शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

वाचनकेंद्रित साहित्य संमेलनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:15 IST

साहित्याच्या वाचनातून वर्तमान काळातील वेदना व व्याधींचे दर्शन घडते. यातूनच जगात बदल घडवून आणण्याची प्रेरणा समाजात निर्माण होते. वाचन हेच पृथ्वीला तिच्या नाशापासून वाचवू शकते.

ठळक मुद्देवसंत डहाके : राज्यस्तरीय साहित्य संमेलनाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : साहित्याच्या वाचनातून वर्तमान काळातील वेदना व व्याधींचे दर्शन घडते. यातूनच जगात बदल घडवून आणण्याची प्रेरणा समाजात निर्माण होते. वाचन हेच पृथ्वीला तिच्या नाशापासून वाचवू शकते. त्यामुळे समाजात वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यासाठी वाचन केंद्रीत साहित्य संमेलनाची गरज असून असे संमेलन गावोगावी झाले पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यीक व विचारवंत प्रा. वसंत आबाजी डहाके यांनी केले.सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचच्या वतीने चंद्रपूर भूषण माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री स्व. शांताराम पोटदुखे यांच्या स्मृतीस समर्पित दोन दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनाची सुरूवात शनिवारी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या डॉ. जया द्वादशीवार विचारमंचावर झाली. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डहाके उपस्थिताना संबोधित करीत होते. संमेलनाचे उद्घाटन देखण्या सभागृहात मोठ्या थाटात झाले.प्रसिद्ध वात्रटिकाकार, कवी, चित्रपट निर्माता व दिग्दर्शक रामदास फुटाणे यांनी या संमेनाचे उद्घाटन केले. तर मंचावर स्वागताध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, सूर्यांशचे अध्यक्ष इरफान शेख उपस्थित होते. प्रा. डहाके म्हणाले, विचार संवर्धनासाठी भारताची संविधा महत्त्वपूर्ण आहे. मात्र या महान ग्रंथाचे आज वाचन होत नाही. त्यामुळे वर्तमानकाळात नागरिकांकडून मूलभूत कर्तव्य पाळली जात नाही. यातून समाजात गैरकृत्य घडत आहे. त्यामुळे या ग्रंथाबद्दलचा आदर त्याच्या पूजनातून नाही, तर त्याचे वाचन व मनन करून व्यक्त केला पाहिजे. वर्तमान स्थितीत माणसातील व्यक्तीसामर्थ्य हळूहळू नाहिसे होत आहे. माणसाची घूसमट वाढत आहे. अशा परिस्थितीत आपल्या भोवती येणाऱ्या संकटाचा गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे. हा विचार साहित्यातून जन्माला येतो. जेव्हा माणसा-माणसातील प्रेम आटते, तेव्हा लेखक अस्वस्थ होतो आणि यातून निर्माण होणारे साहित्य हे प्रेरणादायी ठरते, असे ते म्हणाले.रामदास फुटाणे म्हणाले, अनुभुती, प्रतिभा व प्रज्ञा एकत्र आल्यास चांगली साहित्यकृती जन्माला येते. निर्णय घेण्याची क्षमता ही फक्त वाचन संस्कृतीत आहे. मात्र आज मोबाईल म्हणजेच वर्तमानपत्र झाले आहे. तरूण पिढी पुस्तकापासून दुरावली आहे. अशा परिस्थितीत त्यांना पुस्तकांपर्यंत आणून वाचन संस्कृती वाढविण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर म्हणाले, साहित्य म्हणजे केवळ भाषेचे व्याकरण व शब्दांचे संग्रह नसून ते मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे. आज अनेक साहित्यिक साहित्याची सेवा करून चंद्रपूरचे नाव उंचीवर नेत आहेत. हा आदिवासीबहुल परिसर असून आदिवासी जनजीवनावरही बरेच साहित्य लिहिल्या जात आहे. हे प्रवाह मराठी साहित्याला समृद्ध करीत आहेत, असेही पाऊणकर म्हणाले.