शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

मंडळ अधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारती धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2016 01:08 IST

महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी पुढाकार घेऊन गडचिरोली जिल्ह्यात ...

जीर्ण इमारतींतूनच कारभार : लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्षगडचिरोली : महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी पुढाकार घेऊन गडचिरोली जिल्ह्यात तलाठी व मंडळ कार्यालयाच्या एकूण ४० नव्या इमारतींना मंजुरी प्रदान केली. निधी उपलब्ध झाल्यानंतर या इमारती बांधण्यात आल्या. प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामूळे जिल्ह्यातील बहुतांश इमारती अद्यापही धूळ खात पडल्या आहेत. परिणामी दुसरीकडे जुन्या जीर्ण इमारतींतूनच महसूल विभागाचा कारभार चालविला जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नव्या ४० तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या प्रशस्त इमारतीसाठी तत्कालीन आघाडी शासनाने कोट्यावधी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून या कार्यालयाच्या इमारतीचे काम गतीने करण्यात आले. मधल्या काळात निधी संपल्यामुळे काही महिने या इमारतींचे काम रखडले होते. मात्र काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी सदर बाब महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना सांगितली. त्यांनी प्रयत्न करून राज्य शासनाकडून या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर जिल्ह्यात अनेक इमारती उभ्या राहिल्या. महसूल विभागाच्या कामकाजात गती यावी, तसेच तलाठी कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालयात येणाऱ्या शेतकरी व नागरिकांची पुरेशा जागेअभावी गैरसोय होऊ नये, या उद्देशाने तत्कालीन आघाडी सरकारने या इमारतीच्या बांधकामाला मंजुरी प्रदान केली. मात्र या इमारतीत महसूल विभागाचा प्रत्यक्ष कामकाज सुरू झाला नाही. परिणामी येथील मंडळ अधिकारी व तलाठ्यांना जुन्या जीर्ण इमारतीतूनच प्रशासकीय कामकाज चालवावे लागत आहे. प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी बांधकाम पूर्ण झालेल्या तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या इमारतींमध्ये प्रत्यक्षात महसूल विभागाचा कारभार सुरू करावा, अशी मागणी राकाँचे पदाधिकारी मंदीप गोरडवार यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)पावसाळ्यात धोक्याची शक्यतागडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या तलाठी व मंडळ कार्यालयाच्या इमारती जुन्या असून त्या जीर्ण झाल्या आहेत. अनेक इमारतीच्या भिंतींना तडा गेल्या आहेत. तर अनेक इमारतीच्या छतावरील कवेलूही फुटल्या आहेत. अशाच इमारतीत कार्यरत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना जमिनीचे महत्त्वपूर्ण दस्तावेज ठेवावे लागत आहे. पावसाळ्यात मुसळधार पाऊस झाल्यास सदर कागदपत्रे पावसाने भिजून नष्ट होऊ शकतात. याशिवाय मंडळ अधिकारी व तलाठ्यांना जुन्या इमारतीत पुरेशा जागेअभावी बसण्यासाठी अडचणीचे ठरत आहे. पावसाळ्यात जुन्या इमारतीमधून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.