शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

सामान्यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादीचा एटापल्लीत हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 23:35 IST

एटापल्ली तालुक्यातील विविध समस्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी, शेतमजूरांचा मोर्चा शुक्रवारी तहसील कार्यालयावर धडकला.

ठळक मुद्देशेकडो नागरिकांची उपस्थिती : उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मागण्यांचे निवेदन शासनाला पाठविले

आॅनलाईन लोकमतएटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील विविध समस्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी, शेतमजूरांचा मोर्चा शुक्रवारी तहसील कार्यालयावर धडकला. राजीव गांधी हायस्कूल ते उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चादरम्यान एटापल्ली येथील वाहतूक काही काळ प्रभावित झाली.सुरजागड पहाडीवरील खदानींच्या लिजचा निर्णय ग्रामसभेला विश्वासात घेऊन घ्यावा, लोहखनिज प्रकल्पात स्थानिक युवकांनाच रोजगार द्यावा, ३१ मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम माफ करून त्यांचा सातबारा कोरा करावा, तालुक्यातील गावांमध्ये वीज, पाणी, आरोग्य व शिक्षण आदी सुविधा पुरवाव्या, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार द्यावा, जबरानजोतधारकांना पट्टे देण्यात यावे, अहेरी जिल्हा घोषित करावा आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एटापल्लीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात रायुकाँचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संग्रामसिंग कोते, जिल्हा परिषद बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, ऋतूराज हलगेकर, पं.स. सदस्य हर्षवर्धनराव आत्राम, लिलाधर भरडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, रायुकाँ जिल्हाध्यक्ष रिंकू पापडकर, राकाँ तालुका अध्यक्ष दौलत दहागावकर, पं.स. सभापती बेबीताई लेकामी, राजू नरोटे, संभाजी हिचामी, नगरसेविका सगुणा हिचामी, जिल्हा परिषद सदस्य ग्यानकुमारी कौशीक, ऋषी पोरतेट, पापा पुण्यमूर्तीवार, रामजी कत्रीवार, लक्ष्मण नरोटी, पंकज पुंगाटी, कैलाश कोरेत, लक्ष्मण नरोटी, शंकर करमरकर, मारोती दगाहावकर, केशव कंगाली, हरिदास टेकाम, दीपक यावले, प्रशांत कोपुलवार यांच्यासह तालुक्यातील शेकडो नागरिक उपस्थित होते.एसडीएम कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर माजी राज्यमंत्री धर्मराव आत्राम यांच्या नेतृत्वात राकाँच्या शिष्टमंडळाने प्रभारी उपविभागीय अधिकारी ए.एस. थेटे यांना मागण्यांचे निवेदन देऊन समस्यांबाबत चर्चा केली. पेसा कायदा धाब्यावर बसवून सुरजागड येथून लोहखनिजाची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी व वाहतूक तसेच खणन बंद करण्याची मागणी केली. यावेळी नायब तहसीलदार एस. एन. सिलमवार, संवर्ग विकास अधिकारी अनिल वाघमारे, वन परिक्षेत्राधिकारी एस. एच. राठोड उपस्थित होते. शासनस्तरावरील मागण्या सोडविण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन एसडीओंनी दिले.स्वत:चा हक्कासाठी सरकार हाणून पाळाविद्यमान सरकार निव्वळ आश्वासन देण्याचे काम करत असून समोर काय करणार याची कल्पना त्यांनाच नाही. बेरोजगारी वाढली, युवक वर्ग रस्त्यावर उतरत आहेत. महिलांना सुरक्षा नाही, शेतकºयांच्या खात्यात रक्कम नाही मात्र, कर्जमाफी झाल्याची निव्वळ जाहिरातच दाखवितात. सध्या सरकार मध्ये विदर्भाचे नेते मोठमोठ्या पदावर असूनसुद्धा विदर्भाचा विकास नाही. चार वर्षे संपत आले, मात्र यांची आश्वासने अजूनही जशीच्या तशीच आहे. म्हणून या सरकारला आपली जागा दाखविण्याची वेळ आली आहे. सुरजागडसारख्या प्रकल्पाचा मुद्दा कायम असताना खणन सुरू करून कच्चा माल बाहेर घेऊन जात आहे. वास्तविक लोहप्रकल्प याच परिसरात होऊन स्थानिक युवकांना रोजगार मिळायला हवा. त्यासाठी संघर्ष करा, असे आवाहन राकाँचे युवक प्रदेश अध्यक्ष संग्रामसिंग कोते पाटील यांनी मोर्चेकरांना केले.