शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

पर्लकोटाच्या अरूंद पुलाकडे सरकारचे दुर्लक्षच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:39 IST

भामरागडलगत पर्लकोटा नदीवर पूल बांधकामास आता ३५ वर्षांचा कालावधी उलटला आहे.

ठळक मुद्देअपघाताची शक्यता बळावली : अहेरी उपविभागातील नागरिकांचा धोकादायक प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागडलगत पर्लकोटा नदीवर पूल बांधकामास आता ३५ वर्षांचा कालावधी उलटला आहे. तेव्हा या पुलाचे काम नदीचे पात्र व रहदारी पाहून करण्यात आले होते. मात्र पूर्वीच्या तुलनेत आता नदीचे पात्र विस्तारले असून आवागमन करणाºया वाहनांची संख्याही प्रचंड वाढली आहे. परिणामी दरवर्षीच्या पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहत असल्याने सदर अरूंद व कमी उंचीचा पूल अधिकच धोकादायक होत आहे. मात्र या ठिकाणी नव्याने उंच व रूंद पूल उभारण्याच्या कामाकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचेही प्रचंड दुर्लक्ष होत आहे.भामरागड-आलापल्ली मार्गालगत बारमाही वाहणाºया पर्लकोटा नदीवरील अरूंद पुलामुळे पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होत असतो. उन्हाळ्यात व हिवाळ्यात या अरूंद पुलाची डोकेदुखी वाढत असून अपघातास निमंत्रण मिळत असते. पर्लकोटा नदीवरील पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांकडे सातत्याने होत आहे. सदर अरूंद पुलावरून अनेक दुचाकी व चारचाकी वाहने नदीपात्रात कोसळून अपघात घडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दोन ते तीन जणांना जीवही गमवावा लागला. सदर पुलावरून लोखंडी कठडे लावणे व काढण्याचा उपक्रम बंद झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात कठडे काढायचे व उन्हाळ्यात पुन्हा लावण्यात येत होते. मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून प्रशासनाकडून या कामाला बगल दिली जात आहे. या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.३५ वर्षांपूर्वी जेव्हा पर्लकोटा नदीवर पुलाचे काम करण्यात आले. त्यावेळी नदीचे पात्र लहान होते. तसेच रहदारीवर असलेल्या वाहनांचीही संख्या कमी होती. मात्र आता वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांचीही संख्या प्रचंड वाढली आहे. तसेच पाण्याच्या वाढत्या प्रवाहाने पर्लकोटा नदीचे पात्रही विस्तारले आहे. त्यामुळे येथे नव्याने पुलाचे बांधकाम करणे गरजेचे आहे. रात्री-बेरात्री या पुलावरून चारचाकी वाहनाची वर्दळ असते. पथदिव्याअभावी रात्रीच्या सुमारास अनेकदा या पुलावरून नदीच्या पात्रात वाहने कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सदर पूल अतिशय अरूंद असल्याने वाहनधारकांना तसेच पादचाºयांना आवागमन करणे कठीण झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून दररोज पहाटेच्या सुमारास या पुलावरून हेमलकसापर्यंत मॉर्निंगवाक करणाºयांची संख्या वाढली आहे. मात्र या अरूंद पुलामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. सध्या या नदीला पूर नसला तरी धोका कायम आहे.कठडे व पथदिवे लावापर्लकोटा नदीवरील पुलावर प्रशासनाने कठडे लावावेत, तसेच रात्रीच्या सुमारास वाहतूक सुरक्षित व्हावी, याकरिता पथदिवे लावावे, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. कठडे व पथदिव्याअभावी वाहनधारकांचा प्रवास धोकादायक सुरू आहे.