शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

पर्लकोटाच्या अरूंद पुलाकडे सरकारचे दुर्लक्षच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:39 IST

भामरागडलगत पर्लकोटा नदीवर पूल बांधकामास आता ३५ वर्षांचा कालावधी उलटला आहे.

ठळक मुद्देअपघाताची शक्यता बळावली : अहेरी उपविभागातील नागरिकांचा धोकादायक प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागडलगत पर्लकोटा नदीवर पूल बांधकामास आता ३५ वर्षांचा कालावधी उलटला आहे. तेव्हा या पुलाचे काम नदीचे पात्र व रहदारी पाहून करण्यात आले होते. मात्र पूर्वीच्या तुलनेत आता नदीचे पात्र विस्तारले असून आवागमन करणाºया वाहनांची संख्याही प्रचंड वाढली आहे. परिणामी दरवर्षीच्या पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहत असल्याने सदर अरूंद व कमी उंचीचा पूल अधिकच धोकादायक होत आहे. मात्र या ठिकाणी नव्याने उंच व रूंद पूल उभारण्याच्या कामाकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचेही प्रचंड दुर्लक्ष होत आहे.भामरागड-आलापल्ली मार्गालगत बारमाही वाहणाºया पर्लकोटा नदीवरील अरूंद पुलामुळे पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होत असतो. उन्हाळ्यात व हिवाळ्यात या अरूंद पुलाची डोकेदुखी वाढत असून अपघातास निमंत्रण मिळत असते. पर्लकोटा नदीवरील पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांकडे सातत्याने होत आहे. सदर अरूंद पुलावरून अनेक दुचाकी व चारचाकी वाहने नदीपात्रात कोसळून अपघात घडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दोन ते तीन जणांना जीवही गमवावा लागला. सदर पुलावरून लोखंडी कठडे लावणे व काढण्याचा उपक्रम बंद झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात कठडे काढायचे व उन्हाळ्यात पुन्हा लावण्यात येत होते. मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून प्रशासनाकडून या कामाला बगल दिली जात आहे. या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.३५ वर्षांपूर्वी जेव्हा पर्लकोटा नदीवर पुलाचे काम करण्यात आले. त्यावेळी नदीचे पात्र लहान होते. तसेच रहदारीवर असलेल्या वाहनांचीही संख्या कमी होती. मात्र आता वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांचीही संख्या प्रचंड वाढली आहे. तसेच पाण्याच्या वाढत्या प्रवाहाने पर्लकोटा नदीचे पात्रही विस्तारले आहे. त्यामुळे येथे नव्याने पुलाचे बांधकाम करणे गरजेचे आहे. रात्री-बेरात्री या पुलावरून चारचाकी वाहनाची वर्दळ असते. पथदिव्याअभावी रात्रीच्या सुमारास अनेकदा या पुलावरून नदीच्या पात्रात वाहने कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सदर पूल अतिशय अरूंद असल्याने वाहनधारकांना तसेच पादचाºयांना आवागमन करणे कठीण झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून दररोज पहाटेच्या सुमारास या पुलावरून हेमलकसापर्यंत मॉर्निंगवाक करणाºयांची संख्या वाढली आहे. मात्र या अरूंद पुलामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. सध्या या नदीला पूर नसला तरी धोका कायम आहे.कठडे व पथदिवे लावापर्लकोटा नदीवरील पुलावर प्रशासनाने कठडे लावावेत, तसेच रात्रीच्या सुमारास वाहतूक सुरक्षित व्हावी, याकरिता पथदिवे लावावे, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. कठडे व पथदिव्याअभावी वाहनधारकांचा प्रवास धोकादायक सुरू आहे.