शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

मानवाधिकार संघटनेतर्फे नक्षलवाद्यांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 01:12 IST

नक्षलवाद्यांकडून निष्पाप तीन नागरिकांची हत्या झाल्याच्या घटनेचा मानवाधिकार परिषदेतर्फे बुधवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात जोरदार निषेध नोंदविण्यात आला. नक्षल्यांकडून हत्त्या झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, .....

ठळक मुद्देशासनाकडे मागणी : नक्षलपीडित कुटुंबांना मदत द्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलवाद्यांकडून निष्पाप तीन नागरिकांची हत्या झाल्याच्या घटनेचा मानवाधिकार परिषदेतर्फे बुधवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात जोरदार निषेध नोंदविण्यात आला. नक्षल्यांकडून हत्त्या झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करीत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.भारतीय मानवाधिकार परिषद संलग्नित नक्षलपीडित पुनर्वसन समितीने नक्षल्यांकडून हत्त्या झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी याप्रसंगी केली. जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून दुर्गम भागातील नागरिकांची हत्या करण्यात येत आहे. हत्या झाल्यानंतर नागरिकांचे कुटुंब उघड्यावर पडते. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याची अनेक उदाहरणे आहेत. नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाईमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. कसनासूर गावात नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या चकमकीत ४० नक्षलवादी मारल्या गेले होते. या घटनेत पोलिसांना नक्षलवाद्यांची माहिती गावकऱ्यांनी दिली, असा संशय घेत नक्षलवाद्यांनी कसनासूर गावातील मालू मडावी, कन्ना मडावी, लालसू कुडयेटी यांची हत्या केली. त्यामुळे गावातील नागरिकांना गाव सोडून पोलीस मदत केंद्रात आश्रय घ्यावे लागले. या घटनेमुळे दुर्गम भागातील आदिवासी व नक्षलपीडित नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे, असे मानवाधिकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांविरोधात मानवाधिकार परिषदेच्या वतीने इंदिरा गांधी चौकात नक्षलवाद्यांचा निषेध करून नक्षलपीडित कुटुंबीयांना तत्काळ १० लाख रूपयांची मदत द्यावी, एका सदस्याला शासकीय सेवेत नोकरी द्यावी, नक्षल्यांच्या भीतीने गाव सोडून भटकणाऱ्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे, शहरी भागातील नक्षलवाद्यांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.निषेध नोंदविताना मानवाधिकार परिषदेचे प्रदेश अध्यक्ष गजेंद्र डोमळे, व्ही.एन.मडावी, मधुकर उसेंडी, मनोज कांदो, संदीप वाघमारे, साईनाथ पेंडालवार, सुरेश नरोटी, बाबुराव धुर्वा, मनोज कोवासे, अशोक कोरसामी, सतीश गोटा, राजेश लेकामी, राजू दुर्वा, मधुकर मट्टामी, पेका मट्टामी, दुलसा नरोटे, लालसू नरोटे, रोशन बावणे, गौतम मेश्राम, सोनल पुंगाटी, अविनाश मेश्राम, संदीप मडावी, सचिन खोब्रागडे व नक्षलपीडित हजर होते.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी