शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

दुर्गम भागातील रस्ते दुरूस्ती कामांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: November 8, 2014 22:38 IST

छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या कोरची तालुका मुख्यालयातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील रस्त्यांची दुरूस्ती मागील पाच-सात वर्षांपासून झालेली नाही. त्यामुळे या भागातील रस्ते

गडचिरोली : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या कोरची तालुका मुख्यालयातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील रस्त्यांची दुरूस्ती मागील पाच-सात वर्षांपासून झालेली नाही. त्यामुळे या भागातील रस्ते अतिशय खराब झाले आहेत. वाहतुकीची वर्दळ असणाऱ्या पुलावंरही मोठे खड्डे पडले असून कोचीनारा पुलावरचा खड्डा मोठ्या अपघाताला आमंत्रण देत आहे. अशीच परिस्थिती गडचिरोली तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या मारदा परिसरातील रस्त्याचीही आहे. गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या या भागातील रस्त्याच्या दुरूस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे.कोरची तालुका मुख्यालयापासून कोचीनाराकडे जाणाऱ्या मार्गाची दुरवस्था झाली असून कोचीनारा पुलाजवळ मोठा खड्डा पडला आहे. सदर खड्ड्यामुळे आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत. मात्र सदर खड्डा व मार्ग दुरूस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. कोरची-कोचीनारा हा अत्यंत महत्वाचा व नेहमी वर्दळ राहत असलेला मार्ग आहे. या मार्गावरून बेलगाव, बोटेकसा, बेतकाठी, कोटगुल आदी गावातील नागरिक नेहमीच विविध कामांसाठी कोरची येथे येतात. आपले काम आटोपून सायंकाळी गावाकडे जात असतांना वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वाहनधारकांना खड्डे चुकविणे शक्यच होत नाही. एक खड्डा चुकविताच दुसरा खड्डा पडतो. खड्ड्यांमुळे वाहने भंगार होण्याच्या स्थितीत असून वाहनधारकांनाही पाठ व मनक्याचे त्रास वाढले आहेत. सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. मात्र पावसाळा असल्याने दुरूस्ती शक्य नसल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. मात्र पावसाळा संपूण हिवाळ्याला सुरूवात झाली असली तरी अजूनपर्यंत सदर मार्गाची डागडुजीसुद्धा करण्यात आली नाही. मार्गाची दुर्दशा बघितली तर सदर मार्गाची डागडुजी करण्याऐवजी नवीन बांधकाम करणेच योग्य राहील, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे. कोरची हा नक्षलग्रस्त व जंगलाने व्यापलेला तालुका आहे. त्यामुळे या तालुक्यात वरिष्ठ अधिकारी फारसे लक्ष घालत नाही. स्थानिक अधिकारीसुद्धा कोरची तालुक्यातील समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून देत नाही. परिणामी या समस्यांचा त्रास तालुक्यातील नागरिकांना करावा लागत आहे, असा आरोप भाजपाचे कोरची सचिव मधुकर नकाते यांनी केला आहे.गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मारदा मार्गाची दुरवस्था झाली असून सदर मार्गाच्या दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. पोटेगावपासून दोन किमी अंतरावर असलेले मारदा हे नक्षलप्रभावीत दुर्गम गाव आहे. सदर गाव पोटेगाव ते पावीमुरांडा मार्गावर वसले आहे. मारदा गावाजवळ असलेल्या नाल्यावरील दोन्ही बाजुचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. रस्त्यावरील गिट्टी निघाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या परिसरात शासनाच्यावतीने अनेक विकास कामे सुरू असली तरी या रस्त्याच्या दुरूस्तीकडे मात्र बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. या मार्गाची दुरूस्ती करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने बांधकाम विभागाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. मात्र बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याने मारदावासीयांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर मार्गाची तत्काळ दुरूस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)