शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांनी युद्ध नव्हे बुद्धाचे विचार स्वीकारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 23:58 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर तत्कालीन समाजाने मोठा अन्याय केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अन्यायाची मोठी चिड होती. मात्र त्यांनी युद्धाचा मार्ग न स्वीकारता बुद्धाचा मार्ग स्वीकारून समाज परिवर्तन केले.

ठळक मुद्देरामदास आठवले यांचे आवाहन : सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर तत्कालीन समाजाने मोठा अन्याय केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अन्यायाची मोठी चिड होती. मात्र त्यांनी युद्धाचा मार्ग न स्वीकारता बुद्धाचा मार्ग स्वीकारून समाज परिवर्तन केले. आपल्यावर अन्याय झाला, असे नक्षलवाद्यांना वाटत असेल तर त्यांनी बंदुकी सोडून शांतीच्या मार्गाने वाटाघाटी कराव्या, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.रामदास आठवले हे गुरूवारी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती दिली. देशभरात २ कोटी ६७ लाख नागरिक तर गडचिरोली जिल्ह्यात नऊ हजार नागरिक विकलांग आहेत. अपंग विकास महामंडळामार्फत त्यांना रोजगारासाठी मदत केली जात आहे. त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी विविध प्रशिक्षण आयोजित केले जात आहे. केंद्र शासनामार्फत त्यांना साहित्य उपलब्ध करून दिले जात आहेत. भटक्या जमातींचे पुनर्वसन करून त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहेत. वृद्धाश्रम उघडण्यासाठी एखादी सामाजिक संस्था पुढे आल्यास त्याला परवानगी देऊन अनुदान सुद्धा उपलब्ध करून दिले जाईल.विदर्भात झुडूपी जंगल मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी मोठे जंगल होऊ शकत नाही. सदर जमीन गरजू शेतकºयांना कसण्यासाठी द्यावी, यादृष्टीने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. रॉफेल खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याची ओरड राहुल गांधी करीत असले तरी या आरोपामध्ये काही तत्थ्य नाही. महागाईनुसार थोडीफार किंमत वाढली आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या आठ हजार विद्यार्थी व अनुसूचित जमातीच्या चार हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला आहे. २०१७-१८ मध्ये २०० आंतरजातीय विवाह पार पडले. या जोडप्यांना राज्य शासनाकडून ५० हजार रूपयांचे अनुदान देण्यात आले. केंद्र शासनाकडून दोन लाख रूपयांचे अनुदान दिले जाणार आहे. संबंधित जोडप्यांचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, अशा विद्यार्थ्यांच्या जेवनाच्या व राहण्याच्या व्यवस्थेसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. गडचिरोली जिल्ह्यात २०१६-१७ यावर्षात २४, २०१७-१८ या वर्षात ४७ व २०१८-१९ मध्ये ४० विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती आठवले यांनी दिली. पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले