस्यांनी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ न देता विकासकामांना गती देऊन ग्रामपंचायतीची प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले. सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनीसुद्धा मनोगत व्यक्त करताना गावविकासासाठी मोठा निधी देण्याची मागणी केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक सर्व नेत्यांचे असेच मोलाचे मार्गदर्शन नेहमी मिळणार, अशी अपेक्षा व्यक्त केली. तालुक्यात १६ ग्रामपंचायती असून, प्रत्यक्ष झालेल्या निवडणुकीत १४ ग्रामपंचायतींपैकी १० ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच विराजमान झाले असल्याचे बांधकाम सभापती युधिष्टीर बिश्वास यांनी प्रास्ताविकातून सांगितले. तालुकाध्यक्ष ममता बिश्वास यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष जास्वंदा गोंगले यांनी आभार मानले.