शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

नक्षलग्रस्त मुत्तापूर गाव नागपूर विभागात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 22:11 IST

केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियानात भरीव कामगिरी : २०१५-१६ वर्षात जलसंधारणाची अनेक कामे मार्गी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत जलसंधारणाची अनेक कामे केली जात आहेत. सन २०१५-१६ या वर्षात सदर अभियानात उत्कृष्ट काम करणाºया अहेरी पंचायत समितीमधील महागाव ग्रामपंचायतीतील मुत्तापूर गावाने नागपूर विभागात अव्वल स्थान प्राप्त केला आहे. याशिवाय धानोरा तालुक्यातील जप्पी गावाला जलयुक्त शिवारच्या कामात पाचवे स्थान मिळाले आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन क्षेत्र वाढवून टंचाईमुक्त महाराष्टÑ घडविण्यासाठी सन २०१५ पासून गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात जलयुक्त शिवार अभियान ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १५३ गावांची आराखड्यात निवड करण्यात आली. या गावांमध्ये कोट्यवधी रूपयांची जलसंधारणाची विविध कामे मंजूर करण्यात आली. तीन हजार पेक्षा अधिक कामे करणाºया पाच गावांची निवड सन २०१५-१६ पुरस्कारासाठी प्रशासनामार्फत करण्यात आली. यामध्ये अहेरी तालुक्यातील मुत्तापूर, धानोरा तालुक्यातील जप्पी, भामरागड तालुक्यातील कोठी, एटापल्ली तालुक्यातील वासामुंडी व गुरूपल्ली आदी गावांचा समावेश आहे. या पाच गावात झालेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. तपासणीनंतर पुरस्कार समितीपुढे हे प्रस्ताव समितीने मुत्तापूर गावाची निवड प्रथम पुरस्कारासाठी केली. तसेच जप्पी गावाला जलयुक्त शिवारच्या कामात पाचवा क्रमांक दिला आहे.३२ हजार घ.मी. जलसंचयमहागाव ग्रा.पं. अंतर्गत मुत्तापूर / दिनचेरपल्ली हे गाव आलापल्ली-चंद्रपूर मार्गावर वसले आहे. येथील लोकसंख्या ३४७ असून जवळपास १३५ हेक्टर शेतजमीन आहे. येथे १५ तलाव, चार बोड्यांचे नविनीकरण असे एकूण २२ कामांचे नियोजन करण्यात आले. या कामातून ३२ हजार ९४० घन मीटर जलसंचय अपेक्षीत आहे.