शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

भटक्या व मुक्या जनावरांसाठी पाणवठे बांधण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:36 IST

चामोर्शी : विदर्भासह गडचिरोली जिल्हा तापू लागला आहे. सध्या जिल्ह्यात चाळीस अंश सेल्सियसच्या आसपास तापमान असल्याने तालुक्यातील नागरिक उष्णतेने ...

चामोर्शी : विदर्भासह गडचिरोली जिल्हा तापू लागला आहे. सध्या जिल्ह्यात चाळीस अंश सेल्सियसच्या आसपास तापमान असल्याने तालुक्यातील नागरिक उष्णतेने कासावीस होत आहेत, तर मुक्या व भटक्या जनावरांचे चारा-पाण्याविना हाल होत आहेत. त्यामुळे मुक्या, भटक्या जनावरांसाठी पाणवठे बांधण्याची गरज निर्माण झाली आहे.

वातावरणातील तापमानात वाढ होत आहे. या उष्णतेत जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मुक्या, मोकाट जनावरांना मुबलक चारा व स्वच्छ पाणी मिळत नाही. विना चाऱ्यामुळे जनावरे अशक्त होतात, त्यांचा जीव कासावीस होतो, अशा जनावरांची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. माणसांकरिता पाणपोई लावण्यासाठी बऱ्याच संघटना पुढाकार घेतात. गावातील प्रत्येक चौकाचौकांत एक तरी पाणवठा बांधावा व त्यासाठी सामाजिक संस्था, ग्रामपंचायत, नगरपंचायतींनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविल्यास मुक्या प्राण्यांना तहान भागविता येईल. उन्हाळ्यात नदी, नाले, डबके, बोअरवेल यांचे पाणी आटते. त्यामुळे जनावरांनाही पाणी मिळत नाही. नाले, ओढ्यावरील घाण पाणी पिऊन पशु रोगग्रस्त होतात. त्यासाठी मुक्या, भटक्या पशु-पक्ष्यांसाठी पाणवठे बांधून त्यांची पाण्याची सोय करणे ही काळाची गरज आहे.

बाॅक्स

मिलच्या गेटजवळ पाण्याची साेय

चामोर्शी शहरातील हनुमान नगर येथील शारदा राईस मिलचे संचालक जयसुखलाल दोषी यांनी गेल्या काही वर्षांपासून आपल्या मिलच्या गेटजवळ भटकी जनावरे व पाळीव जनावरांसाठी पाणवठा बांधून सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. या पाणवठ्याचा लाभ त्या मार्गांनी येणारे-जाणारे प्राणी घेत आहेत. त्यांचे अनुकरण सर्वांनी करण्याची गरज आहे.