शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पर्लकोटाच्या अरूंद पुलाकडे सरकारचे दुर्लक्षच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:39 IST

भामरागडलगत पर्लकोटा नदीवर पूल बांधकामास आता ३५ वर्षांचा कालावधी उलटला आहे.

ठळक मुद्देअपघाताची शक्यता बळावली : अहेरी उपविभागातील नागरिकांचा धोकादायक प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागडलगत पर्लकोटा नदीवर पूल बांधकामास आता ३५ वर्षांचा कालावधी उलटला आहे. तेव्हा या पुलाचे काम नदीचे पात्र व रहदारी पाहून करण्यात आले होते. मात्र पूर्वीच्या तुलनेत आता नदीचे पात्र विस्तारले असून आवागमन करणाºया वाहनांची संख्याही प्रचंड वाढली आहे. परिणामी दरवर्षीच्या पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहत असल्याने सदर अरूंद व कमी उंचीचा पूल अधिकच धोकादायक होत आहे. मात्र या ठिकाणी नव्याने उंच व रूंद पूल उभारण्याच्या कामाकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचेही प्रचंड दुर्लक्ष होत आहे.भामरागड-आलापल्ली मार्गालगत बारमाही वाहणाºया पर्लकोटा नदीवरील अरूंद पुलामुळे पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होत असतो. उन्हाळ्यात व हिवाळ्यात या अरूंद पुलाची डोकेदुखी वाढत असून अपघातास निमंत्रण मिळत असते. पर्लकोटा नदीवरील पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांकडे सातत्याने होत आहे. सदर अरूंद पुलावरून अनेक दुचाकी व चारचाकी वाहने नदीपात्रात कोसळून अपघात घडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दोन ते तीन जणांना जीवही गमवावा लागला. सदर पुलावरून लोखंडी कठडे लावणे व काढण्याचा उपक्रम बंद झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात कठडे काढायचे व उन्हाळ्यात पुन्हा लावण्यात येत होते. मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून प्रशासनाकडून या कामाला बगल दिली जात आहे. या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.३५ वर्षांपूर्वी जेव्हा पर्लकोटा नदीवर पुलाचे काम करण्यात आले. त्यावेळी नदीचे पात्र लहान होते. तसेच रहदारीवर असलेल्या वाहनांचीही संख्या कमी होती. मात्र आता वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांचीही संख्या प्रचंड वाढली आहे. तसेच पाण्याच्या वाढत्या प्रवाहाने पर्लकोटा नदीचे पात्रही विस्तारले आहे. त्यामुळे येथे नव्याने पुलाचे बांधकाम करणे गरजेचे आहे. रात्री-बेरात्री या पुलावरून चारचाकी वाहनाची वर्दळ असते. पथदिव्याअभावी रात्रीच्या सुमारास अनेकदा या पुलावरून नदीच्या पात्रात वाहने कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सदर पूल अतिशय अरूंद असल्याने वाहनधारकांना तसेच पादचाºयांना आवागमन करणे कठीण झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून दररोज पहाटेच्या सुमारास या पुलावरून हेमलकसापर्यंत मॉर्निंगवाक करणाºयांची संख्या वाढली आहे. मात्र या अरूंद पुलामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. सध्या या नदीला पूर नसला तरी धोका कायम आहे.कठडे व पथदिवे लावापर्लकोटा नदीवरील पुलावर प्रशासनाने कठडे लावावेत, तसेच रात्रीच्या सुमारास वाहतूक सुरक्षित व्हावी, याकरिता पथदिवे लावावे, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. कठडे व पथदिव्याअभावी वाहनधारकांचा प्रवास धोकादायक सुरू आहे.