शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

नक्षलग्रस्त मुत्तापूर गाव नागपूर विभागात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 22:11 IST

केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार अभियानात भरीव कामगिरी : २०१५-१६ वर्षात जलसंधारणाची अनेक कामे मार्गी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत जलसंधारणाची अनेक कामे केली जात आहेत. सन २०१५-१६ या वर्षात सदर अभियानात उत्कृष्ट काम करणाºया अहेरी पंचायत समितीमधील महागाव ग्रामपंचायतीतील मुत्तापूर गावाने नागपूर विभागात अव्वल स्थान प्राप्त केला आहे. याशिवाय धानोरा तालुक्यातील जप्पी गावाला जलयुक्त शिवारच्या कामात पाचवे स्थान मिळाले आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन क्षेत्र वाढवून टंचाईमुक्त महाराष्टÑ घडविण्यासाठी सन २०१५ पासून गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरात जलयुक्त शिवार अभियान ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १५३ गावांची आराखड्यात निवड करण्यात आली. या गावांमध्ये कोट्यवधी रूपयांची जलसंधारणाची विविध कामे मंजूर करण्यात आली. तीन हजार पेक्षा अधिक कामे करणाºया पाच गावांची निवड सन २०१५-१६ पुरस्कारासाठी प्रशासनामार्फत करण्यात आली. यामध्ये अहेरी तालुक्यातील मुत्तापूर, धानोरा तालुक्यातील जप्पी, भामरागड तालुक्यातील कोठी, एटापल्ली तालुक्यातील वासामुंडी व गुरूपल्ली आदी गावांचा समावेश आहे. या पाच गावात झालेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. तपासणीनंतर पुरस्कार समितीपुढे हे प्रस्ताव समितीने मुत्तापूर गावाची निवड प्रथम पुरस्कारासाठी केली. तसेच जप्पी गावाला जलयुक्त शिवारच्या कामात पाचवा क्रमांक दिला आहे.३२ हजार घ.मी. जलसंचयमहागाव ग्रा.पं. अंतर्गत मुत्तापूर / दिनचेरपल्ली हे गाव आलापल्ली-चंद्रपूर मार्गावर वसले आहे. येथील लोकसंख्या ३४७ असून जवळपास १३५ हेक्टर शेतजमीन आहे. येथे १५ तलाव, चार बोड्यांचे नविनीकरण असे एकूण २२ कामांचे नियोजन करण्यात आले. या कामातून ३२ हजार ९४० घन मीटर जलसंचय अपेक्षीत आहे.