शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खरिपासाठी ३० हजार क्विंटल बियाणांची गरज

By admin | Updated: May 16, 2017 00:45 IST

खरीप हंगामाला पुढील १५ दिवसानंतर सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.

हंगाम तोंडावर : धानासाठी सर्वाधिक बियाणे लागणारलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : खरीप हंगामाला पुढील १५ दिवसानंतर सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे २९ हजार ३९६ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे.गडचिरोली जिह्यातील हवामान व शेतजमीन धानपिकासाठी पोषक असल्याने जिल्ह्यातील शेतकरी सर्वाधिक धानपिकाची लागवड करतात. खरीप हंगामात सुमारे २ लाख २३ हजार ९८५ हेक्टरवर खरीप पिकांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यापैकी एकट्या धानपिकाची लागवड २ हजार ३०० हेक्टरवर होणार आहे. त्यामुळे धानपिकाच्या बियाणांची सर्वाधिक गरज भासते. २०१७-१८ च्या खरीप हंगामात २६ हजार ७४० क्विंटल धानाच्या बियाणांची आवश्यकता भासेल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. सोयाबीन पिकाची लागवड ३ हजार ७३० हेक्टरवर होणार आहे. त्यासाठी २ हजार १०० क्विंटल बियाणांची गरज भासणार आहे. तूर पिकाची पेरणी ७ हजार ९४६ हेक्टरवर होणार आहे. त्यासाठी ३५० क्विंटल तूर बियाणांची गरज भासणार आहे. जिल्ह्यात कापसाचा व मक्याचा पेरा वाढत चालला आहे. सोयाबीन खालील क्षेत्रावर आता कापसाची लागवड केली जात आहे. यावर्षी १२ हजार हेक्टरवर कापूस तर १ हजार २०० हेक्टरवर मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. कापसासाठी १६२ क्विंटल तर मक्क्यासाठी १२५ क्विंटल बियाणांची आवश्यकता भासणार आहे. उडीताचे ३ क्विंटल, तिळ ११ क्विंटल बियाणांची गरज पडणार आहे. कृषी विभाग राज्य शासनाच्या कंपन्यांकडून १६ हजार ७३९ तर खासगी कंपन्यांकडून १२ हजार ६५७ क्विंटल बियाणे मागविणार आहे. दरवर्षी ऐन पेरणीच्या वेळेवर बियाणांची टंचाई जाणवते. याचा गैरफायदा दुकानदारांकडून घेतला जातो. असे प्रकार टाळण्यासाठी कृषी विभागाने यावर्षी अगदी सुरुवातीलाच नियोजन केले आहे. पेरणीपूर्वी पुरेशाप्रमाणात बियाणे उपलब्ध होतील. यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांचा घरगुती बियाण्यांवर भरघरचे धान्य बियाणे म्हणून वापरण्यासाठी त्याच्यावर कोणत्या प्रक्रिया करण्यात याव्या, याबाबत कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. बियाणे कंपन्या शेतकऱ्यांकडीलच धान्य खरेदी करतात. त्यांच्यावर थोडीफार प्रक्रिया केल्यानंतर तेच बियाणे शेतकऱ्यांना चारपट अधिक किंमतीने विकले जाते. यामध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने शेतकरी स्वत:कडचेही बियाणे वापरत आहेत. दरवर्षी केवळ ३३ टक्केच बियाणे खरेदी केले जातात. उर्वरित ७० टक्के बियाणे शेतकरी स्वत:कडचे वापरतात. मागील वर्षीप्रमाणे चांगला पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना बियाणांची टंचाई जावणार नाही. मात्र पावसाने दगा दिल्यास बियाणांची मागणी वाढू शकते.