शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

नक्षल्यांनी मुख्य प्रवाहात यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 01:23 IST

पोलिसांच्या सातत्त्यपूर्ण कामगिरीमुळे भविष्यात गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवादाचा समूळ नायनाट होण्यास मदत होईल. त्यामुळे नक्षलवाद्यांनी शस्त्रे टाकून मुख्य प्रवाहात यावे व लोकशाहीचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रविवारी केले.

ठळक मुद्देकेंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचे आवाहन : सी-६० व सीआरपीएफ जवानांचे कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पोलिसांच्या सातत्त्यपूर्ण कामगिरीमुळे भविष्यात गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवादाचा समूळ नायनाट होण्यास मदत होईल. त्यामुळे नक्षलवाद्यांनी शस्त्रे टाकून मुख्य प्रवाहात यावे व लोकशाहीचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रविवारी केले.जिल्हा पोलीस मुख्यालयाला केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भेट देऊन पोलीस उपमहानिरीक्षक अंकूश शिंदे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे अभिनंदन केले. तसेच दोन नक्षली कारवायांत ४० नक्षल्यांना ठार करणाऱ्या जिल्हा पोलीस दलातील सी-६० जवान व सीआरपीएफ जवानांचे कौतुक केले. ही अतिशय खडतर परिस्थितीत राहून प्रभाविपणे सातत्त्याने उत्कृष्ट कामगिरी बजावत पोलीस दलाने मोठ्या प्रमाणावर यश मिळविल्याचे नमूद करीत गृह राज्यमंत्र्यांनी कसनासूर व नैनेर जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभागी सी-६० पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच सीआरपीएफ जवानांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक अंकूश शिंदे यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचे आभार मानत आपल्या प्रेरणेमुळे पोलीस दलाचे मनोधैर्य वाढले आहे. गडचिरोली पोलीस दल प्रामाणिकपणे भविष्यात काम करत राहील. तसेच नक्षल्यांविरोधातील मोहीम तत्परतेने राबविली जाईल, अशी ग्वाही दिली.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी