शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

मंडळ अधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारती धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2016 01:08 IST

महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी पुढाकार घेऊन गडचिरोली जिल्ह्यात ...

जीर्ण इमारतींतूनच कारभार : लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्षगडचिरोली : महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी पुढाकार घेऊन गडचिरोली जिल्ह्यात तलाठी व मंडळ कार्यालयाच्या एकूण ४० नव्या इमारतींना मंजुरी प्रदान केली. निधी उपलब्ध झाल्यानंतर या इमारती बांधण्यात आल्या. प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामूळे जिल्ह्यातील बहुतांश इमारती अद्यापही धूळ खात पडल्या आहेत. परिणामी दुसरीकडे जुन्या जीर्ण इमारतींतूनच महसूल विभागाचा कारभार चालविला जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नव्या ४० तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या प्रशस्त इमारतीसाठी तत्कालीन आघाडी शासनाने कोट्यावधी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून या कार्यालयाच्या इमारतीचे काम गतीने करण्यात आले. मधल्या काळात निधी संपल्यामुळे काही महिने या इमारतींचे काम रखडले होते. मात्र काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी सदर बाब महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना सांगितली. त्यांनी प्रयत्न करून राज्य शासनाकडून या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर जिल्ह्यात अनेक इमारती उभ्या राहिल्या. महसूल विभागाच्या कामकाजात गती यावी, तसेच तलाठी कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालयात येणाऱ्या शेतकरी व नागरिकांची पुरेशा जागेअभावी गैरसोय होऊ नये, या उद्देशाने तत्कालीन आघाडी सरकारने या इमारतीच्या बांधकामाला मंजुरी प्रदान केली. मात्र या इमारतीत महसूल विभागाचा प्रत्यक्ष कामकाज सुरू झाला नाही. परिणामी येथील मंडळ अधिकारी व तलाठ्यांना जुन्या जीर्ण इमारतीतूनच प्रशासकीय कामकाज चालवावे लागत आहे. प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी बांधकाम पूर्ण झालेल्या तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या इमारतींमध्ये प्रत्यक्षात महसूल विभागाचा कारभार सुरू करावा, अशी मागणी राकाँचे पदाधिकारी मंदीप गोरडवार यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)पावसाळ्यात धोक्याची शक्यतागडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या तलाठी व मंडळ कार्यालयाच्या इमारती जुन्या असून त्या जीर्ण झाल्या आहेत. अनेक इमारतीच्या भिंतींना तडा गेल्या आहेत. तर अनेक इमारतीच्या छतावरील कवेलूही फुटल्या आहेत. अशाच इमारतीत कार्यरत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना जमिनीचे महत्त्वपूर्ण दस्तावेज ठेवावे लागत आहे. पावसाळ्यात मुसळधार पाऊस झाल्यास सदर कागदपत्रे पावसाने भिजून नष्ट होऊ शकतात. याशिवाय मंडळ अधिकारी व तलाठ्यांना जुन्या इमारतीत पुरेशा जागेअभावी बसण्यासाठी अडचणीचे ठरत आहे. पावसाळ्यात जुन्या इमारतीमधून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.