शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

नक्षली ब्लास्टच्या घटना शून्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2017 01:40 IST

गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात पोलीस व माओवाद्यात वारंवार चकमकी उडत आहेत;

नक्षलग्रस्त भागात अभियान वाढले : २६ महिन्यांत पोलिसांचे यश गडचिरोली : गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात पोलीस व माओवाद्यात वारंवार चकमकी उडत आहेत; परंतु पोलीस यंत्रणेच्या अभियानात प्रचंड सतर्कता आल्यामुळे गेल्या २६ महिन्यांत नक्षलवाद्यांकडून ब्लास्टची (स्फोटाची) एकही घटना घडलेली नाही. उलट पोलीस प्रशासनाला माओवाद्यांनी लावलेले अनेक भूसुरूंग उद्ध्वस्त करण्यात कमालीचे यश आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात १९८० च्या दशकात माओवादी कारवायांचा उदय झाला. त्यामुळे पोलीस प्रशासनाला या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजना हाती घ्याव्या लागल्या. माओवाद्यांशी असलेले हे युद्ध जंगलात लढताना पोलिसांना विविध युद्धाचा सामना करावा लागत होता. माओवाद्यांकडून ठिकठिकाणी स्फोटक पेरून भूसुरूंग करण्यात येत होते. २००५ मध्ये ब्लास्टच्या एकूण १० घटना घडल्या. २००६ मध्येही तेवढ्याच घटना झाल्यात. २००७ मध्ये १३ ब्लास्ट झाले तर २००८, २००९ मध्ये प्रत्येकी दोन ब्लास्ट माओवाद्यांकडून करण्यात आले. २०१० मध्ये चार ब्लास्ट झाले तर २०११ मध्ये तीन, २०१२ मध्ये दोन व २०१३, २०१४ मध्ये प्रत्येकी चार-चार भूसुरूंग स्फोट माओवाद्यांनी केलेत. मात्र २०१५, २०१६ तसेच २०१७ च्या २८ फेब्रुवारीपर्यंत एकही ब्लास्ट गडचिरोली जिल्ह्यात झाला नाही. यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे जिल्ह्यात पोलीस ठाण्यांची संख्या वाढल्याने प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत सी-६० पथक निर्माण करण्यात आले. त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर दिवसा व रात्री गस्ती वाढल्या. नेटवर्कचे जाळे मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नक्षलवाद्यांच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांची करडी नजर राहू लागली. पोलिसांच्या खबऱ्यांचे नेटवर्क मजबूत झाले. त्यामुळे ब्लास्टच्या बाबतही गुप्त माहिती पोलिसांपर्यंत तत्काळ उपलब्ध होऊ लागली. या साऱ्या बाबी माओवाद्यांसाठी डोकेदुखी ठरल्या. त्यामुळे मागील २६ महिन्यांत नक्षली ब्लास्टची एकही घटना घडलेली नाही. (जिल्हा प्रतिनिधी)