शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

नक्षलवाद्यांनी युद्ध नव्हे बुद्धाचे विचार स्वीकारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 23:58 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर तत्कालीन समाजाने मोठा अन्याय केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अन्यायाची मोठी चिड होती. मात्र त्यांनी युद्धाचा मार्ग न स्वीकारता बुद्धाचा मार्ग स्वीकारून समाज परिवर्तन केले.

ठळक मुद्देरामदास आठवले यांचे आवाहन : सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर तत्कालीन समाजाने मोठा अन्याय केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अन्यायाची मोठी चिड होती. मात्र त्यांनी युद्धाचा मार्ग न स्वीकारता बुद्धाचा मार्ग स्वीकारून समाज परिवर्तन केले. आपल्यावर अन्याय झाला, असे नक्षलवाद्यांना वाटत असेल तर त्यांनी बंदुकी सोडून शांतीच्या मार्गाने वाटाघाटी कराव्या, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.रामदास आठवले हे गुरूवारी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती दिली. देशभरात २ कोटी ६७ लाख नागरिक तर गडचिरोली जिल्ह्यात नऊ हजार नागरिक विकलांग आहेत. अपंग विकास महामंडळामार्फत त्यांना रोजगारासाठी मदत केली जात आहे. त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी विविध प्रशिक्षण आयोजित केले जात आहे. केंद्र शासनामार्फत त्यांना साहित्य उपलब्ध करून दिले जात आहेत. भटक्या जमातींचे पुनर्वसन करून त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहेत. वृद्धाश्रम उघडण्यासाठी एखादी सामाजिक संस्था पुढे आल्यास त्याला परवानगी देऊन अनुदान सुद्धा उपलब्ध करून दिले जाईल.विदर्भात झुडूपी जंगल मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी मोठे जंगल होऊ शकत नाही. सदर जमीन गरजू शेतकºयांना कसण्यासाठी द्यावी, यादृष्टीने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. रॉफेल खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याची ओरड राहुल गांधी करीत असले तरी या आरोपामध्ये काही तत्थ्य नाही. महागाईनुसार थोडीफार किंमत वाढली आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या आठ हजार विद्यार्थी व अनुसूचित जमातीच्या चार हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला आहे. २०१७-१८ मध्ये २०० आंतरजातीय विवाह पार पडले. या जोडप्यांना राज्य शासनाकडून ५० हजार रूपयांचे अनुदान देण्यात आले. केंद्र शासनाकडून दोन लाख रूपयांचे अनुदान दिले जाणार आहे. संबंधित जोडप्यांचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांच्या जेवनाच्या व राहण्याच्या व्यवस्थेसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. गडचिरोली जिल्ह्यात २०१६-१७ यावर्षात २४, २०१७-१८ या वर्षात ४७ व २०१८-१९ मध्ये ४० विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती आठवले यांनी दिली. पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले