शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
2
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
3
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
4
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
5
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
6
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
7
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
8
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
9
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
10
VIDEO: पुतिन यांच्या भेटीनंतर किम जोंगच्या कर्मचाऱ्यांनी सर्व DNA पुरावे अन् बोटांचे ठसे पुसून टाकले
11
मृत्यू पंचकात खग्रास चंद्रग्रहण २०२५: सूतक काल कधी? काय करावे अन् काय करू नये; पाहा, नियम
12
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी
13
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
14
४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...
15
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
16
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
17
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
18
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
19
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
20
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...

राष्ट्रवादीला ‘बुस्टर’ची गरज

By admin | Updated: June 11, 2017 01:22 IST

राज्यात पेटलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धग गडचिरोली जिल्ह्यात जरा उशिराच पोहोचली.

मनोज ताजने । लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : राज्यात पेटलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धग गडचिरोली जिल्ह्यात जरा उशिराच पोहोचली. उशिरा का होईना, या जिल्ह्यात शेतकऱ्यांविषयी तळमळ असणारे कोणी आहे हे गेल्या ५-६ दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने कुठे ना कुठे आंदोलन सुरू ठेवून शिवसेनेने दाखवून दिले. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची हिंमत जिल्ह्याच्या काँग्रेसमध्ये अजून आली नसली तरी अधिकाऱ्यांना निवेदन वगैरे देऊन त्यांनी आपल्या परीने शेतकऱ्यांच्या आंदोलनात सूर मिसळला आहे. भाजप सत्तेतील प्रमुख पक्ष असल्यामुळे भाजपचे पदाधिकारी सरकारला धारेवर धरणार नाही, पण या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस मात्र अजूनपर्यंत कुठेच दिसत नसल्याने ही बाब अनेकांना खटकत आहे. एकेकाळी हा जिल्हा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा गड होता. अगदी तीन वर्षांपूर्वी सरकारची खांदेपालट होण्यापूर्वीसुद्धा राष्ट्रवादीचे या जिल्ह्यावर बऱ्यापैकी वर्चस्व होते. याच पक्षाचे नेते आर.आर.पाटील यांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पाडलेली छाप लोकांच्या स्मरणात आहे. ज्या पक्षाचे सर्वोच्च नेते शेतकऱ्यांचे ‘जाणता राजा’ म्हणून उभ्या महाराष्ट्रात ओळखले जातात, त्या पक्षाचे गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकारी शेतकऱ्यांच्या विषयात एवढे उदासीनता कसे झाले? याच पक्षाचे नेते देशाचे कृषीमंत्री असताना त्यांनी कर्जमाफी दिली होती. त्यामुळे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तर उजळ माथ्याने रस्त्यावर उतरून कर्जमाफीची मागणी करता आली असती, पण ती संधीही ते गमावत आहेत. सत्ता गेली की शहाणपणही जाते, असे म्हणायला हरकत नाही. लोकशाहीत निवडणुकीच्या रुपाने होणारी खांदेपालट ही काही नवीन गोष्ट नाही. तव्यावरची पोळी जळू नये म्हणून जसी पलटविणे गरजेचे असते तसे लोकशाहीत लोक सत्ता पलटवितात. पण अनेक वर्षे सत्तेत राहिल्यामुळे की काय, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि काँग्रेसचेही पदाधिकारी आंदोलन करणेच विसरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर एवढा ‘विकनेस’ आला आहे की, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना ‘बुस्टर डोज’ देण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवसेनेचे आंदोलन रोज सुरू आहे. अर्थात त्या आंदोलनात शेतकरी किती असतात हा भाग निराळा. आपण सत्तेत नसून विरोधी पक्षातच आहोत या आवेशात त्यांचे आंदोलन असते. पण एकीकडे सत्तेला चिकटून राहायचे आणि दुसरीकडे आपल्याच सरकारविरूद्ध आंदोलन करायचे, ही दुहेरी निती मात्र सर्वसामान्यांच्या समजण्यापलिकडची आहे. यामुळेच सेनेच्या मंत्र्यांचे खिशात राजीनामे घेऊन फिरण्याचे विधान सोशल मिडियावर हास्यास्पद ठरते. काहीही असो, आपले सरकार चुकत आहे तर त्यांच्याविरूद्ध जाहीरपणे आंदोलन करण्यासाठीही हिंमत लागते. शिवसेनेच्या या हिमतीला दाद दिलीच पाहिजे.