शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

स्पर्धेत टिकण्यासाठी मार्गदर्शन केंद्राची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2017 00:57 IST

स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.

अण्णासाहेब जाधव यांचे प्रतिपादन : कमलापूर येथे परीक्षा केंद्राचा शुभारंभकमलापूर : स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत नाही. मार्गदर्शन मिळाल्यास येथील विद्यार्थी स्पर्धेत मागे पडणार नाही, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी केले. उपपोलीस स्टेशन रेपनपल्लीतर्फे कमलापूर येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र निर्माण करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन ९ जानेवारी रोजी जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या सरपंच रजनीता मडावी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिमलगट्टाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप वांगणेर, बाबा आमटे फाऊंडेशन कमलापूरचे तुरकर, डॉ. सोमेश्वर सेलोकर, श्रीधर दुग्गीरालापाटी, सचिन ओलीटीवार, पोचन्ना चौधरी, कोरके पाटील, अनंत कोहाडे, चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना अण्णासाहेब जाधव म्हणाले, १९५८ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कमलापूर येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा सुरू केली. येथील व जिल्ह्यातील विद्यार्थी सुद्धा शिक्षण घेऊन चांगल्या पदावर कार्यरत आहेत. ही अत्यंत चांगली बाब आहे. देश डिजिटलाझेशनकडे वळत चालला आहे. येणाऱ्या काळात शहरातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा परीक्षांमध्ये टिकून नोकरी मिळविण्यासाठी योग्य मार्गदर्शन गरजेचे आहे. सदर मार्गदर्शन केंद्र येथील विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल, असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक दुरफडे, संचालन व आभारढोबळे यांनी मानले. (वार्ताहर)